शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

जे पेराल तेच परत मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:01 IST

आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे डॉ.विश्वास पाटील यांचे प्रतिपादनआज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वार्थापोटी तो नाती जपतो.सरस्वती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प

चाळीसगाव, जि.जळगाव : आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले.येथील ना.बं. वाचनालयात सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी गुंफले. संवेदनशीलता आणि आपण हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रास्ताविक संचालक विश्वास देशपांडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रकाश कुलकर्णी यांनी करून दिला. वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रीतमदास रावलानी यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले.आपला विषय स्पष्ट करताना प्रा. पाटील यांनी प्राचीन काळापासून तर आजपर्यंतच्या अनेक गोष्टींचे दाखले दिले. आयुष्यभर घाणीत राहणाऱ्या माणसाला अत्तराचा सुगंधी वासदेखील नकोसा वाटतो. संवेदनशीलता आणि आपले असेच नाते आहे. आज जग क्रेता आणि विक्रेता अशा दोन भागात विभागले गेले आहे. प्रत्येकजण जग ही जणू काही बाजारपेठ असल्यासारखे वागतो. पण मानवी जीवनातील नाती, नात्यातील प्रेम, विश्वास या गोष्टी विकत घेता येत नाहीत. आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वार्थापोटी तो नाती जपतो. रामायणात गूह आणि शबरी हे दोन समाजातील खालच्या वर्गाचे प्रतिनिधी आहेत. त्यांना रामाने उराशी धरले. कुंतीने कृष्णाकडे मला सदैव विपरीत परिस्थितीत ठेव असे वरदान मागितले. कारण आपल्यावर संकटे आली किंवा विपरीतआली तर आपल्याला देवाची आठवण येते. आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथार्पोटी तो नाते जपतो. रामायणात गूह आणि शबरी हे दोन समाजातील खालच्या वगार्चे प्रतिनिधी आहेत. त्यांना रामाने उराशी धरले. कुंतीने कृष्णाकडे मला सदैव विपरीत परिस्थितीत ठेव असे वरदान मागितले. कारण आपल्यावर संकटे आली किंवा विपरीत परिस्थिती आली तरच आपल्याला देवाची आठवण येते.आभार वाचनालयाचे संचालक राजेश ठोंबरे यांनी मानले. व्याख्यानमालेचे प्रायोजक भोजराज पुन्शी आणि सदरच्या व्याख्यानाचे प्रायोजक डॉ.सुभाष निकुंभ यांचेही त्यांनी आभार मानले. व्याख्यानमालेचे प्रमुख मनीष शहा व अन्य संचालक यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकChalisgaonचाळीसगाव