शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रस्त्यांचे ग्रहण सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:52 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : जळगावकडून चारही बाजूला कोठेही जायचे झाल्यास सध्या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे वाहनधारक चांगलेच त्रस्त झाले आहेत. ...

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावकडून चारही बाजूला कोठेही जायचे झाल्यास सध्या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे वाहनधारक चांगलेच त्रस्त झाले आहेत. त्यात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तरसोद गणपती मंदिराचाही मार्ग सुटलेला नाही. त्यामुळे रस्त्यांचे हे ग्रहण लवकरात लवकर सुटावे, अशी मागणी केली जात आहे.जळगाव -धुळे, जळगाव औरंगाबाद, जळगाव चांदवड, जळगाव-भुसावळ या चारही बाजूच्या रस्त्यांचे कामे सुरू करण्यात आले. त्यात औरंगाबाद रस्त्याचे काम रखडले असून इतर रस्त्यांचे कामे धिम्या गतीने सुरू आहे. याचा त्रास वाहनधारकांना दररोज सहन करावा लागत आहे.यात तरसोद रस्त्याचेही काम रखडल्याने बाप्पाच्या भक्तांचा प्रवास खडतर असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. डांबराअभावी रखडलेले हे काम तत्काळ मार्गी लावून भाविकांचा प्रवास सुकर करावा, अशी मागणी संस्थानसह गणेशभक्तांच्यावतीने करण्यात येत आहे. तरसोद गणपती मंदिर येथे दर महिन्याची चतुर्थी, अंगारकी चतुर्थीसह नेहमीच भाविकांची दर्शनासाठी रिघ असते. भाविकांचा ओघ पाहता येथे रस्ता चांगला असावा, अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्याचा त्रास भाविकांसह तरसोद ग्रामस्थांनाही सहन करावा लागत आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजमेंतर्गत हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्यानुसार आॅक्टोबर २०१८मध्ये या कामाला सुरुवात झाली. रस्ता मंजुरीनंंतर कामाला गती आली व मार्च महिन्यापर्यंत मुरुम टाकणे, खडीकरण, दबाई असे साधारण ८० टक्के काम झाले. मात्र १५ मार्चपासून हे काम बंद पडले आहे. त्यामुळे अपूर्ण रस्त्यामुळे गणेशभक्तांना अजूनही खडतर प्रवास करावा लागत आहे. तरसोद फाट्यापासून ते मंदिरापर्यंत ३.४२ कि.मी. लांबीच्या या रस्त्यावर कोठे खडी पडलेली आहे तर कोठे खड्डे पडलेले आहे. डांबराअभावी हे काम रखडले असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सर्वच ठिकाणी डांबराची समस्या निर्माण झाल्याने त्याचा फटका या रस्त्यालाही बसत असल्याची माहिती मिळाली. जवळपास अर्धा मे महिना उलटला तरी हे काम सुरू होत नसल्याने जून महिन्यात पावसाळा सुरू झाला तर जे काम झाले आहे, त्यावरही ‘पाणी’ फिरले जाईल व पुढील चार महिने आणखी हे काम होऊ शकणार नाही. त्यामुळे गणेशभक्तांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागेल व भाविकांना मंदिरापर्यंत पोहचणे कठीण होईल. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी हे काम मार्गी लावावे, अशी मागणी केली जात आहे. 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव