शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

शहरातील ते २० किमीचे रस्ते महापालिकेकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून मनपा हद्दीतून गेलेल्या २० किमीच्या रस्ते कोणाच्या ताब्यात आहेत. या विषयावरून मनपा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून मनपा हद्दीतून गेलेल्या २० किमीच्या रस्ते कोणाच्या ताब्यात आहेत. या विषयावरून मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेला पोरखेळवर अखेर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचा अंदाज समितीने घेतलेल्या आढावा बैठकीत बांधकाम विभागाने हे रस्ते मनपाकडेच असल्याचे स्पष्ट केले आहे, तसेच यावर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना अंदाज समितीच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मनपा आयुक्त अनुत्तरित राहिल्याने, हे रस्ते मनपाकडेच असल्याने रस्त्यांवरून अतिक्रमण काढल्यानंतरच हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा सूचना अंदाज समितीने मनपा प्रशासनाला दिल्या आहेत.

‘लोकमत’ ने गेल्या तीन दिवसांपासून शहरातून गेलेल्या २० किमीचे रस्ते नेमके मनपा की बांधकाम विभागाच्या हद्दीत आहेत. याबाबत वृत्त प्रकाशित केले होते, तसेच बांधकाम विभाग व मनपाकडूनही याबाबत टोलवा-टोलवी करण्यात येत होती. दोन्ही ही विभाग एकमेकांकडे जबाबदारी झटकत या प्रश्नापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. अखेर ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन मंगळवारी विधिमंडळाच्या तीस आमदारांच्या अंदाज समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत याबाबत हे रस्ते मनपाकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन्ही विभागांनी या रस्त्यांचा तमाशा केला

अंदाज समितीच्या सदस्यांनी शहरातून गेलेल्या सहा रस्त्यांचा सुरू असलेल्या पोरखेळाबाबत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना चांगलेच धरले. या रस्त्यांचा केवळ तमाशा दोन्हीही विभागांकडून सुरू असल्याचे सांगितले. हे रस्ते कोणाकडे याबाबत मनपा आयुक्तांना विचारण्यात आल्यावर त्यांनी याबाबत तपासणी करून, माहिती देण्याचे सांगितले, तर बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी थेट हे रस्ते मनपाकडेच असल्याचे सांगितले. त्यावर अंदाज समितीचे अध्यक्ष रणजीत कांबळे यांनी मनपाने केवळ ठराव केला होता. त्यामुळे त्या ठरावानंतर हे रस्ते थेट बांधकाम विभागाकडे जातील, असे होत नसल्याचे स्पष्ट केले.

अतिक्रमण काढा व बांधकाम विभागाकडे रस्ते द्या

महापालिकेकडे सद्यस्थितीत असलेले रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याआधी त्या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी मनपाचीच असून, लवकरात लवकर ते अतिक्रमण काढून हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा सूचना अंदाज समितीचे अध्यक्ष रणजीत कांबळे यांनी दिल्या. त्यामुळे रस्त्यांचा प्रश्नावर सुरू असलेला पोरखेळही थांबविण्याचा सूचना समिती अध्यक्षांनी दिल्या आहेत.