शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

रोहित्र जळाल्याने साकेगावकरांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 17:24 IST

साकेगाव येथे रोहित्र जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून साकेगावकर अंधारात आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावात अंधार असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

भुसावळ : उत्साह, आनंद आणि चैतन्याचा उत्सव असलेला दिवाळी अर्थात प्रकाशपर्वाचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र साकेगाव येथे रोहित्र जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून साकेगावकर अंधारात आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावात अंधार असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.काळा हनुमान मंदिर परिसराजवळ असलेले रोहित्र गेल्या आठ दिवसांपूर्वी जळाले होते. या ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आले. मात्र तीन-चार तास विद्युत पुरवठा केल्यानंतर पुन्हा नवीन रोहित्रही जळाले. त्या दिवसापासून गावातील धनगरवाडा, गांधी चौक परिसराचा काही भाग, वाल्मीक मंदिर परिसर हा भाग पूर्णत: अंधारात आहे. प्रकाशपर्व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी आकाशकंदील, पणत्या लावून रोषणाई होत असताना मात्र वीजपुरवठा नसल्याने घरात अंधार निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.वीज चोरी मुळे रोहित्र जळालेया परिसरात विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करण्यात येते, असे वीज कंपनीचे म्हणणे आहे. परिणामी वारंवार रोहित्र जळण्यासारखे प्रकार होत आहे. असे असले तरी वीज चोरी करणाऱ्यांमुळे नियमित वीज बिल भरणा करणाऱ्यांना शिक्षा का, असा मोठा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.वीजचोरांवर कारवाई कराकाही लोक जर विजेची चोरी करत असतील तर त्याचा भुर्दंड इतर वीजधारकांनी का करावा, विशेष पथक बोलून वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करा, मात्र जे नियमित वीजबिल बिल भरतात, त्यांचा वीजपुरवठा नियमित व सुरळीत करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा संतापजनक इशारा ग्रामस्थांकडून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना करण्यात आला आहे.दरम्यान, प्रकाश पर्वात वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या परिसरात शेगडी, हिटरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मध्यंतरी अशांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कालांतराने पुन्हा शेगडी, हिटरचा वापर सुरू झाला. अशांवर पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल. ज्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.-दिलीप कोल्हे, सहाय्यक अभियंता, वीज उपकेंद्र, साकेगाव, ता.भुसावळ

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ