शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उद्या धुळे जिल्ह्यातील बारीपाड्याचा दौ-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 12:55 IST

राष्टय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत मंगळवार, ५ डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या आदर्श गावाला भेट देणार आहेत. वनवासी

ठळक मुद्देशाश्वत विकासावर उभारलेल्या गावाच्या ग्रामस्थांशी करणार चर्चा १ हजार एकर जंगलाची करणार पाहणीसंपूर्ण दिवसभर संघचालक बारीपाडा येथे थांबणार

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.३ -राष्टय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत मंगळवार, ५ डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या आदर्श गावाला भेट देणार आहेत. वनवासी क्षेत्रातील एका छोट्या पाड्याने संघटना व लोकसहभागाच्या आधारावर केलेल्या विकासाची प्रत्यक्ष पाहणी मोहन भागवत करणार आहेत. अशी माहिती रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बारीपाडा विकासातील प्रमुख कार्यकर्ते व वनवासी कल्याण देवगिरी प्रातांचे अध्यक्ष चैतराम पवार यांनी दिली.

यावेळी देवगिरी प्रातांचे अविनाश नेहते, रामानंद काळे, प्रचार प्रमुख स्वानंद झारे, महेश काळे आदी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बारीपाडा या गावाने गेल्या २६ वर्षात विकासाच्या अनेक योजना राबवून एक परिवर्तन घडवले आहे. या आदर्श गावाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आंतरराष्टÑीयस्तरावर देखील बारीपाड्याने घडवून आणलेल्या परिवर्तनाची दखल घेण्यात आली आहे. अनेक मान्यवरांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच अभ्यासकांनी बारीपाड्याला भेटी देऊन ग्रामविकासाची प्रेरणा प्राप्त केली आहे.

ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांशी करणार चर्चाराष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भावत यांनी देखील बारीपाडा आदर्श गावाला भेट देण्याची अनेक वर्षांपासून इच्छा व्यक्त केली होती अशी माहिती चैतराम पवार यांनी दिली. त्यानुसार सरसंघचालक मंगळवारी बारीपाड्यात येत असून, सकाळी १० वाजता त्यांचे गावात आगमण होणार आहे. गावाने घडवून आणलेल्या परिवर्तनाची यशोगाथा प्रत्याक्ष ग्रामस्थांकडून ते जाणून घेणार आहे. तसेच यावेळी बारीपाडा परिसरातील काही गावांमधील नागरिकांशी देखील चर्चा करणार आहेत. बारीपाडा येथील ग्रामस्थांनी श्रमदानातुन १ हजार १०० एकर संवर्धन करून ठेवलेल्या जंगलाची पाहणी देखील डॉ.भागवत करणार आहेत. संपूर्ण दिवसभर संघचालक बारीपाडा येथे थांबणार आहेत.

सरसंघचालकांच्या भेटीने प्रेरणा मिळणारचैतराम पवार म्हणाले की, ज्या विचारधारेच्या प्रेरणेतून या सगळ्या विकासकार्याची सुरुवात झाली. त्या संघटनेच्या सर्वोच्च नेता गावाला भेट देण्यासाठी येत असल्याने ही बाब ग्रामस्थ व स्वयंसेवकांसाठी महत्वाची आहे. त्यामुळे भविष्यात आणखीन नवीन जोशाने ग्रामविकासासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. बारीपाड्याने आतापर्यंत केलेला विकासामुळे २५ वर्षांपूर्वी ज्या गावाकडे कुणी ढुंकूनही पाहत नव्हते, येथील नागरिक रोजगाराच्या शोधात बाहेर जात होते. मात्र आज परिस्थिती बदलली असून, गावाने केलेल्या जल, जंगल, आरोग्य संवर्धनाच्या जोरावर बारीपाडा सुजलाम, सुफलाम झाले आहे. सेंद्रिय शेतीच्या माध्यामातुन बारीपाड्यातील शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती देखील करत आहेत. आधी पाच कि.मी.वरुन नागरिकांना पाणी आणावे लागत होते. मात्र जलसंवर्धनाच्या माध्यमातुन आज बारीपाड्यातुन पाच गावांना पाणी पुरवठा केला जात असल्याचे चैतराम पवार यांनी सांगितले. बारीपाड्याचा विकासापासून अन्य गावांनी देखील शाश्वत विकासावर भर दिला पहिजे. जल,जंगल हीच खरी संपत्ती असून, त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन देखील पवार यांनी केले.