शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पहिल्याच पावसात रस्त्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:59 IST

शहरवासियांची वाट बिकट : चार महिने पुन्हा तीच समस्या राहणार

जळगाव : गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात जळगावकरांना मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा समस्येला तोंड द्यावे लागले होते. निदान वर्षभराच्या काळानंतर ही समस्या मार्गी लागून यंदाच्या पावसाळ्यात तरी रस्त्यांची समस्या निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा जळगावकरांना होती. मात्र, पहिल्याच पावसात जळगावकरांची अपेक्षा पाण्यात गेली असून, पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यामुळे गेल्यावर्षाप्रमाणेच यंदाही जळगावकरांची वाट बिकटच राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.आॅगस्ट २०१८ मध्ये शहराचा वर्षभरात चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन देत मनपात सत्ता प्राप्त केलेल्या भाजपला आपल्या २२ महिन्यांच्या कार्यकाळात शहराच्या समस्या सोडविण्यास पुर्णपणे अपयश आले आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून नवीन रस्त्यांचे काम होवू शकलेले नाही. त्यातच जे रस्ते आहेत. त्याची साधी दुरुस्तीही मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांना करता आलेली नाही. गेल्यावर्षी शहरात पावसाळ्याच्या तोंडावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे शहरातील उद्योजक बोरोले यांचा चित्रा चौकात अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, ढीम्म मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी यावर्षीही रस्त्यांचा समस्येकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले असून, यंदाही मनपा प्रशासन रस्त्यांचे कामे करण्यासाठी शहरात आणखीन मृत्यूंची वाट पाहत आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.मंगळवारी व बुधवारी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. अमृत योजनेचेही काम बंद असल्याने पदाधिकाºयांना आता ‘अमृत’ च्या कामांना दोष देता येणार नाही. कारण रस्त्यांच्या मधोमध खड्डे झाले आहेत. नवसाचा गणपती मागील रस्ता, रायसोनी नगर, जिजाऊ चौक, गाडगेबाबा चौक, गणेश कॉलनी चौक, एसएमआयटी महाविद्यालय ते नवीन बजरंग बोगदा रस्ता, शिवाजीनगर, दुध फेडरेशन समोरील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आह. मात्र, मनपाकडून लॉकडाऊनचे कारण सांगत या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.मनपाकडून वर्षभर रस्त्यांची समस्या मार्गी लावता येत नाही. मात्र, रस्त्यांबाबत मनपा प्रशासन व सत्ताधाºयांना घेरल्यानंतर खड्डयांमध्ये मुरूम टाकून समस्येवर पडदा टाकण्याचे काम सत्ताधारी व मनपा प्रशासनाकडून केले जात असते.तीच समस्या पुन्हा एकवेळदोन महिन्यांपासून कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच थांबून होते. मात्र,आता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जात असून, शहरातील बाजारपेठा हळूहळू उघडण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत आता शहरातील रस्त्यांवर पुन्हा रेलचेल वाढणार आहे. मात्र, गेल्या वर्षाची रस्त्यांची समस्या जळगावकरांना भेडसावणार आहे. त्याचे ‘ट्रेलर’ पहिल्याच पावसात दिसून गेले आहे. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर रस्त्यांची पुर्णपणे वाट लागली आहे.१०० कोटींतून एक दमडीचाही खर्च नाहीमनपात सत्ता संपादन गेल्यानंतर १६ आॅगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाला नगरोथ्थातंर्गत १०० कोटींचा निधी जाहीर केला होता. मात्र, वर्षभर मनपातील सत्ताधारी भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे हा निधी खर्च करता आला नाही. निधी जाहीर होवून २२ महिन्यांचा काळ होवून ही या निधीतून एक दमडीचाही खर्च सत्ताधाºयांना करता आलेला नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव