शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

तंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावा : डॉ.अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 9:27 PM

शहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढण्याचे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित परिसंवादशेती व उद्योग युगानंतर ज्ञानप्रधान युगाची सुरूवाततंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावा

जळगाव : शहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढण्याचे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.डॉ.काकोडकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार, १४ रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संपत्तीनिर्मिती’ या विषयावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा.जे.बी.जोशी, सचिव डॉ.ए.पी.देशपांडे, कुलसचिव भ.भा.पाटील उपस्थित होते.जागतिकस्तरावर विक्रेते म्हणून मोठे व्हाडॉ.काकोडकर म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत भारतीयांची खरीददार म्हणून मोठी संख्या असली तरी विक्रेते म्हणून संख्या फार छोटी आहे. हे चित्र बदलण्यासाठी विक्रेते म्हणून आपण मोठे व्हायला हवे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित नवीन वस्तू आणि सुविधा आणायला हव्यात.शेती व उद्योग युगानंतर ज्ञानप्रधान युगाची सुरूवातपूर्वी शेतीमध्ये आपण जगाच्या पुढे होतो तो काळ आता मागे पडला. उद्योग युगात आपण मागे पडलो पण आता हळूहळू सावरत असलो तरी तळाला आहोत. शेती आणि उद्योग प्रधान ही दोन्ही युगे मागे पडून ज्ञानप्रधान युग सुरु आहे. या युगात मोठी आव्हाने उभी आहेत. प्रगत देश आणि भारतातील दरी या युगात भरुन काढावी लागणार आहे.तंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावाशहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा लागेल असे त्यांनी सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढावी लागेल.

टॅग्स :North Maharashtra Universityउत्तर महाराष्ट्र विद्यापीठJalgaonजळगाव