शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
4
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
5
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
6
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
7
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
8
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
9
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
10
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
11
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
12
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
13
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
14
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
15
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
16
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
18
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
19
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
20
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना

जळगावातील राष्टÑीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ‘नही’चा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 12:23 IST

मोबदला अ‍ॅवार्डविरोधात ‘नही’ कोर्टात

ठळक मुद्दे१० हेक्टरसाठी ८० कोटीच्या मोबदल्याला विरोधतरसोद -चिखली दरम्यान कामालाही विलंबनिकाल लागल्यानंतरच भूसंपादनाची प्रक्रिया होणार पूर्ण

जळगाव : राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांचे काम त्वरित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात असताना शहरातून जाणारा महामार्ग शहराबाहेर जाण्यासाठी करावयाच्या वळण रस्त्याची सुमारे १० हेक्टर जागाच अद्याप प्रशासनाच्या ताब्यात आलेली नाही.         या जागेच्या भूसंपादनासाठी केलेल्या अ‍ॅवार्डविरोधात ‘नही’ नेच (राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण) उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याने हे भूसंपादन रखडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आणखी एक-दोन महिने ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता असून त्यानंतरच या वळण रस्त्याच्या कामाला सुरूवात होऊ शकेल.तरसोद -चिखली दरम्यानही विलंबराष्टÑीय महामार्ग क्र.६च्या धुळे ते अमरावती दरम्यान  तीन टप्प्यात  करावयाच्या चौपदरीकरणासाठी २०१२ पासून प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यात सातत्याने वेगवेगळे अडथळे येत गेल्याने हे काम अर्धवटच आहे. महाराष्टÑातील अमरावती ते धुळे या दरम्यानच्या महामार्गापैकी जळगाव जिल्ह्यात चिखली ते तरसोद व तरसोद ते फागणे असे दोन टप्पे करून निविदा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी तरसोद ते फागणे या टप्प्याचे काम मिळालेल्या मक्तेदाराने कामाला वेगाने सुरूवात केली आहे. मात्र तरसोद ते फागणे या टप्प्याच्या कामाला अद्यापही सुरूवात झालेली नाही. मक्तेदाराकडून अद्याप कॅम्प उभारणीचेच काम सुरू आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने मक्तेदाराकडून आढावाही घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.तरसोद ते फागणे या टप्प्याचे काम मिळालेल्या मक्तेदाराने तातडीने कामाला प्रारंभ केला आहे. मात्र या मक्तेदाराकडेच असलेल्या जळगाव शहराबाहेरील वळण रस्त्याच्या कामात भूसंपादनच झालेले नसल्याने अडथळा निर्माण झाला आहे. जळगाव शहरातून जाणारा राष्टÑीय महामार्ग शहराबाहेरून वळविण्यासाठी तरसोदजवळील टीव्ही टॉवर पासून ते आव्हाणे शिवारातून थेट बांभोरीपर्यंत वळण रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या कमिटीने भूसंपादनाची कार्यवाही सुरू करून अ‍ॅवार्डही घोषीत केले. या वळण रस्त्यासाठी सुमारे १० हेक्टर जमीन लागणार असून त्याच्या मोबदल्यापोटी या कमिटीने सुमारे ८० कोटीचे अ‍ॅवार्ड केले आहे. मात्र ‘नही’ने याला उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने ही जमीन अद्यापही प्रशासनाच्या ताब्यातच आलेली नाही. त्यामुळे मक्तेदाराला या वळण रस्त्याचे काम सुरु करता आलेले नाही. शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे हा महामार्ग शहराबाहेरून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्या वळण रस्त्याच्या जागेच्या मोबदल्याची रक्कम जास्त असल्याचा आक्षेप घेत ’नही’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आधीच समांतर रस्ते नसल्याने अपघात होत असताना हा मार्ग शहराबाहेरून जाण्याच्या कामातही ’नही’मुळेही अडथळा निर्माण झाला आहे. निकाल लागल्यानंतरच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन वळण रस्त्याच्या कामाला सुरूवात होऊ शकेल, दरम्यान, याबाबत ‘नही’च्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.