शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

‘खरूज’म्हणजे आजार नाही, तर किड्यामुळे होणारा संसर्ग

By अमित महाबळ | Updated: September 17, 2022 17:30 IST

खरूज हा आजार किंवा रोग नसून तो एक प्रकारचा संसर्ग आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो.

जळगाव - अनेकांना खरूज हा शब्द खाज एवढाच माहीत असतो. काहीजण इसम (eczema) याला खरूज म्हणतात पण खरे तर खरूज म्हणजे एका छोट्या किड्यामुळे शरीरावर झालेला संसर्ग असतो. हा किडा फक्त त्वचेवरच असतो आणि खाजेशिवाय तो शरीराला वेगळा काही त्रास देत नाही. पण त्यावर वेळीच उपाय न केल्यास जखमा होऊ शकतात. खरूज हा आजार किंवा रोग नसून तो एक प्रकारचा संसर्ग आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो.

काय आहे हा किडा?

पूर्वी हा किडा (Sarcoptes Scbiei Mite) फक्त प्राणी (पाळीव प्राणी - कुत्रा, मांजर) आणि जनावरांमध्ये आढळायचा, मात्र १७ व्या शतकात तो मानवी शरीरावर प्रामुख्याने दिसून आला. हा किडा डोळ्यांना न दिसणारा असून, एकदा संपर्क झाला की त्वचेच्या वरील भागात शिरून आपले घर तयार करतो. तो एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्वचेवर काहीतरी फिरल्यासारखे वाटून खाज यायला लगते.

जळगावमध्ये ३० टक्के प्रमाण

- १० वर्षांवरील लहान मुलांमध्ये याचे लक्षण पूर्ण शरीरभर दिसून येते. १० वर्षांनंतर याची लक्षणे मानेच्या खाली पूर्ण शरीरावर आढळून येतात. हा संसर्ग शाळेतील मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतो. जळगावमध्ये याचे प्रमाण ३० टक्के आहे.

- कुटुंबातील एका व्यक्तीला खरूज झाली की त्या कुटुंबातील लहान मुलांना पहिल्यांदा संसर्ग होतो आणि मग इतरांना. कारण एकाच्या शरीरावरून दुसऱ्या शरीरावर हा किडा जातो.

संसर्ग कसा होतो?

- हा किडा सगळ्यात पहिल्यांदा जिथे दुमडलेली त्वचा असते तेथून पूर्ण शरीरभर पसरत जातो.- सगळ्यात पहले लक्षण हे हाताच्या बोटांमध्ये, दुमडलेली त्वचा आणि मनगटावर दिसते.- ‘एस’आकारचे व्रण, जे लालसर आणि पुटकुळ्यांसारखे वाटतात.- पहिल्या १० दिवसांत या पुटकुळ्या पूर्ण शरीरभर दिसतात.

लक्षणे

- दिवस-रात्र कधीही याची खाज अंगाला येत राहते. पण अति खाजेमुळे त्वचेला जखम होऊ शकते.- अंगाला लाल पुटकुळ्या येतात, सतत हात व त्वचा खाजवणे हे या रुग्णांमध्ये दिसते.

काय घ्यावी काळजी

- शरीराची स्वच्छता- दररोज स्वच्छ पाण्याने आंघोळ- घरातील पाळीव प्राण्यांची स्वच्छता- पाळीव प्राण्यांना खरूज असेल तर ती ठीक होईपर्यंत घरातील त्यांचा वावर टाळणे.- आपल्या घरात जर कोणाला खरूज झाली असेल तर त्याचे टॉवेल, साबण, कपडे, बेडशीट, अंथरूण, पांघरूण संसर्ग बरा होईपर्यंत सर्व वेगळे ठेवावे.

डॉक्टर म्हणतात 

खरूजचे योग्य निदान न करता काही व्यक्ती वेगवेगळे मलम, औषधी बाजारातून आणून स्वतःच्या मनाने लावतात आणि त्वचा अजून खराब करून घेतात. योग्य निदान हे फक्त त्वचारोग तज्ज्ञ करू शकतात. ज्ञानाला अनुभवाची जोड लागते. हा किडा एका दिवसात निघून जाणारा नाही. त्यामुळे त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधी घ्यावीत व घरातील संसर्ग टाळावा, असे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील त्वचारोग सल्लागार डॉ. कोमल गव्हाणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव