शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दिवाळीत फटाके विक्रेत्यांवर यंदा संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 21:31 IST

यंदा कोरोनाच्या भीतीमुळे आणि शासनाच्या विदेशी व अनधिकृत फटाक्यांच्या बंदीच्या आदेशामुळे ऐन दिवाळीत फटाके विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. गर्दी अपेक्षित असताना ग्राहक फिरकेनासे झाले आहेत.

ठळक मुद्देवसूबारस येऊनदेखील गिऱ्हाईक फिरकेनासे झाले स्वस्तात फटाके विकण्याचा निर्णय

अमळनेर : यंदा कोरोनाच्या भीतीमुळे आणि शासनाच्या विदेशी व अनधिकृत फटाक्यांच्या बंदीच्या आदेशामुळे ऐन दिवाळीत फटाके विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. गर्दी अपेक्षित असताना ग्राहक फिरकेनासे झाले आहेत.दिवाळीच्या सात दिवस अगोदर फटाक्यांची विक्री जोरदार सुरू झालेली असायची लहान मुलांसह हौशी मोठी माणसेदेखील गर्दी करत होती. मात्र हिवाळ्यात फटाक्यांच्या प्रदूषणामुळे अस्थमा, सर्दी, खोकला आदी आजार वाढून कोरोनाच्या संसर्गाला आमंत्रण असल्याचे काही आरोग्य संघटनांनी जाहीर केले. चक्कर, भुईनळे, नागगोळी, फुलबाज्या यामुळे दूषित वायू बाहेर पडून अधिक प्रदूषण होते. त्यामुळे यंदा मोठ्या शहरात फटाके फोडण्याला बंदी घालण्यात आली आहे. तसेच विदेशी व अनधिकृत फटाके विक्री अथवा साठा करताना आढळल्यास कारवाईचे संकेत शासनाने दिल्याने यंदा अमळनेरात फटाके विक्रेत्यांनी फक्त २५ टक्के माल मागवला आहे. काही दुकानदारांनी आपली दुकानेच मांडलेली नाहीत.वसूबारस येऊनदेखील गिऱ्हाईक फिरकेनासे झाले आहे. दुकानदार देवाप्रमाणे ग्राहकांची वाट बघत आहेत. येत्या तीन-चार दिवसाच्या दिवाळी कालावधीत व्यवसाय होईल की नाही, याचं चिंतेत दुकानदार आहेत. यावर्षी चायना फटाके, देवी देवतांची चित्रे असलेली फटाके बंद करण्यात आली असल्याने मुलांचे आकर्षणदेखील संपले आहे तर १८ टक्के जीएसटी करामुळे किंमती वाढल्या तरी स्वस्तात फटाके विकण्याचा निर्णय फटाके विक्रेत्यांनी घेतला आहे.

दिवाळी आली तरी कालपर्यंत बोहणी झालेली नव्हती. आज वसूबारसला मोजके ग्राहक फिरकले. २५ टक्के मालसुद्धा विक्री होणार नाही.-अमोल येवले, फटाके विक्रेता, अमळनेर

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मुले वृद्धांसह यांची श्वसन यंत्रणा चांगली ठेवणे आवश्यक असल्याने फटाके न फोडण्याचा निर्णय योग्य राहील. -जयेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता, अमळनेर

टॅग्स :Amalnerअमळनेर