शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

सद्गुरु वाचोनि सापडेना सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:23 IST

मनुष्य जीवन अमूल्य आहे याची तुलना दुसऱ्या कुठल्याही जीवनाची होऊ शकत नाही. मानवी शरीराची महिमा संत आणि ग्रंथांनी गायली ...

मनुष्य जीवन अमूल्य आहे याची तुलना दुसऱ्या कुठल्याही जीवनाची होऊ शकत नाही. मानवी शरीराची महिमा संत आणि ग्रंथांनी गायली आहे. त्याचे तात्पर्य पाच तत्वांनी बनलेल्या शरीराचे नाही. कारण शरीर नाशवंत आहे. परंतु प्राप्त असलेल्या विवेकबुद्धी आणि विचारशक्तीमुळे ते श्रेष्ठ आहे.विवेक बुद्धीचा सदुपयोग करुन आपण मानव जीवनाचे कल्याण करु शकतो. पण देवदुर्लभ मानवी शरीर प्राप्त होऊनही आम्ही अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आणि सांसारिक लोभातच जीवन व्यर्थ घालवितो. या मायामोहाच्या जंजाळात एवढं गुरफटून गेलो की यातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे.दु:खाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती! हा मनुष्य जीवनाचा खरा उद्देश असला पाहिजे. त्यासाठी गरज आहे ज्ञानाची. जसे सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो तसेच प्रभुचे ज्ञान झाले की, अज्ञान नाहीसे होते. या प्रभुला पाहिल्यावरच याच्याशी प्रेम करता येईल. म्हणूनच आवश्यकता आहे गुरुची. गुरु म्हणजे मनुष्य नव्हे तर मनुष्य रुपातील सगुण - साकार ईश्वरच होत.संत तुकाराम महाराज म्हणतातसद्गुरू वाचोनि सापडेना सोय,धरावे ते पाय, आधी आधी.मनुष्य जीवनाला सकारात्मक बदल करण्याचे कार्य सद्गुरू करतात. आणि यासाठीच सदगुरूंनी नितांत आवश्यकता आहे. संत नामदेव बालपणी विठ्ठलाशी बोलायचे-खेळायचे... भरवायचे परंतु त्या भक्तीला पूर्णत्व लाभले नाही. ज्यावेळी संत विसोबा खेचर स्वामींकडून त्यांना ज्ञान प्राप्त झाले, त्याचवेळी खºया देवाची ओळख झाली, मग संत नामदेवांनी ही भागवत पताका पंजाबात नेली.नामदेव महाराज म्हणतात आधी देवाशी ओळखावे...मग त्याशी अनन्यभावे भजावे....अखंडची ध्यान धरावे, सर्वोत्तमाचे ।सर्वोत्तम असणारा परमेश्वर याला अगोदर ओळखणे गरजेचे आहे. म्हणून निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज नेहमी म्हणायचे... एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा. विश्वबंधुत्व निर्माण होण्यासाठी एका प्रभू परमात्म्याची ओळख होणे गरजेचे आहे. संत मिराबाई म्हणतात त्याप्रमाणे पायो जी मैने राम रतन धन पायो। अशीच अवस्था होत असते.संकलन- राजकुमार वाणी, ज्ञानप्रचारक.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव