शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

अतिक्रमणाने व्यापला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 12:19 IST

दुचाकींचे अतिक्रमण

रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे स्टेशनसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून सकाळपासून ठिकठिकाणी दुचाकींचे अतिक्रमण असते. परिणामी स्थानकामध्ये यायला आणि जायलही जागा रहात नाही. उभ्या आडव्या दुचाकींमुळे पडण्याचीदेखील शक्यता असते. विशेष म्हणजे महिला प्रवाशांना तर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दररोज दिसून येते. गेल्या आठवड्यात तर दुचाकी पार्किंगवरुन मोठा वाद झाला. एकमेकांच्या दुचाकींचा त्यांना थोडादेखील धक्का सहन झाला नाही. लगेच ते हमरी-तुमरीवर आले होते. अशा प्रकारे या अतिक्रमणामुळे अधून-मधून वाद उद्भभवत आहेत. सकाळी पॅसेंजर आल्यावर तर रिक्षावाले प्रवाशी घेण्यासाठी रस्त्यावरच उभे असतात. यामुळे अधिकच गर्दी होते. अनेकवेळा रिक्षाचालकदेखील स्टेशनमध्ये नातेवाईकांना सोडण्यासाठी आल्यावर दुचाकींसह रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्रतेही बसलेले असतात. यामुळे स्टेशनसमोरील कोंडीत अधिकच भर पडत आहे. पूर्वी बॅरिकेटस् नसल्यामुळे प्रवासी थेट दादऱ्यापर्यंत दुचाकी आणत होते. मात्र गेल्यावर्षी बॅरिकेटस् बसविल्यामुळे नागरिक रस्त्यावर गाड्या लावत आहेत. रेल्वे पोलीसही या विक्रेत्यांवर कारवाई करीत नाही. पोलीसच कारवाई करीत नसतील तर इतर प्रवाशी कशाला बोलतील, असा सवाल अनेक वेळा उपस्थित होतो. जर एखाद्या प्रवाशाने विरोध केला तर वाद घडण्याची भिती असते. त्यामुळे प्रवाशीदेखील दुर्लक्ष करतात. वाहनांच्या अतिक्रमणावरुन मोठा वाद झाला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.- अजय वाघ, प्रवासी.

टॅग्स :Jalgaonजळगाव