शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

जलसंधारण योजनेतील कार्यकर्त्यांना सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:22 IST

सध्या जळगाव जिल्ह्यातही बहुतांश भागात भूजलपातळी खूपच खालावली आहे़ दिवसेंदिवस तापमान वाढत आहे़ विंधन विहिरी व बोअरवेल खोल होऊन ...

सध्या जळगाव जिल्ह्यातही बहुतांश भागात भूजलपातळी खूपच खालावली आहे़ दिवसेंदिवस तापमान वाढत आहे़ विंधन विहिरी व बोअरवेल खोल होऊन पाण्याचा फक्त उपसाच करण्याची स्पर्धा सुरू आहे़ तुरळक ठिकाणी जलसंधारणाचे कार्य सुरू असून काही उत्साही कार्यकर्ते धडपड करीत आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी अडावद, चिंचोली व आडगाव(मनुदेवी) येथील ग्रामस्थ यंदा सातपुड्यातून येणारे पाणी काही प्रमाणात अडवून जिरविण्याचे कार्य करीत आहे़ यातील चिंचोली व आडगाव येथे १०० ते १५० फूट खोल विहिरींच्या माध्यमातून बागायती क्षेत्र तग धरून होते़ परंतु २०१२, २०१५, २०१८ या दर तीन व वर्षांनी येणाऱ्या दुष्काळामुळे विहिरींचे पाणी तर संपलेच परंतु चारशे ते पाचशे फूट बोअरवेल करूनही पुरेसे पाणी नाही़ चिंचोली येथे अशोक साठे, अनिल साळुंखे, अशोक बेहडे, विकास साळुंखे, अनिल साठे, संजय साळुंखे, विजय पाटील, प्रशांत साठे,निरज बेहडे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून पाणी अडविण्याचे कार्य करीत आहे़आडगाव येथे मनुदेवी संस्थानाची भरीव आर्थिक मदत तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करून सातपुड्याच्या पायथ्यापासून पालक नाला ठिकठिकाणी खोल करून छोटे, छोटे डोह करण्याचे कार्य सुरू केले आहे़ या कामात शांताराम पाटील, नितीन पाटील, गोकुळ पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभाग देत आहे़ अडावद हे पंचवीस हजार लोकसंख्येचे गाव पिण्यासाठी पूर्णत: बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून आहे़ गावाच्या वरच्या भागातून जाणाºया हतनुरच्या कालव्याचे पावसाळ्यात पाणी सायफन करून नाल्यांमध्ये थोड्या प्रमाणात पुनर्भरण केले जात होते़ येथेही भूजल पातळी यावर्षी चारशे फुटांवर खाली गेल्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे़ यावर उपाय म्हणून येथील भटू महाजन, प्रेमराज पवार, पी़ आऱ माळी, गौरव कासट, सचिन महाजन यांनी गावात जागृती केली़ तीन नाल्यांमधून गाळ काढून शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपिकताही वाढण्यास मदत झाली़ नाल्यांमध्ये निर्माण झालेल्या खड्ड्यांमध्ये तब्बल तीन कोटी लिटर इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली़ दुष्काळाने बागायती पट्टाही अडचणीत आल्यामुळे लोक स्वयंप्रेरणेने कार्यरत होत आहेत़ आता पाणी अडवणे व जिरवणे या कामी लोकांची मानसिकता तयार होत आहे हे उत्तमच़-डॉ़ हेमंत पाटील, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव