शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या वर्षी अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काही वर्षांमध्ये बदलत जाणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने फटका बसत आहे. खरीप हंगामात गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काही वर्षांमध्ये बदलत जाणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने फटका बसत आहे. खरीप हंगामात गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे केवळ ४० टक्के हंगाम होत आहे, तर रब्बी हंगामदेखील अवकाळी पावसामुळे वाया जाताना दिसून येत आहे. सलग दोन वर्षात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्या शेतकऱ्यांचा माल निघाला ते शेतकरी भाग्यशाली समजले जात आहेत. शनिवारी जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव, अमळनेर व जामनेर तालुक्यात गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला आहे.

निसर्गाच्या बदलत्या हवामानामुळे ऋतुमानाचे चक्र बदलले आहे. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या पाचही महिन्यांमध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे रब्बीच्या हंगामात तब्बल वीस ते पंचवीस टक्के परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातदेखील कापसाच्या उत्पादनात २५ टक्के घट झाली होती. तर सोयाबीन, उडीद व मूग या पिकांच्या उत्पादनात ६० ते ७० टक्के घट झाली होती. आता हाच फटका रब्बी हंगामातील पिकांना बसताना दिसून येत आहे.

अवकाळी पावसानंतर पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ

शनिवारी झालेल्या पावसानंतर अजून काही दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी मिळेल त्या मजुरांद्वारे व ज्या भावात मिळेल त्या मशीनद्वारे गहू व दादर काढण्याचे काम सुरू केले होते. अनेक यंत्र चालकांनी दादर व गहू काढण्याच्या दरातही एक बिघ्यामागे पाचशे ते हजार रुपयांची वाढ केली होती. मात्र, पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने शेतातून वाचलेली पिके काढण्यासाठी लगबग केली होती.

अजून चार दिवस पावसाचा अंदाज

जिल्ह्यात २४ मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. नार्वेस्टर इफेक्टमुळे मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वादळी पावसासह काही भागात गारपिटीचा ही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच ४० ते ४५ किमी प्रतितास वेगाने जिल्ह्यात वारे वाहण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

या भागात बसला सर्वाधिक फटका

शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव तालुक्यातील म्हसावद, वडली, वावडदा, बिलवाडी, विटनेर या पट्ट्यासह आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी या गावांमध्येही अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच गिरणा व तापी नदीच्या मध्ये येणाऱ्या भागातील कठोरा, भादली, करंज या गावांमधील शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसल्याची माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली आहे.

सलग दोन वर्ष शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा

गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकृपा दाखवली आहे. सन २०१९मध्ये खरीप हंगामादरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यानंतर मार्च २०२०मध्येदेखील जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चोपडा, जळगाव, यावल व अमळनेर या तालुक्यांमध्येही रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासह २०२०मध्येही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामाच्या उत्पादनात पन्नास टक्के घट झाली. आता पुन्हा अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. यासह जळगाव तालुक्यातील गिरणा पट्ट्यातील केळी बागांचेही शनिवारी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.