शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

सलग दुसऱ्या वर्षी अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काही वर्षांमध्ये बदलत जाणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने फटका बसत आहे. खरीप हंगामात गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काही वर्षांमध्ये बदलत जाणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने फटका बसत आहे. खरीप हंगामात गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे केवळ ४० टक्के हंगाम होत आहे, तर रब्बी हंगामदेखील अवकाळी पावसामुळे वाया जाताना दिसून येत आहे. सलग दोन वर्षात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्या शेतकऱ्यांचा माल निघाला ते शेतकरी भाग्यशाली समजले जात आहेत. शनिवारी जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव, अमळनेर व जामनेर तालुक्यात गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला आहे.

निसर्गाच्या बदलत्या हवामानामुळे ऋतुमानाचे चक्र बदलले आहे. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या पाचही महिन्यांमध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे रब्बीच्या हंगामात तब्बल वीस ते पंचवीस टक्के परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातदेखील कापसाच्या उत्पादनात २५ टक्के घट झाली होती. तर सोयाबीन, उडीद व मूग या पिकांच्या उत्पादनात ६० ते ७० टक्के घट झाली होती. आता हाच फटका रब्बी हंगामातील पिकांना बसताना दिसून येत आहे.

अवकाळी पावसानंतर पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ

शनिवारी झालेल्या पावसानंतर अजून काही दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी मिळेल त्या मजुरांद्वारे व ज्या भावात मिळेल त्या मशीनद्वारे गहू व दादर काढण्याचे काम सुरू केले होते. अनेक यंत्र चालकांनी दादर व गहू काढण्याच्या दरातही एक बिघ्यामागे पाचशे ते हजार रुपयांची वाढ केली होती. मात्र, पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने शेतातून वाचलेली पिके काढण्यासाठी लगबग केली होती.

अजून चार दिवस पावसाचा अंदाज

जिल्ह्यात २४ मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. नार्वेस्टर इफेक्टमुळे मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वादळी पावसासह काही भागात गारपिटीचा ही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच ४० ते ४५ किमी प्रतितास वेगाने जिल्ह्यात वारे वाहण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

या भागात बसला सर्वाधिक फटका

शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव तालुक्यातील म्हसावद, वडली, वावडदा, बिलवाडी, विटनेर या पट्ट्यासह आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी या गावांमध्येही अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच गिरणा व तापी नदीच्या मध्ये येणाऱ्या भागातील कठोरा, भादली, करंज या गावांमधील शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसल्याची माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली आहे.

सलग दोन वर्ष शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा

गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकृपा दाखवली आहे. सन २०१९मध्ये खरीप हंगामादरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यानंतर मार्च २०२०मध्येदेखील जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चोपडा, जळगाव, यावल व अमळनेर या तालुक्यांमध्येही रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासह २०२०मध्येही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामाच्या उत्पादनात पन्नास टक्के घट झाली. आता पुन्हा अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. यासह जळगाव तालुक्यातील गिरणा पट्ट्यातील केळी बागांचेही शनिवारी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.