शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

अभयारणे, जलाशये, वने, नद्या याकडे लक्ष देणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

संकेत पाटील खिर्डी, ता. रावेर : जळगाव जिल्ह्यातील पर्यावरणात गेल्या पाच वर्षात मोठा बदल झाला असून, जिल्ह्यातील अभयारणे, ...

संकेत पाटील

खिर्डी, ता. रावेर : जळगाव जिल्ह्यातील पर्यावरणात गेल्या पाच वर्षात मोठा बदल झाला असून, जिल्ह्यातील अभयारणे, जलाशये, वने, नद्या याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावल अभयारण्यात वणवे रोजच लागत असतात; मात्र प्रशासनाच्या हाती राखच लागत असते. परिणामी जीवसृष्टीची मोठी हानी नाकारता येत नाही. मात्र उपाययोजना कागदावरच खऱ्या ठरत आहेत.

जलाशये समृद्धीबरोबरच जैवविविधतेने नटली असली तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कोणतीही माहिती वा अभ्यास प्रशासन करत नाही. हतनूर जलाशयाला राज्यात रामसर दर्जा मिळवण्यासाठी अनेक जिल्ह्यातील अभ्यासक येथे हजेरी लावत असतात, मात्र जिल्ह्यातील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

नदी-नाल्यांचे संवर्धन करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. जलसाठा कमी होऊ नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

२०१५-१६

१. जंगलातील वणवे कमी प्रमाणात होते.

२. जलाशयावर जैवविविधता व पक्षी, प्राणी संपत्ती वाढली होती.

३. जलसाठा हा जमिनीत मुरला जात होता.

२०२०-२१

१. या काळात जंगले वाळवंट होण्याच्या मार्गावर आहेत.

२. जलाशये जैवविविधतेने नटले असले तरी दुर्मीळ पक्षी कमी झाले आहेत.

३. जमिनीवर रासायनिक प्रभाव पडल्याने जलसाठा कमी प्रमाणात मुरत आहे.

ऑक्सिजन पार्क काळाची गरज

जिल्ह्यात हवा, पाणी आणि वृक्षसंवर्धनासाठी ऑक्सिजन पार्क काळाची गरज ठरत आहे. जिल्ह्यांमध्ये प्रत्येक गावात ऑक्सिजन पार्क होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने ऑक्सिजन पार्कमध्ये देशी भारतीय वनस्पतींची लागवड त्यामध्ये पिंपळ, आंबा, उंबर, लिंब, साग यांसारखी अनेक वनस्पतींची रोपे लावून विविध फुलझाडे, आयुर्वेदिक वनस्पती, परसबागेतील झाडे असे मिळून ऑक्सिजन पार्क बनवणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावात पर्यावरण समतोल त्याचप्रमाणे शुद्ध हवा देण्याचं काम करत असते. याचा फायदा गावाच्या जैवविविधतेसाठी पशुपक्षी यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात होत असतो.

जिल्ह्यातील ऑक्सिजन पार्कला आता ऑक्सिजनची गरज भासत आहे. कारण त्यात लावलेल्या झाडांच्या संगोपनाची गरज असते, तेव्हाच ऑक्सिजन पार्क आपल्यासाठी फायदेशीर आहे. काही ऑक्सिजन पार्क फक्त कागदोपत्री असल्याने हवेतच बरी आहे.

वर्षभरातील पर्यावरणात झालेला बदल हा मानवीय आरोग्याला त्रासदायक ठरला आहे. दमा, अस्थमा आजाराला अनेक रुग्णांना समोर जावे लागलेय. वर्षभरात फक्त भारतातच नाही तर जगभरात विविध ठिकाणांहून अनेक घटना समोर आल्या. हिमाचल प्रदेशमधील ग्लेशियर फुटणे तर पश्चिमेकडे अंटार्टिकाचा मोठा हिमखंड तुटून वेगळा होणे आणि अशा कित्येक घटना आहेत. पर्यावरणाकडे आणि निसर्गाकडे एकंदर दुर्लक्ष होत असल्याने समोर येणारी ही लक्षणं आहेत म्हणून या वेळेस पारिस्थितिक पुनर बहाली म्हणजेच एन्व्हायरमेंटल रिस्टोरेशन ही थीम राबविण्याचा मानस आहे.

लॉकडाऊन आधी हवामानातील बदल

लॉकडाऊन आधी एअर क्वॉलिटी इंडेक्स ही १८० पॉइंटच्या मध्ये होती. मात्र लॉकडाऊननंतर यात जवळपास ४० ते ५० टक्‍क्‍यांनी घटदेखील झाली होती. यामुळे हवेतील प्रदूषण नक्कीच कमी झालेले होते.

लॉकडाऊननंतर...

‘अनलॉक’नंतर पुन्हा एअर क्वाॅलिटी इंडेक्स म्हणजेच हवेतील प्रदूषणाचा स्तर हा १०० ते १६० पॉइंटच्या मध्ये येण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे ३५ ते ६० दरम्यान जास्त स्तर ठीक मानला जातो; पण साठपासून शंभरपर्यंत हा प्रदूषणाचा स्तर जास्त झाल्याचे संकेत देतो. मात्र जेव्हा शंभरावर आणि दोनशेच्या आसपास जातो तेव्हा तर गंभीर मानला जातो.

प्रतिक्रिया

लॉकडाऊन आधी एअर क्वाॅलिटी इंडेक्स हा १८० पॉइंटमध्ये होता; मात्र लॉकडाऊननंतर यात ४० ते ५० टक्के घट झाली असून, प्रदूषणाचा स्तर शंभरावर गेल्यावर गंभीर मानला जातो.

- नीलेश गोरे, हवामान अभ्यासक, भुसावळ

छायाचित्रे -. काही दिवसांपूर्वी सातपुड्यात लागलेला वणवा व सातपुड्यातील मनोहरी दृश्य.