शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जे पेराल तेच परत मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:01 IST

आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे डॉ.विश्वास पाटील यांचे प्रतिपादनआज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वार्थापोटी तो नाती जपतो.सरस्वती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प

चाळीसगाव, जि.जळगाव : आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले.येथील ना.बं. वाचनालयात सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी गुंफले. संवेदनशीलता आणि आपण हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रास्ताविक संचालक विश्वास देशपांडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रकाश कुलकर्णी यांनी करून दिला. वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रीतमदास रावलानी यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले.आपला विषय स्पष्ट करताना प्रा. पाटील यांनी प्राचीन काळापासून तर आजपर्यंतच्या अनेक गोष्टींचे दाखले दिले. आयुष्यभर घाणीत राहणाऱ्या माणसाला अत्तराचा सुगंधी वासदेखील नकोसा वाटतो. संवेदनशीलता आणि आपले असेच नाते आहे. आज जग क्रेता आणि विक्रेता अशा दोन भागात विभागले गेले आहे. प्रत्येकजण जग ही जणू काही बाजारपेठ असल्यासारखे वागतो. पण मानवी जीवनातील नाती, नात्यातील प्रेम, विश्वास या गोष्टी विकत घेता येत नाहीत. आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वार्थापोटी तो नाती जपतो. रामायणात गूह आणि शबरी हे दोन समाजातील खालच्या वर्गाचे प्रतिनिधी आहेत. त्यांना रामाने उराशी धरले. कुंतीने कृष्णाकडे मला सदैव विपरीत परिस्थितीत ठेव असे वरदान मागितले. कारण आपल्यावर संकटे आली किंवा विपरीतआली तर आपल्याला देवाची आठवण येते. आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथार्पोटी तो नाते जपतो. रामायणात गूह आणि शबरी हे दोन समाजातील खालच्या वगार्चे प्रतिनिधी आहेत. त्यांना रामाने उराशी धरले. कुंतीने कृष्णाकडे मला सदैव विपरीत परिस्थितीत ठेव असे वरदान मागितले. कारण आपल्यावर संकटे आली किंवा विपरीत परिस्थिती आली तरच आपल्याला देवाची आठवण येते.आभार वाचनालयाचे संचालक राजेश ठोंबरे यांनी मानले. व्याख्यानमालेचे प्रायोजक भोजराज पुन्शी आणि सदरच्या व्याख्यानाचे प्रायोजक डॉ.सुभाष निकुंभ यांचेही त्यांनी आभार मानले. व्याख्यानमालेचे प्रमुख मनीष शहा व अन्य संचालक यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकChalisgaonचाळीसगाव