शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाघूरच्या पाण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:39 IST

भुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील शेतीला वाघूर धरणातून पाणी मिळावे यासाठी आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन मागणी केली आहे, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शेतकºयांच्या बैठकीत दिली व या मागणीसाठी आपण मुंबई येथे मंत्री महाजन यांची भेट घेऊन पुन्हा पाठपुरावा करू, असे आश्वासनही नागरिकांना दिले.

ठळक मुद्देकुºहे (पानाचे) येथील शेतकरी जलसंपदा मंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेण्याच्या तयारीतआमदार संजय सावकारे यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील शेतीला वाघूर धरणातून पाणी मिळावे यासाठी आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन मागणी केली आहे, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शेतकºयांच्या बैठकीत दिली व या मागणीसाठी आपण मुंबई येथे मंत्री महाजन यांची भेट घेऊन पुन्हा पाठपुरावा करू, असे आश्वासनही नागरिकांना दिले.यावेळी व्यासपीठावर जि.प.चे माजी सदस्य समाधान पवार, सरपंच रामलाल बडगुजर, पं.स.च्या माजी सदस्या अलका पारधी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश जोशी, नारायण सपकाळे, फेकरी येथील प्रशांत निकम, ग्रामविकास अधिकारी पी.टी. झोपे आदी उपस्थित होते.शेतीला वाघुर धरणातील बॅक वाटरचे पाणी उपसा सिंचनाद्वारे मिळू शकते. त्यासाठी गावाची पाणी समिती स्थापन करून व त्याचे बील शेतकºयांना भरावे लागेल,अशी माहिती आमदार सावकारे यांनी या बैठकीत दिली. यासंदर्भात महाजन व अधिकाºयांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.दरम्यान, जलसंपदामंत्री महाजन यांची व अधिकाºयांचे मुंबई येथे बैठक घेऊ. या बैठकीसाठी आपण काही लोक मुंबईला या, अशी सूचना आ.सावकारे यांनी केली. त्यावेळी जि.प.सदस्य माजी सदस्य पवार व सुभाष पाटील यांनी बैठकीसाठी येण्याचे मान्य केले . त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या घरावर कुºहे पानाचे येथून पायी मोर्चा नेण्याचा इशारा शेतकºयांनी दिला.दरम्यान, कुºहे पानाचे येथे ओझरखेडा प्रकल्पातून शेतीला पाणी मिळणार असल्याची माहिती आ.सावकारे यांनी दिली. यावेळी जि.प.माजी सदस्य पवार यांनी या प्रकल्पाचे पाणी निम्मे क्षेत्राला मिळणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी त्यांनी उर्वरित भागातसुद्धा आपण पाईपलाईन टाकून त्या भागालाही सिंचनाखाली आणू, असे आश्वासन दिले, तर सुभाष पाटील यांनी पाच ते सहा इंची पाइपलाइन टाकून प्रकल्पातूनच टाका व येथील प्रकल्प भरून देण्याची व्यवस्था करा, अशी मागणी केली. त्यावेळी आ.सावकारे यांनी वाघुर प्रकल्पातूनही शेतीसाठी पाणी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.प्रास्ताविक किरण कळसकर यांनी केले. ग्रा.पं.सदस्य नारायण कोळी, विलास चौधरी, जितेंद्र नागपुरे, शिवाजी विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन राजू पाटील, किशोर वराडे, बंडू वराडे, प्रमोद उंबरकर, प्रवीण नागपुरे, सुरेश पाटील, भास्कर चौधरी , भागवत टोंगळे, रवींद्र पाटील, शेषराव पाटील, नाना गांधेले, माणिक गांधेले, दिनकर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ