शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पोलीस स्टेशनवर रिक्षा मोर्चा, आश्वासनानंतर आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST

अमळनेर : भाडे ठरवण्याच्या कारणावरून तिघांनी रात्री बसस्थानकावरील रिक्षा चालकांशी वाद घालून रिक्षाची तोडफोड केल्याच्या कारणावरून रिक्षा बंद आंदोलन ...

अमळनेर : भाडे ठरवण्याच्या कारणावरून तिघांनी रात्री बसस्थानकावरील रिक्षा चालकांशी वाद घालून रिक्षाची तोडफोड केल्याच्या कारणावरून रिक्षा बंद आंदोलन करून पोलीस स्टेशनवर रिक्षा मोर्चा नेण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

१९ रोजी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास योगेश गजानन सोनवणे, उमेश गजानन सोनवणे व गौरव गणेश परदेशी यांनी तिघांनी भाडे ठरवण्याच्या कारणावरून कैलास माळी यांच्याशी वाद घालून रिक्षा (एमएच१९/सीडब्ल्यू१५२९) हिच्यावर दगड मारून तोडफोड केली. तसेच ७ ते ८ जण जमा करून रिक्षाची किल्ली हिसकावून रिक्षा स्वामी समर्थ मंदिराकडे नेऊन जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्काळ पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी हेडकॉन्स्टेबल भरत ईशी याना पाठवल्याने रिक्षा वाचवण्यात आली.

दुसऱ्या दिवशी सर्व रिक्षा चालकांनी रिक्षा बंद आंदोलन पुकारले होते. तसेच पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी त्यांनी रिक्षा मोर्चा पोलीस स्टेशनवर आणला होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, टॅक्सी युनियन अध्यक्ष बंडू केळकर, रिक्षा युनियनचे अध्यक्ष कैलास माळी यांच्याशी चर्चा करून आरोपीना शिक्षा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद आंदोलन मागे घेऊन मोर्चा माघारी फिरला.