शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

तृप्त झाले मन.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 22:41 IST

संत आत्मज्ञानी असतात म्हणून त्यांना ईश्वराचे यथार्थ रुप ज्ञान असते. निसर्ग आणि दृश्य जग यांच्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना संत नाहीशा ...

संत आत्मज्ञानी असतात म्हणून त्यांना ईश्वराचे यथार्थ रुप ज्ञान असते. निसर्ग आणि दृश्य जग यांच्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना संत नाहीशा करतात. मोठे ध्येय साधण्यासाठी मोठे श्रम लागतात. ईश्वरप्राप्ती हे फार मोठे ध्येय आहे. अर्थात् त्याच्या दर्शनासाठी फार श्रम करणे अवश्य आहे. म्हणून पुष्कळ लोक तीर्थयात्रा करीत असतात. समर्थ रामदास स्वामींच्या मते देव कसा आहे, याचा शोध घेणारा पुरुष हजारोंमध्ये एखादाच निघतो. ईश्वराचे स्वरुप समजून घेताना एक ध्यानात ठेवावे की, ईश्वर हा काही एखादी व्यक्ती नव्हे. त्याला मानवशरीर व मानवधर्म नाही. अवताराला मानव शरीर असते पण त्याचे त्या शरीराशी तादात्त्म्य नसते. अवतार मानव देहात राहतो पण देहाला तो सीमीत होत नाही. सर्व देहांमध्ये समर्पणाने राहणाऱ्या देहबुद्धी नसते. आत्मबुद्धी असते. ईश्वर सर्व कर्ता आहे. त्याच्या संकल्पाने निर्माण झालेले जग त्याच्या ईशाºयावर चालते. तोच विश्वाचा नियंता व संचालक आहे. तो विश्वाचा आधी होता, सध्या विश्वामध्ये विद्यमान आहे, आणि निरंतर राहणार आहे. जीवांच्या हृदयात तो आत्मरुपाने विलसतो. विश्वाच्या अंर्तयामी तोच ईश्वर म्हणून संचालन करतो आणि सद्रुप परब्रह्म परमात्मा म्हणून तोच विश्व पार करुन राहतो.खरा देव निश्चल आहे. तो सर्वगुण संपन्न, सर्वज्ञ व सर्वशक्तीमान आहे. त्या व्यतिरिक्त कोणासही ईश्वर मानणे हा अविद्याजन्य भ्रम समजावा.- दादा महाराज जोशी, जळगाव.

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव