शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

५० वर्षांपासून सुईनचे काम यशस्वीपणे करणाऱ्या मंजूळाबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:48 IST

३० वर्षांपूर्वी पतीचे निधन

रुपेश निकमलोंढे, ता.चाळीसगाव : येथील ७५ वर्षीय अशिक्षित महिला मंजूळाबाई भगवान वानखेडे या गेल्या ५० वर्षांपासून सुईनचे अर्थात परिचारिकेचे काम यशस्वीपणे हाताळत आहेत.घरात अठराविश्व दारिद्र्य, त्यातच ३० वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. चार मुले आणि एक मुलगी असे मोठे कुटुंब आहे. यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशाही परिस्थितीत त्यांनी सुईनच्या कामाला वाहून घेतले. परमेश्वराची देणगी की काय, एखाद्या प्रशिक्षित परिचारिकेत असलेले गुण या मंजूळाबार्इंमध्ये आहेत.रात्री-बेरात्री केव्हाही परिसरात कोणतीही महिला प्रसूत झाल्यानंतर वा त्याआधी मंजूळाबार्इंना बोलविणे आल्यानंतर त्या आनंदाने जातात. फार पूर्वी ग्रामीण तसेच आदिवासी भागात वैद्यकीय सुविधा नव्हत्या. त्या वेळी त्यांना आवर्जून बोलविले जायचे. असे असले तरी आजही त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही.उर्वरित वेळात मोलमजुरी करून त्या आपला उदरनिर्वाह करतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव