शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सलग दुसऱ्या वर्षी अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काही वर्षांमध्ये बदलत जाणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने फटका बसत आहे. खरीप हंगामात गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काही वर्षांमध्ये बदलत जाणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने फटका बसत आहे. खरीप हंगामात गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे केवळ ४० टक्के हंगाम होत आहे, तर रब्बी हंगामदेखील अवकाळी पावसामुळे वाया जाताना दिसून येत आहे. सलग दोन वर्षात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्या शेतकऱ्यांचा माल निघाला ते शेतकरी भाग्यशाली समजले जात आहेत. शनिवारी जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव, अमळनेर व जामनेर तालुक्यात गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला आहे.

निसर्गाच्या बदलत्या हवामानामुळे ऋतुमानाचे चक्र बदलले आहे. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या पाचही महिन्यांमध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे रब्बीच्या हंगामात तब्बल वीस ते पंचवीस टक्के परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातदेखील कापसाच्या उत्पादनात २५ टक्के घट झाली होती. तर सोयाबीन, उडीद व मूग या पिकांच्या उत्पादनात ६० ते ७० टक्के घट झाली होती. आता हाच फटका रब्बी हंगामातील पिकांना बसताना दिसून येत आहे.

अवकाळी पावसानंतर पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ

शनिवारी झालेल्या पावसानंतर अजून काही दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी मिळेल त्या मजुरांद्वारे व ज्या भावात मिळेल त्या मशीनद्वारे गहू व दादर काढण्याचे काम सुरू केले होते. अनेक यंत्र चालकांनी दादर व गहू काढण्याच्या दरातही एक बिघ्यामागे पाचशे ते हजार रुपयांची वाढ केली होती. मात्र, पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने शेतातून वाचलेली पिके काढण्यासाठी लगबग केली होती.

अजून चार दिवस पावसाचा अंदाज

जिल्ह्यात २४ मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. नार्वेस्टर इफेक्टमुळे मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वादळी पावसासह काही भागात गारपिटीचा ही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच ४० ते ४५ किमी प्रतितास वेगाने जिल्ह्यात वारे वाहण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

या भागात बसला सर्वाधिक फटका

शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव तालुक्यातील म्हसावद, वडली, वावडदा, बिलवाडी, विटनेर या पट्ट्यासह आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी या गावांमध्येही अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच गिरणा व तापी नदीच्या मध्ये येणाऱ्या भागातील कठोरा, भादली, करंज या गावांमधील शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसल्याची माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली आहे.

सलग दोन वर्ष शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा

गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकृपा दाखवली आहे. सन २०१९मध्ये खरीप हंगामादरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यानंतर मार्च २०२०मध्येदेखील जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चोपडा, जळगाव, यावल व अमळनेर या तालुक्यांमध्येही रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासह २०२०मध्येही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामाच्या उत्पादनात पन्नास टक्के घट झाली. आता पुन्हा अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. यासह जळगाव तालुक्यातील गिरणा पट्ट्यातील केळी बागांचेही शनिवारी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.