शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पहिल्याच पावसात रस्त्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:59 IST

शहरवासियांची वाट बिकट : चार महिने पुन्हा तीच समस्या राहणार

जळगाव : गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात जळगावकरांना मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा समस्येला तोंड द्यावे लागले होते. निदान वर्षभराच्या काळानंतर ही समस्या मार्गी लागून यंदाच्या पावसाळ्यात तरी रस्त्यांची समस्या निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा जळगावकरांना होती. मात्र, पहिल्याच पावसात जळगावकरांची अपेक्षा पाण्यात गेली असून, पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यामुळे गेल्यावर्षाप्रमाणेच यंदाही जळगावकरांची वाट बिकटच राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.आॅगस्ट २०१८ मध्ये शहराचा वर्षभरात चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन देत मनपात सत्ता प्राप्त केलेल्या भाजपला आपल्या २२ महिन्यांच्या कार्यकाळात शहराच्या समस्या सोडविण्यास पुर्णपणे अपयश आले आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून नवीन रस्त्यांचे काम होवू शकलेले नाही. त्यातच जे रस्ते आहेत. त्याची साधी दुरुस्तीही मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांना करता आलेली नाही. गेल्यावर्षी शहरात पावसाळ्याच्या तोंडावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे शहरातील उद्योजक बोरोले यांचा चित्रा चौकात अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, ढीम्म मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी यावर्षीही रस्त्यांचा समस्येकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले असून, यंदाही मनपा प्रशासन रस्त्यांचे कामे करण्यासाठी शहरात आणखीन मृत्यूंची वाट पाहत आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.मंगळवारी व बुधवारी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. अमृत योजनेचेही काम बंद असल्याने पदाधिकाºयांना आता ‘अमृत’ च्या कामांना दोष देता येणार नाही. कारण रस्त्यांच्या मधोमध खड्डे झाले आहेत. नवसाचा गणपती मागील रस्ता, रायसोनी नगर, जिजाऊ चौक, गाडगेबाबा चौक, गणेश कॉलनी चौक, एसएमआयटी महाविद्यालय ते नवीन बजरंग बोगदा रस्ता, शिवाजीनगर, दुध फेडरेशन समोरील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आह. मात्र, मनपाकडून लॉकडाऊनचे कारण सांगत या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.मनपाकडून वर्षभर रस्त्यांची समस्या मार्गी लावता येत नाही. मात्र, रस्त्यांबाबत मनपा प्रशासन व सत्ताधाºयांना घेरल्यानंतर खड्डयांमध्ये मुरूम टाकून समस्येवर पडदा टाकण्याचे काम सत्ताधारी व मनपा प्रशासनाकडून केले जात असते.तीच समस्या पुन्हा एकवेळदोन महिन्यांपासून कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच थांबून होते. मात्र,आता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जात असून, शहरातील बाजारपेठा हळूहळू उघडण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत आता शहरातील रस्त्यांवर पुन्हा रेलचेल वाढणार आहे. मात्र, गेल्या वर्षाची रस्त्यांची समस्या जळगावकरांना भेडसावणार आहे. त्याचे ‘ट्रेलर’ पहिल्याच पावसात दिसून गेले आहे. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर रस्त्यांची पुर्णपणे वाट लागली आहे.१०० कोटींतून एक दमडीचाही खर्च नाहीमनपात सत्ता संपादन गेल्यानंतर १६ आॅगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाला नगरोथ्थातंर्गत १०० कोटींचा निधी जाहीर केला होता. मात्र, वर्षभर मनपातील सत्ताधारी भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे हा निधी खर्च करता आला नाही. निधी जाहीर होवून २२ महिन्यांचा काळ होवून ही या निधीतून एक दमडीचाही खर्च सत्ताधाºयांना करता आलेला नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव