शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

‘खरूज’म्हणजे आजार नाही, तर किड्यामुळे होणारा संसर्ग

By अमित महाबळ | Updated: September 17, 2022 17:30 IST

खरूज हा आजार किंवा रोग नसून तो एक प्रकारचा संसर्ग आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो.

जळगाव - अनेकांना खरूज हा शब्द खाज एवढाच माहीत असतो. काहीजण इसम (eczema) याला खरूज म्हणतात पण खरे तर खरूज म्हणजे एका छोट्या किड्यामुळे शरीरावर झालेला संसर्ग असतो. हा किडा फक्त त्वचेवरच असतो आणि खाजेशिवाय तो शरीराला वेगळा काही त्रास देत नाही. पण त्यावर वेळीच उपाय न केल्यास जखमा होऊ शकतात. खरूज हा आजार किंवा रोग नसून तो एक प्रकारचा संसर्ग आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो.

काय आहे हा किडा?

पूर्वी हा किडा (Sarcoptes Scbiei Mite) फक्त प्राणी (पाळीव प्राणी - कुत्रा, मांजर) आणि जनावरांमध्ये आढळायचा, मात्र १७ व्या शतकात तो मानवी शरीरावर प्रामुख्याने दिसून आला. हा किडा डोळ्यांना न दिसणारा असून, एकदा संपर्क झाला की त्वचेच्या वरील भागात शिरून आपले घर तयार करतो. तो एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्वचेवर काहीतरी फिरल्यासारखे वाटून खाज यायला लगते.

जळगावमध्ये ३० टक्के प्रमाण

- १० वर्षांवरील लहान मुलांमध्ये याचे लक्षण पूर्ण शरीरभर दिसून येते. १० वर्षांनंतर याची लक्षणे मानेच्या खाली पूर्ण शरीरावर आढळून येतात. हा संसर्ग शाळेतील मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतो. जळगावमध्ये याचे प्रमाण ३० टक्के आहे.

- कुटुंबातील एका व्यक्तीला खरूज झाली की त्या कुटुंबातील लहान मुलांना पहिल्यांदा संसर्ग होतो आणि मग इतरांना. कारण एकाच्या शरीरावरून दुसऱ्या शरीरावर हा किडा जातो.

संसर्ग कसा होतो?

- हा किडा सगळ्यात पहिल्यांदा जिथे दुमडलेली त्वचा असते तेथून पूर्ण शरीरभर पसरत जातो.- सगळ्यात पहले लक्षण हे हाताच्या बोटांमध्ये, दुमडलेली त्वचा आणि मनगटावर दिसते.- ‘एस’आकारचे व्रण, जे लालसर आणि पुटकुळ्यांसारखे वाटतात.- पहिल्या १० दिवसांत या पुटकुळ्या पूर्ण शरीरभर दिसतात.

लक्षणे

- दिवस-रात्र कधीही याची खाज अंगाला येत राहते. पण अति खाजेमुळे त्वचेला जखम होऊ शकते.- अंगाला लाल पुटकुळ्या येतात, सतत हात व त्वचा खाजवणे हे या रुग्णांमध्ये दिसते.

काय घ्यावी काळजी

- शरीराची स्वच्छता- दररोज स्वच्छ पाण्याने आंघोळ- घरातील पाळीव प्राण्यांची स्वच्छता- पाळीव प्राण्यांना खरूज असेल तर ती ठीक होईपर्यंत घरातील त्यांचा वावर टाळणे.- आपल्या घरात जर कोणाला खरूज झाली असेल तर त्याचे टॉवेल, साबण, कपडे, बेडशीट, अंथरूण, पांघरूण संसर्ग बरा होईपर्यंत सर्व वेगळे ठेवावे.

डॉक्टर म्हणतात 

खरूजचे योग्य निदान न करता काही व्यक्ती वेगवेगळे मलम, औषधी बाजारातून आणून स्वतःच्या मनाने लावतात आणि त्वचा अजून खराब करून घेतात. योग्य निदान हे फक्त त्वचारोग तज्ज्ञ करू शकतात. ज्ञानाला अनुभवाची जोड लागते. हा किडा एका दिवसात निघून जाणारा नाही. त्यामुळे त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधी घ्यावीत व घरातील संसर्ग टाळावा, असे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील त्वचारोग सल्लागार डॉ. कोमल गव्हाणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव