शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ज्येष्ठ साहित्यिक  डॉ. किसन पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:48 IST

डॉ. किसन पाटील यांना न्युमोनिया, जंतू संसर्ग झाल्याने गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते

ठळक मुद्देआज अंत्यसंस्कारशिक्षण, साहित्य क्षेत्रात भूषविले विविध पदे

जळगाव : महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष, प्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. किसन पाटील (६७, रा. शिवकॉलनी) यांचे मंगळवार, २ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले.

डॉ. किसन पाटील यांना न्युमोनिया, जंतू संसर्ग झाल्याने गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. या दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली होती. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. किसन पाटील हे उत्तम समीक्षक, संशोधक, लोकभाषा व लोक संस्कृतीचे गाढे अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते. त्यांचा स्वभाव हा नेहमी हसरा आणि मनमिळावू होता. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने मोठा धक्का बसला असून, त्यांच्या रूपाने साहित्य क्षेत्रातील एक `उमदे `व्यक्तिमत्व हरपल्याच्या  शोकसंवेदना जिल्ह्यातील  साहित्यिकांनी  व्यक्त  केल्या.

लोकसाहित्याच्या पर्वाचा अस्त

कवितासंग्रह, बालकवितासंग्रह, लोकसाहित्याचे लिखाण, विविध साहित्याचे संपादन, वैचारिक लेखसंग्रह, विविध मंडळांवर पदाधिकारी, अभ्यासक, विविध ग्रंथांना प्रस्तावना अशा विविध साहित्याचे धनी असलेले प्राचार्य किसन पाटील यांच्या निधनाने लोकसाहित्याच्या पर्वाचा अस्त झाल्याच्या प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातून उमटत आहे.

शिक्षण, साहित्य क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान असलेल्या प्राचार्य किसन महादू पाटील यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले आणि खान्देशातील साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांना, साहित्यिकांना तसेच शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला.

शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान

डॉ. किसन पाटील हे मूळ राहणार वाघोड, ता. रावेर येथील रहिवासी होते. रावेर येथील सरदार जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कलाशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील कार्याला सुरुवात केली. त्यानंतर मू. जे. महाविद्यालयात पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख म्हणून जळगावात आले व ते जळगावकरच झाले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, एसएनडीटी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी यशस्वी धुरा संभाळली.

विविध पदांचे धनी

जळगावात झालेल्या खान्देशस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणित अखिल भारतीय मराठी जनसाहित्य संमेलन (मोझरी, अमरावती), ५७ वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन (मुक्ताईनगर), राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन (पाचोरा) अशा विविध संमेलनांमध्ये त्यांनी अध्यक्षपदाची धुरा संभाळली होती.

स्मरणात राहणारे साहित्य योगदान

कवितासंग्रह, बालकवितासंग्रह, लोकसाहित्याचे त्यांनी लिखाण केले. या सोबतच विविध साहित्याचे संपादन, वैचारिक लेखसंग्रह यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. कुमारभारती, युवक भारती यातही योगदान देत मराठी भाषेच्या आठ पाठ्यपुस्तकांसाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणावर कार्य केले. विविध मंडळांवर पदाधिकारी, अभ्यासक म्हणूनही त्यांची वेगळी ओळख राहिली. विविध ग्रंथांना प्रस्तावना, अनेक भाषणे, व्याख्याने, अध्यक्षीय भाषणे, संशोधन मार्गदर्शक, आकाशवाणी-दूरदर्शन कार्यक्रमात सहभागदेखील स्मरणात राहणारा आहे.

तीन कवितासंग्रह, दोन बालकवितासंग्रह, दोन लोकसाहित्याचे संशोधन, तीन गौरवग्रंथ, लोककथा आणि कोळी गीतांचे संपादन, समीक्षा, लेखमाला असे विपुल साहित्य प्राचार्य किसन पाटील यांच्या हातून आकाराला आले.

शिक्षण, साहित्य क्षेत्रात भूषविले विविध पदे

मंडळांचे कार्यकारी सदस्य, विविध साहित्य संघ, शिक्षण क्षेत्रातील स्थानिक व्यवस्थापन सामिती, जनसंवाद व पत्रकारिता विभागात लघुशोध प्रकल्प विविध ग्रंथांना प्रस्तावना यातही त्यांचा लक्षणीय सहभाग राहिला.

आज अंत्यसंस्कार

प्राचार्य किसन पाटील यांच्या पार्थिवावर बुधवार, ३ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव