शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारण योजनेतील कार्यकर्त्यांना सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:22 IST

सध्या जळगाव जिल्ह्यातही बहुतांश भागात भूजलपातळी खूपच खालावली आहे़ दिवसेंदिवस तापमान वाढत आहे़ विंधन विहिरी व बोअरवेल खोल होऊन ...

सध्या जळगाव जिल्ह्यातही बहुतांश भागात भूजलपातळी खूपच खालावली आहे़ दिवसेंदिवस तापमान वाढत आहे़ विंधन विहिरी व बोअरवेल खोल होऊन पाण्याचा फक्त उपसाच करण्याची स्पर्धा सुरू आहे़ तुरळक ठिकाणी जलसंधारणाचे कार्य सुरू असून काही उत्साही कार्यकर्ते धडपड करीत आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी अडावद, चिंचोली व आडगाव(मनुदेवी) येथील ग्रामस्थ यंदा सातपुड्यातून येणारे पाणी काही प्रमाणात अडवून जिरविण्याचे कार्य करीत आहे़ यातील चिंचोली व आडगाव येथे १०० ते १५० फूट खोल विहिरींच्या माध्यमातून बागायती क्षेत्र तग धरून होते़ परंतु २०१२, २०१५, २०१८ या दर तीन व वर्षांनी येणाऱ्या दुष्काळामुळे विहिरींचे पाणी तर संपलेच परंतु चारशे ते पाचशे फूट बोअरवेल करूनही पुरेसे पाणी नाही़ चिंचोली येथे अशोक साठे, अनिल साळुंखे, अशोक बेहडे, विकास साळुंखे, अनिल साठे, संजय साळुंखे, विजय पाटील, प्रशांत साठे,निरज बेहडे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून पाणी अडविण्याचे कार्य करीत आहे़आडगाव येथे मनुदेवी संस्थानाची भरीव आर्थिक मदत तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करून सातपुड्याच्या पायथ्यापासून पालक नाला ठिकठिकाणी खोल करून छोटे, छोटे डोह करण्याचे कार्य सुरू केले आहे़ या कामात शांताराम पाटील, नितीन पाटील, गोकुळ पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभाग देत आहे़ अडावद हे पंचवीस हजार लोकसंख्येचे गाव पिण्यासाठी पूर्णत: बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून आहे़ गावाच्या वरच्या भागातून जाणाºया हतनुरच्या कालव्याचे पावसाळ्यात पाणी सायफन करून नाल्यांमध्ये थोड्या प्रमाणात पुनर्भरण केले जात होते़ येथेही भूजल पातळी यावर्षी चारशे फुटांवर खाली गेल्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे़ यावर उपाय म्हणून येथील भटू महाजन, प्रेमराज पवार, पी़ आऱ माळी, गौरव कासट, सचिन महाजन यांनी गावात जागृती केली़ तीन नाल्यांमधून गाळ काढून शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपिकताही वाढण्यास मदत झाली़ नाल्यांमध्ये निर्माण झालेल्या खड्ड्यांमध्ये तब्बल तीन कोटी लिटर इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली़ दुष्काळाने बागायती पट्टाही अडचणीत आल्यामुळे लोक स्वयंप्रेरणेने कार्यरत होत आहेत़ आता पाणी अडवणे व जिरवणे या कामी लोकांची मानसिकता तयार होत आहे हे उत्तमच़-डॉ़ हेमंत पाटील, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव