शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

सहजीवन.. संगीताला दोन सुरांचे सहजीवन मान्य आहे

By admin | Updated: May 28, 2017 15:44 IST

वीकेण्ड स्पेशलमध्ये पत्र या सदरात जयंत पाटील यांनी केलेले लिखाण.

प्रिय केतू, सप्रेम आठवण

चित्रकार सैयद हैदर रझा म्हणतात, ‘ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहितो तिला ते पोहोचेर्पयत तास, आठवडे, महिने, कदाचित वर्षही लागू शकतात, परंतु पत्र लिहीत असताना ती व्यक्ती आपल्या इतक्याजवळ, अगदी आपल्यातच असते की ती कोणती व आपण कोणते हे ओळखणं कठीण होऊन बसतं- कधी कधी हा भास इतका तीव्र होतो की वाटतं, तिनं ते वाचलं सुद्धा असेल; आता पत्र पोष्टात टाकण्याची गरजच काय?’ म्हणूनच केतू, हे मनातलं पत्र. 19 जानेवारी 2013 ला तुमचा विवाह झाला. डोक्यावरून पाण्याचा भरलेला घडा उतरवावा इतके मोकळेपण आणि साफल्य तुङया ममा-पपांनी अनुभवले असेल. ‘बँड आणि घोडा नको’ हे माङो म्हणणे त्यांनी मान्य केले, त्याबद्दल त्यांचे आभार. परिसरातील लोकांना आवाजी त्रास देण्याचा अधिकार आपल्याला नसतोच, असे मी मानतो. तुमच्याकडील दोन्ही जेवणे छान होती. सिमंत पूजनच्या रात्रीचे क्लासिकल गाणे असेल तर लगAाचे जेवण सुगम संगीतासारखे होते. मला, शैलजाला आणि आमच्याकडील मंडळींना विवाहविधी लक्षणीय आणि वेगळे वाटले. विवाह  झाला. निरोपाची वेळ आली. माझा लहानभाऊ आणि मी तुङया पपांना आश्वस्त करावे म्हणून म्हणालो, ‘तुम्ही केतकीची काही काळजी करू नका.’ पपा म्हणाले, ‘मला केतकीची काळजी नाही, नीरजच्या आई-बाबांची काळजी आहे.’ आणि आम्ही निघालो. मला बंगाली लेखिका अलका सरावगी यांच्या ‘कलीकथा: व्हाया बायपास’ यातील एक परिच्छेद सारखा आठवत होता. ‘माणसाकडे एक खास गोष्ट असते. नेहमी सत्य बोलणारी एक दुसरी बुद्धी. तिलाच कदाचित आत्मा म्हणत असतील. ती एकदाच सत्य बोलून पुन्हा  शेषशायी विष्णुप्रमाणे झोपून जाते. दुस:यांदा बोलत नाही.’ केतू, आम्ही अतिशय प्रामाणिकपणे तुङो स्वागत केले आहे. थोर गायक स्व.वसंतराव देशपांडे एकदा सांगत होते- संगीतात दोन सूर एक होत नाहीत. लक्षावधी वेळा तंबोरा छेडल्यावर एक असा क्षण येतो की दोन सूर एक होतात, पण त्या क्षणी तंबो:याची एक तार तुटून जाते.. संगीताला दोन  सुरांचे सहजीवन मान्य आहे, एकात्मता मान्य नाही. केतू, जीवनालाही दोन व्यक्तींचे सहजीवन मान्य आहे. एकात्मतेचा अट्टाहास नव्हे! नीरज आणि तू दोघेही वेगवेगळ्या वातावरणातून आला आहात. त्या वातावरणाने तुमचे स्वभाव घडवले आहेत. ते एकच कसे असतील? आणि कितीही अंधार दाटून आला, कोणतीही  परिस्थिती उद्भवली तरी आमची अफाट प्रेम करण्याची शक्ती मात्र तुमच्यावरच राहणार आहे. केतू, आमच्या जगण्याच्या मागावरचा प्रेमाचा धागा अखंड राहो, अशी नियतीकडे प्रार्थना करतो बाळा.. तुङया ममा-पपांना सप्रेम आठवण. तुला आणि नीरजला शुभाशीष.
तुङो आणि नीरजचे आई-बाबा.