शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘खरूज’म्हणजे आजार नाही, तर किड्यामुळे होणारा संसर्ग

By अमित महाबळ | Updated: September 17, 2022 17:30 IST

खरूज हा आजार किंवा रोग नसून तो एक प्रकारचा संसर्ग आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो.

जळगाव - अनेकांना खरूज हा शब्द खाज एवढाच माहीत असतो. काहीजण इसम (eczema) याला खरूज म्हणतात पण खरे तर खरूज म्हणजे एका छोट्या किड्यामुळे शरीरावर झालेला संसर्ग असतो. हा किडा फक्त त्वचेवरच असतो आणि खाजेशिवाय तो शरीराला वेगळा काही त्रास देत नाही. पण त्यावर वेळीच उपाय न केल्यास जखमा होऊ शकतात. खरूज हा आजार किंवा रोग नसून तो एक प्रकारचा संसर्ग आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो.

काय आहे हा किडा?

पूर्वी हा किडा (Sarcoptes Scbiei Mite) फक्त प्राणी (पाळीव प्राणी - कुत्रा, मांजर) आणि जनावरांमध्ये आढळायचा, मात्र १७ व्या शतकात तो मानवी शरीरावर प्रामुख्याने दिसून आला. हा किडा डोळ्यांना न दिसणारा असून, एकदा संपर्क झाला की त्वचेच्या वरील भागात शिरून आपले घर तयार करतो. तो एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्वचेवर काहीतरी फिरल्यासारखे वाटून खाज यायला लगते.

जळगावमध्ये ३० टक्के प्रमाण

- १० वर्षांवरील लहान मुलांमध्ये याचे लक्षण पूर्ण शरीरभर दिसून येते. १० वर्षांनंतर याची लक्षणे मानेच्या खाली पूर्ण शरीरावर आढळून येतात. हा संसर्ग शाळेतील मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतो. जळगावमध्ये याचे प्रमाण ३० टक्के आहे.

- कुटुंबातील एका व्यक्तीला खरूज झाली की त्या कुटुंबातील लहान मुलांना पहिल्यांदा संसर्ग होतो आणि मग इतरांना. कारण एकाच्या शरीरावरून दुसऱ्या शरीरावर हा किडा जातो.

संसर्ग कसा होतो?

- हा किडा सगळ्यात पहिल्यांदा जिथे दुमडलेली त्वचा असते तेथून पूर्ण शरीरभर पसरत जातो.- सगळ्यात पहले लक्षण हे हाताच्या बोटांमध्ये, दुमडलेली त्वचा आणि मनगटावर दिसते.- ‘एस’आकारचे व्रण, जे लालसर आणि पुटकुळ्यांसारखे वाटतात.- पहिल्या १० दिवसांत या पुटकुळ्या पूर्ण शरीरभर दिसतात.

लक्षणे

- दिवस-रात्र कधीही याची खाज अंगाला येत राहते. पण अति खाजेमुळे त्वचेला जखम होऊ शकते.- अंगाला लाल पुटकुळ्या येतात, सतत हात व त्वचा खाजवणे हे या रुग्णांमध्ये दिसते.

काय घ्यावी काळजी

- शरीराची स्वच्छता- दररोज स्वच्छ पाण्याने आंघोळ- घरातील पाळीव प्राण्यांची स्वच्छता- पाळीव प्राण्यांना खरूज असेल तर ती ठीक होईपर्यंत घरातील त्यांचा वावर टाळणे.- आपल्या घरात जर कोणाला खरूज झाली असेल तर त्याचे टॉवेल, साबण, कपडे, बेडशीट, अंथरूण, पांघरूण संसर्ग बरा होईपर्यंत सर्व वेगळे ठेवावे.

डॉक्टर म्हणतात 

खरूजचे योग्य निदान न करता काही व्यक्ती वेगवेगळे मलम, औषधी बाजारातून आणून स्वतःच्या मनाने लावतात आणि त्वचा अजून खराब करून घेतात. योग्य निदान हे फक्त त्वचारोग तज्ज्ञ करू शकतात. ज्ञानाला अनुभवाची जोड लागते. हा किडा एका दिवसात निघून जाणारा नाही. त्यामुळे त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधी घ्यावीत व घरातील संसर्ग टाळावा, असे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील त्वचारोग सल्लागार डॉ. कोमल गव्हाणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव