शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

तृप्त झाले मन.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 22:41 IST

संत आत्मज्ञानी असतात म्हणून त्यांना ईश्वराचे यथार्थ रुप ज्ञान असते. निसर्ग आणि दृश्य जग यांच्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना संत नाहीशा ...

संत आत्मज्ञानी असतात म्हणून त्यांना ईश्वराचे यथार्थ रुप ज्ञान असते. निसर्ग आणि दृश्य जग यांच्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना संत नाहीशा करतात. मोठे ध्येय साधण्यासाठी मोठे श्रम लागतात. ईश्वरप्राप्ती हे फार मोठे ध्येय आहे. अर्थात् त्याच्या दर्शनासाठी फार श्रम करणे अवश्य आहे. म्हणून पुष्कळ लोक तीर्थयात्रा करीत असतात. समर्थ रामदास स्वामींच्या मते देव कसा आहे, याचा शोध घेणारा पुरुष हजारोंमध्ये एखादाच निघतो. ईश्वराचे स्वरुप समजून घेताना एक ध्यानात ठेवावे की, ईश्वर हा काही एखादी व्यक्ती नव्हे. त्याला मानवशरीर व मानवधर्म नाही. अवताराला मानव शरीर असते पण त्याचे त्या शरीराशी तादात्त्म्य नसते. अवतार मानव देहात राहतो पण देहाला तो सीमीत होत नाही. सर्व देहांमध्ये समर्पणाने राहणाऱ्या देहबुद्धी नसते. आत्मबुद्धी असते. ईश्वर सर्व कर्ता आहे. त्याच्या संकल्पाने निर्माण झालेले जग त्याच्या ईशाºयावर चालते. तोच विश्वाचा नियंता व संचालक आहे. तो विश्वाचा आधी होता, सध्या विश्वामध्ये विद्यमान आहे, आणि निरंतर राहणार आहे. जीवांच्या हृदयात तो आत्मरुपाने विलसतो. विश्वाच्या अंर्तयामी तोच ईश्वर म्हणून संचालन करतो आणि सद्रुप परब्रह्म परमात्मा म्हणून तोच विश्व पार करुन राहतो.खरा देव निश्चल आहे. तो सर्वगुण संपन्न, सर्वज्ञ व सर्वशक्तीमान आहे. त्या व्यतिरिक्त कोणासही ईश्वर मानणे हा अविद्याजन्य भ्रम समजावा.- दादा महाराज जोशी, जळगाव.

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव