शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
5
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
7
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
8
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
9
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
10
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
11
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
12
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
13
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
14
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
15
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
16
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
19
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
20
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

सद्गुरु वाचोनि सापडेना सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:23 IST

मनुष्य जीवन अमूल्य आहे याची तुलना दुसऱ्या कुठल्याही जीवनाची होऊ शकत नाही. मानवी शरीराची महिमा संत आणि ग्रंथांनी गायली ...

मनुष्य जीवन अमूल्य आहे याची तुलना दुसऱ्या कुठल्याही जीवनाची होऊ शकत नाही. मानवी शरीराची महिमा संत आणि ग्रंथांनी गायली आहे. त्याचे तात्पर्य पाच तत्वांनी बनलेल्या शरीराचे नाही. कारण शरीर नाशवंत आहे. परंतु प्राप्त असलेल्या विवेकबुद्धी आणि विचारशक्तीमुळे ते श्रेष्ठ आहे.विवेक बुद्धीचा सदुपयोग करुन आपण मानव जीवनाचे कल्याण करु शकतो. पण देवदुर्लभ मानवी शरीर प्राप्त होऊनही आम्ही अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आणि सांसारिक लोभातच जीवन व्यर्थ घालवितो. या मायामोहाच्या जंजाळात एवढं गुरफटून गेलो की यातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे.दु:खाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती! हा मनुष्य जीवनाचा खरा उद्देश असला पाहिजे. त्यासाठी गरज आहे ज्ञानाची. जसे सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो तसेच प्रभुचे ज्ञान झाले की, अज्ञान नाहीसे होते. या प्रभुला पाहिल्यावरच याच्याशी प्रेम करता येईल. म्हणूनच आवश्यकता आहे गुरुची. गुरु म्हणजे मनुष्य नव्हे तर मनुष्य रुपातील सगुण - साकार ईश्वरच होत.संत तुकाराम महाराज म्हणतातसद्गुरू वाचोनि सापडेना सोय,धरावे ते पाय, आधी आधी.मनुष्य जीवनाला सकारात्मक बदल करण्याचे कार्य सद्गुरू करतात. आणि यासाठीच सदगुरूंनी नितांत आवश्यकता आहे. संत नामदेव बालपणी विठ्ठलाशी बोलायचे-खेळायचे... भरवायचे परंतु त्या भक्तीला पूर्णत्व लाभले नाही. ज्यावेळी संत विसोबा खेचर स्वामींकडून त्यांना ज्ञान प्राप्त झाले, त्याचवेळी खºया देवाची ओळख झाली, मग संत नामदेवांनी ही भागवत पताका पंजाबात नेली.नामदेव महाराज म्हणतात आधी देवाशी ओळखावे...मग त्याशी अनन्यभावे भजावे....अखंडची ध्यान धरावे, सर्वोत्तमाचे ।सर्वोत्तम असणारा परमेश्वर याला अगोदर ओळखणे गरजेचे आहे. म्हणून निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज नेहमी म्हणायचे... एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा. विश्वबंधुत्व निर्माण होण्यासाठी एका प्रभू परमात्म्याची ओळख होणे गरजेचे आहे. संत मिराबाई म्हणतात त्याप्रमाणे पायो जी मैने राम रतन धन पायो। अशीच अवस्था होत असते.संकलन- राजकुमार वाणी, ज्ञानप्रचारक.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव