शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

साडेतीनशे गावांच्या सरपंचपदाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST

जितेंद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद, ता. जळगाव : संभाव्य घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी निवडणुकीनंतरच सरपंचपदाचे आरक्षण काढण्यावर ठाम राहिलेल्या ...

जितेंद्र पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद, ता. जळगाव : संभाव्य घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी निवडणुकीनंतरच सरपंचपदाचे आरक्षण काढण्यावर ठाम राहिलेल्या शासनाच्या नव्या आदेशामुळे जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. निवडणुकीतील रंगही फिका पडला होता. मात्र, त्याच शासनाने आता जिल्ह्यातील सुमारे साडेतीनशे ग्रामपंचायतींच्या निवडणुका झालेल्या नसतानाही सरपंचपदाचे आरक्षण घोषित केल्याने नवनिर्वाचित सदस्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्यावर सर्वसाधारण, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती व जमाती संवर्गातील लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाकडून सरपंचपदाची आरक्षण सोडत दरवेळी काढली जाते. जिल्ह्यातील सुमारे ७८१ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक घोषित झाल्यानंतर संबंधित सर्व इच्छुक उमेदवारांमध्येही त्यानुसार सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा होती. प्रत्यक्षात ग्रामविकास विभागाच्या तातडीच्या निर्णयान्वये सरपंचपदाच्या आरक्षणाला बगल देऊन थेट ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राबविण्यात आला. प्रत्येकवेळी आधी सरपंचपदाचे आरक्षण नंतर ग्रामपंचायतीची निवडणूक असा पायंडा असताना नेमकी यावेळी उलट परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांचा मोठा हिरमोड झाला. निवडणुकांमध्ये नेहमी दिसून येणारा जल्लोष अचानक हरवला. शासनाच्या निर्णयाबद्दल सर्वत्र तीव्र शब्दात नाराजीसुद्धा व्यक्त करण्यात आली. एकूण सर्व गोंधळात एकदाची ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. निवडणुकीनंतर उशिरा का होईना सरपंचपदाचे आरक्षण घोषित झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा जीव भांड्यात पडला असला तरी शासनाने या धामधुमीत अद्याप निवडणूक न झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचेही आरक्षण घोषित करून टाकले आहे.

---------------

जळगावमधील ३४४ ग्रामपंचायतीचा समावेश

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या सुमारे ११२५ इतकी आहे. त्यापैकी ७८१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया १५ जानेवारीला पार पडली. शासनाच्या सुधारित आदेशानुसार निकालानंतर तेवढ्याच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण काढणे अपेक्षितही होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने सरसकट ११२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण घोषित करून टाकले आहे. त्यातील तब्बल ३४४ ग्रामपंचायतींची निवडणूक अजून दीड ते दोन वर्षांवर आहे. त्या ठिकाणी निवडणूकपूर्व सरपंचपदाचे आरक्षण घोषित करून शासनाने काय साध्य केले आहे. नियम सर्वांना सारखा का लावला नाही, तिथे आता घोडेबाजार होणार नाही का, असे काही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

---------------------

(कोट)

शासनाच्या सुधारित आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या सूचनेवरून नुकत्याच निवडणूक झालेल्या व आगामी काळात निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.

- शशिकांत सोनवणे, गटविकास अधिकारी, जळगाव