शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

रस्त्यांचे ग्रहण सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:52 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : जळगावकडून चारही बाजूला कोठेही जायचे झाल्यास सध्या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे वाहनधारक चांगलेच त्रस्त झाले आहेत. ...

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावकडून चारही बाजूला कोठेही जायचे झाल्यास सध्या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे वाहनधारक चांगलेच त्रस्त झाले आहेत. त्यात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तरसोद गणपती मंदिराचाही मार्ग सुटलेला नाही. त्यामुळे रस्त्यांचे हे ग्रहण लवकरात लवकर सुटावे, अशी मागणी केली जात आहे.जळगाव -धुळे, जळगाव औरंगाबाद, जळगाव चांदवड, जळगाव-भुसावळ या चारही बाजूच्या रस्त्यांचे कामे सुरू करण्यात आले. त्यात औरंगाबाद रस्त्याचे काम रखडले असून इतर रस्त्यांचे कामे धिम्या गतीने सुरू आहे. याचा त्रास वाहनधारकांना दररोज सहन करावा लागत आहे.यात तरसोद रस्त्याचेही काम रखडल्याने बाप्पाच्या भक्तांचा प्रवास खडतर असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. डांबराअभावी रखडलेले हे काम तत्काळ मार्गी लावून भाविकांचा प्रवास सुकर करावा, अशी मागणी संस्थानसह गणेशभक्तांच्यावतीने करण्यात येत आहे. तरसोद गणपती मंदिर येथे दर महिन्याची चतुर्थी, अंगारकी चतुर्थीसह नेहमीच भाविकांची दर्शनासाठी रिघ असते. भाविकांचा ओघ पाहता येथे रस्ता चांगला असावा, अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्याचा त्रास भाविकांसह तरसोद ग्रामस्थांनाही सहन करावा लागत आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजमेंतर्गत हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्यानुसार आॅक्टोबर २०१८मध्ये या कामाला सुरुवात झाली. रस्ता मंजुरीनंंतर कामाला गती आली व मार्च महिन्यापर्यंत मुरुम टाकणे, खडीकरण, दबाई असे साधारण ८० टक्के काम झाले. मात्र १५ मार्चपासून हे काम बंद पडले आहे. त्यामुळे अपूर्ण रस्त्यामुळे गणेशभक्तांना अजूनही खडतर प्रवास करावा लागत आहे. तरसोद फाट्यापासून ते मंदिरापर्यंत ३.४२ कि.मी. लांबीच्या या रस्त्यावर कोठे खडी पडलेली आहे तर कोठे खड्डे पडलेले आहे. डांबराअभावी हे काम रखडले असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सर्वच ठिकाणी डांबराची समस्या निर्माण झाल्याने त्याचा फटका या रस्त्यालाही बसत असल्याची माहिती मिळाली. जवळपास अर्धा मे महिना उलटला तरी हे काम सुरू होत नसल्याने जून महिन्यात पावसाळा सुरू झाला तर जे काम झाले आहे, त्यावरही ‘पाणी’ फिरले जाईल व पुढील चार महिने आणखी हे काम होऊ शकणार नाही. त्यामुळे गणेशभक्तांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागेल व भाविकांना मंदिरापर्यंत पोहचणे कठीण होईल. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी हे काम मार्गी लावावे, अशी मागणी केली जात आहे. 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव