शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कापूस वेचणीमुळे शाळा ओस

By admin | Updated: November 20, 2014 14:41 IST

मजुरांची कमतरता व मजुरीचे चढते दर लक्षात घेता पाहुणे म्हणून आलेल्या मंडळींसह शाळकरी विद्यार्थी शेतात कापूस वेचणीसाठी जात असल्याचे चित्र दिसत आहे.

शिरपूर : तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. असे असतानाही मजुरांची कमतरता व मजुरीचे चढते दर लक्षात घेता पाहुणे म्हणून आलेल्या मंडळींसह शाळकरी विद्यार्थी शेतात कापूस वेचणीसाठी जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे बहुतांश शाळा ओस पडल्याचे चित्र जाणवत आहे.गेल्या महिन्यापासून सर्वत्र कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. तालुक्यात अतवृष्टीने यावर्षी मोठय़ा प्रमाणावर कापूस पिकाला फटका बसला आहे. तशातच कापसाचे उत्पन्न समाधानकारक नाही. या पिकावरच शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन असते. कापसाची कमी आवक लक्षात घेता मजुरी देणेही शेतकर्‍यांना परवडत नसल्याने माहेरी आलेल्या मुली शेतावर जाऊन कापूस वेचत आहेत. तसेच त्यांच्या समवेत त्यांची मुलेही त्यांना मदत करीत आहेत.शाळेची पटसंख्या घटलीशिरपूर तालुक्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या १९ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १ हजारापर्यंत विद्यार्थी, तर ७३ माध्यमिक शाळेमधील पटसंख्या २२ हजारांपर्यंत एकंदरीत या शाळेतील ४0 ते ४५ टक्केच्यावर विद्यार्थी कापूस वेचणीला शेतात जाताना दिसत असल्यामुळे बहुतांश शाळेतील पटसंख्या कमी झालेली आहे. दुपारनंतर अन्य विद्यार्थ्यांची दांडीग्रामीण भागातील शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी कापूस वेचणीला जात असल्यामुळे बोटावर मोजण्याएवढेच विद्यार्थी शाळेत येत आहे, तेही मधल्या सुट्टीनंतर गायब होत असल्याचे चित्र आहे. कापूस वेचून प्रत्येक विद्यार्थी किमान १00 ते ३00 रुपयांपर्यंत मजुरी मिळवत आहे. मुलांना दिवाळीची सुटी लागल्यापासून ते कापूस वेचणीला जात आहे. पैसा मिळत असल्यामुळे त्यांनी शाळेला दांडी मारल्याचीही चर्चा आहे. दिवाळीनंतर शाळा उघडूनसुद्धा मुले अद्यापही कापूस वेचणी करीत आहेत. साधारणत: डिसेंबर अखेरपर्यंत विद्यार्थ्यांची कापूस वेचणीमुळे शाळेला दांडी असेल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे डिसेंबरनंतरच शाळा पुन्हा गर्दीने फुलणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.

------------

कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी शेतमालाला भाव नाही. अशा दुष्टचक्रात बळीराजा सापडला आहे. शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहात होते. मात्र, आता कापूस लागवडीसाठी लागणारा खर्च, मजुरी पाहता मिळणारा भाव अत्यल्प असल्यामुळे शेतकर्‍यांना कापूस पीक परवडेनासे झाले आहे.