शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

भुसावळला सत्ताधारी सदस्यांमध्येच सभेपूर्वी खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:54 IST

भुसावळ नगर पालिकेच्या मंगळवारी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वीच सत्ताधारी गटातील नगरसेवक आणि नगरसेविका पती यांच्यात प्रभागात कामे करण्याच्या मुद्यावरून चांगलीच खडाजंगी झाली.

ठळक मुद्देविरोधी पक्ष जनाधार पार्टीने बहिष्कार होता टाकलापाणी प्रश्नी सदस्यांकडून गंभीर चिंता व्यक्त

भुसावळ : नगर पालिकेच्या मंगळवारी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वीच सत्ताधारी गटातील नगरसेवक आणि नगरसेविका पती यांच्यात प्रभागात कामे करण्याच्या मुद्यावरून चांगलीच खडाजंगी झाली, तर या सभेवर विरोधी जनाधार पार्टीने बहिष्कार टाकला. सभेत अवघ्या २५ मिनिटात ३५ विषयांना मंजुरी देण्यात आली.पाणी प्रश्नावर गंभीर चिंतापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर विरोधी जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला असला तरी, सत्ताधारी पार्टीचे नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी, युवराज लोणारी व नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून प्रशासनाने हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांमुळे ही सभा पंचवीस मिनिटे चालली . पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष रमण भोळे होते तर व्यासपीठावर उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर उपस्थित होते. होते.सभेच्या अजेंड्यावर एकूण ३५ विषय होते . यातील विषय क्रमांक २७,२८ व २९ या तीन विषयावरील चर्चेच्या वेळी नगरसेवक कोठारी यांनी तापी नदीवरील बंधारा कामासंदर्भात आमदार संजय सावकारे यांनी रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली आहे . उन्हाळ्यात पाणीटंचाई संदर्भात समस्या सोडवण्याची चर्चा केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी बोलून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली.तसेच स्मशान भूमी व कब्रस्तानमध्ये स्वच्छतेसाठी रोजंदारीवर माणूस ठेवण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी मांडली . त्यांच्या या सूचनेला नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांनी अनुमोदन दिले.दरम्यान , शहरात दहा ते बारा दिवसाआड पाणी येत असल्यामुळे हा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी सूचना नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी मांडली. महिला नगरसेविका असल्यामुळे महिलांच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . त्यामुळे हा प्रश्न ताबडतोब सोडविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. तर नगरसेवक लोणारी व प्रमोद नेमाडे यांनीही काही सूचना मांडल्या. मात्र सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगून सभा संपल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी जाहीर केले.जनाधार पार्टीचा बहिष्कार पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मनमानी व तत्कालीन मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांच्या हुकूमशाहीमुळे जनाधार पार्टीचे नगरसेवक व नगरसेविका अपात्र झाले असल्याचा आरोप करून आजच्या सर्वसाधारण सभेचा जाहिर निषेध करून या सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र उपगटनेते शेख जाकीर सरदार यांनी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना सभेपूर्वीच दिले होते. व त्यानंतर जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकून ते अनुपस्थित राहिले.दरम्यान, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी पाण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाचा प्रस्ताव नसल्याचे सभेत सांगितले, मात्र या उत्तरावर मी समाधानी नसल्याची प्रतिक्रिया नगरसेवक निर्मल कोठारी यांनी दिली. पाण्याची गरज शहराला आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने रेल्वेच्या अधिकाºयांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत शहराला गरज आहे रेल्वेला नाही असा दावा लोकमतशी बोलताना त्यांनी केला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका