शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

अतिक्रमणाने व्यापला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 12:19 IST

दुचाकींचे अतिक्रमण

रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे स्टेशनसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून सकाळपासून ठिकठिकाणी दुचाकींचे अतिक्रमण असते. परिणामी स्थानकामध्ये यायला आणि जायलही जागा रहात नाही. उभ्या आडव्या दुचाकींमुळे पडण्याचीदेखील शक्यता असते. विशेष म्हणजे महिला प्रवाशांना तर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दररोज दिसून येते. गेल्या आठवड्यात तर दुचाकी पार्किंगवरुन मोठा वाद झाला. एकमेकांच्या दुचाकींचा त्यांना थोडादेखील धक्का सहन झाला नाही. लगेच ते हमरी-तुमरीवर आले होते. अशा प्रकारे या अतिक्रमणामुळे अधून-मधून वाद उद्भभवत आहेत. सकाळी पॅसेंजर आल्यावर तर रिक्षावाले प्रवाशी घेण्यासाठी रस्त्यावरच उभे असतात. यामुळे अधिकच गर्दी होते. अनेकवेळा रिक्षाचालकदेखील स्टेशनमध्ये नातेवाईकांना सोडण्यासाठी आल्यावर दुचाकींसह रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्रतेही बसलेले असतात. यामुळे स्टेशनसमोरील कोंडीत अधिकच भर पडत आहे. पूर्वी बॅरिकेटस् नसल्यामुळे प्रवासी थेट दादऱ्यापर्यंत दुचाकी आणत होते. मात्र गेल्यावर्षी बॅरिकेटस् बसविल्यामुळे नागरिक रस्त्यावर गाड्या लावत आहेत. रेल्वे पोलीसही या विक्रेत्यांवर कारवाई करीत नाही. पोलीसच कारवाई करीत नसतील तर इतर प्रवाशी कशाला बोलतील, असा सवाल अनेक वेळा उपस्थित होतो. जर एखाद्या प्रवाशाने विरोध केला तर वाद घडण्याची भिती असते. त्यामुळे प्रवाशीदेखील दुर्लक्ष करतात. वाहनांच्या अतिक्रमणावरुन मोठा वाद झाला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.- अजय वाघ, प्रवासी.

टॅग्स :Jalgaonजळगाव