शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यातील पिढीसाठी नद्यांचे अस्तित्व टिकविणे गरजेचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:32 IST

आपण भारतीय लोक, जगातल्या प्राचीन सभ्यतांपैकी एक असलेले लोक, जे पंचमहाभूतांची पूजा करतात, नद्यांना मातेसमान दर्जा देतात, पाण्यालाच जीवन ...

आपण भारतीय लोक, जगातल्या प्राचीन सभ्यतांपैकी एक असलेले लोक, जे पंचमहाभूतांची पूजा करतात, नद्यांना मातेसमान दर्जा देतात,

पाण्यालाच जीवन मानतात, आज त्याच नद्यांची आपण काय अवस्था करून ठेवली आहे? आज भारतभरातल्या नद्या मरणकळा सोसत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील बराचसा प्रदेश नद्यांमुळे सिंचनाखाली आहे. आपल्या जळगाव जिह्यात जवळपास १४ मोठ्या नद्या आहेत. ज्यात आपण तापी, गिरणा, वाघुर, अंजनी, गूळ यांचे नाव घेऊ शकतो.

गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील तापी व गिरणा या दोन नद्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत होत आहे. तापी नदीत भुसावळ शहरासह जळगाव एमआयडीसीतील कंपन्यांचे प्रदूषित पाणी सोडले जात आहे, तर गिरणा नदीतदेखील जळगाव शहराचे प्रदूषित पाण्यासह नदीपात्रात होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे परिस्थिती बिकट होत जात आहे.

तापी अंदाजे १३३ किलोमीटर, तर गिरणा अंदाजे १५५ किलोमीटरचा प्रवास जळगाव जिल्ह्यातून करते. तापी नदीच्या पाण्यावर जिल्ह्यातील सुमारे

३ लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे, तर गिरणेमुळे सुमारे दोन लाख हेक्टर जमिनीला लाभ मिळतो. मात्र, प्रदूषित पाणी व अवैध वाळू उपसा यामुळे या नद्या नामशेष होत जात आहेत.

जळगाव जिल्हा संपूर्ण देशात केळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, नद्यांची होणारी वाताहत पाहता येणाऱ्या २० वर्षात जिल्ह्यात केळी हे पीकदेखील घेणे कठीण होणार आहे. कारण पाण्याची समस्या अधिकच बिकट होण्याची भीती आहे. केंद्र शासनाच्या भूजल स्रोत विभागाने गेल्यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांमध्ये तापी नदीचा समावेश होता. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे.

नद्यांचे अस्तित्व संपले म्हणजे नद्याकाठची संस्कृतीदेखील लयास जात असते. इतिहासात याचे अनेक उदाहरणे आहे. नद्यांचे अस्तित्वावरच जैवविविधता अवलंबून आहे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे प्रशासनासोबतच पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनीदेखील एकत्र येऊन नद्यांसाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे. वाळू उपशाचे प्रश्न बिकट झाल्यानंतर गिरणा काठावरील अनेक गावांमध्ये आता जनजागृती होऊन युवक वर्ग पुढे सरसावत असून, नदीला वाचविण्यासाठी आता एक चळवळ उभी राहत आहे. गिरणा बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात नद्यांसाठी चळवळ उभी राहत असून, आता यासाठी

सर्वच स्तरातून मार्ग काढणे गरजेचे आहे. २०१९-२०२० ह्या एक वर्षात १९३ भारतीय माणसे वाळू उपशाच्या कुठल्या न कुठल्या प्रभावाने मृत्युमुखी पडले आहेत.

रोजगारनिर्मितीच्या कोणत्याही संधी न चुकवता अधिकाधिक संधी निर्माण करीत आपण वाळूला पर्याय शोधू शकतो; मात्र आपण अमेरिकेसारख्या देशाचे धडे गिरवायला बघतो. मात्र त्यांच्याकडून आपल्याला धडे घेता येणार नाहीयेत. अमेरिकेसारख्या देशात साठे अमाप आहेत व लोकसंख्या कमी. शिवाय अमेरिकेनेच त्यांच्या महत्त्वाच्या नद्यांचे भाग संरक्षित करण्यासाठी १९६८ पासून वाइल्ड ॲण्ड सिनिक रिव्हर्स ॲक्ट अमलात आणला आहे हे विसरतो. याहीपलीकडे जाऊन भूजलाची परिस्थितीसुद्धा वारंवार धोक्याचा इशारा देणारी आहे. आपल्यालाच आपला रस्ता शोधावा लागणार आहे. त्यात नद्यांचे/पाण्याचे संवर्धन, कायदे काटेकोर पाळणे, लोकसहभाग, कल्पकतेने नवे पर्याय विकसित करणे हे सगळे आलेच. आपण नद्या संपवून प्रगती करत आहोत त्याला आपण विकास म्हणणार आहोत का? आता युवकांनी पुढे येऊन व्यापक नद्यांना वाचविण्यासाठी व्यापक जनमत तयार करत नद्यांना संवर्धित करणे गरजेचे आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना हे सांगणे गरजेचे आहे की, तुमच्या गाडीच्या बुलेटप्रूफ काचा खाली करून जरा बघा खरा धोकाबंदुकीचा नाही तर इथल्या दूषित पाण्याचा आहे. जोवर नद्या अविरल-निर्मल मुक्तवाहिन्या राहतील तोवरच आपले भविष्य आहे हे आपल्याला आता समजून घ्यावे लागणार आहे.

गिरीश घनश्याम पाटील,

संस्थापक, योगी