शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सहजीवन.. संगीताला दोन सुरांचे सहजीवन मान्य आहे

By admin | Updated: May 28, 2017 15:44 IST

वीकेण्ड स्पेशलमध्ये पत्र या सदरात जयंत पाटील यांनी केलेले लिखाण.

प्रिय केतू, सप्रेम आठवण

चित्रकार सैयद हैदर रझा म्हणतात, ‘ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहितो तिला ते पोहोचेर्पयत तास, आठवडे, महिने, कदाचित वर्षही लागू शकतात, परंतु पत्र लिहीत असताना ती व्यक्ती आपल्या इतक्याजवळ, अगदी आपल्यातच असते की ती कोणती व आपण कोणते हे ओळखणं कठीण होऊन बसतं- कधी कधी हा भास इतका तीव्र होतो की वाटतं, तिनं ते वाचलं सुद्धा असेल; आता पत्र पोष्टात टाकण्याची गरजच काय?’ म्हणूनच केतू, हे मनातलं पत्र. 19 जानेवारी 2013 ला तुमचा विवाह झाला. डोक्यावरून पाण्याचा भरलेला घडा उतरवावा इतके मोकळेपण आणि साफल्य तुङया ममा-पपांनी अनुभवले असेल. ‘बँड आणि घोडा नको’ हे माङो म्हणणे त्यांनी मान्य केले, त्याबद्दल त्यांचे आभार. परिसरातील लोकांना आवाजी त्रास देण्याचा अधिकार आपल्याला नसतोच, असे मी मानतो. तुमच्याकडील दोन्ही जेवणे छान होती. सिमंत पूजनच्या रात्रीचे क्लासिकल गाणे असेल तर लगAाचे जेवण सुगम संगीतासारखे होते. मला, शैलजाला आणि आमच्याकडील मंडळींना विवाहविधी लक्षणीय आणि वेगळे वाटले. विवाह  झाला. निरोपाची वेळ आली. माझा लहानभाऊ आणि मी तुङया पपांना आश्वस्त करावे म्हणून म्हणालो, ‘तुम्ही केतकीची काही काळजी करू नका.’ पपा म्हणाले, ‘मला केतकीची काळजी नाही, नीरजच्या आई-बाबांची काळजी आहे.’ आणि आम्ही निघालो. मला बंगाली लेखिका अलका सरावगी यांच्या ‘कलीकथा: व्हाया बायपास’ यातील एक परिच्छेद सारखा आठवत होता. ‘माणसाकडे एक खास गोष्ट असते. नेहमी सत्य बोलणारी एक दुसरी बुद्धी. तिलाच कदाचित आत्मा म्हणत असतील. ती एकदाच सत्य बोलून पुन्हा  शेषशायी विष्णुप्रमाणे झोपून जाते. दुस:यांदा बोलत नाही.’ केतू, आम्ही अतिशय प्रामाणिकपणे तुङो स्वागत केले आहे. थोर गायक स्व.वसंतराव देशपांडे एकदा सांगत होते- संगीतात दोन सूर एक होत नाहीत. लक्षावधी वेळा तंबोरा छेडल्यावर एक असा क्षण येतो की दोन सूर एक होतात, पण त्या क्षणी तंबो:याची एक तार तुटून जाते.. संगीताला दोन  सुरांचे सहजीवन मान्य आहे, एकात्मता मान्य नाही. केतू, जीवनालाही दोन व्यक्तींचे सहजीवन मान्य आहे. एकात्मतेचा अट्टाहास नव्हे! नीरज आणि तू दोघेही वेगवेगळ्या वातावरणातून आला आहात. त्या वातावरणाने तुमचे स्वभाव घडवले आहेत. ते एकच कसे असतील? आणि कितीही अंधार दाटून आला, कोणतीही  परिस्थिती उद्भवली तरी आमची अफाट प्रेम करण्याची शक्ती मात्र तुमच्यावरच राहणार आहे. केतू, आमच्या जगण्याच्या मागावरचा प्रेमाचा धागा अखंड राहो, अशी नियतीकडे प्रार्थना करतो बाळा.. तुङया ममा-पपांना सप्रेम आठवण. तुला आणि नीरजला शुभाशीष.
तुङो आणि नीरजचे आई-बाबा.