शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव हमी भावाची घोषणा होताच तांदळात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:49 IST

दोन दिवसात निर्यातही सुरू होण्याची शक्यता

जळगाव : इराणमध्ये निर्यात थांबलेल्या व अतिपावसामुळे मोठ्या प्रमाणात आवक वाढलेल्या तांदळाला वाढीव हमी भाव देण्याची घोषणा होताच तांदळाच्या भावात तेजी सुरू झाली आहे. सर्वच प्रकारच्या तांदळाचे भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्लिंटलने वधारले असून दोन दिवसात निर्यात सुरू होण्याची शक्यता असल्याने भाव आणखी वाढणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांकडून दिले जात आहे. विशेष म्हणजे वाढीव हमी भावाची घोषणा होताच तांदूळ मिलमालकांनी माल विक्रीतही हात आखडता घेतला आहे.यंदा झालेल्या अतिपावसामुळे इतर पिकांना फटका बसला असला तरी तांदळाला फायदा झाला. तांदळाच्या पिकाला सलग १०० दिवस पाणी लागते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या खंडामुळे तांदळाच्या आवकवर व दर्जावरही परिणाम होत असे. मात्र यंदा चांगल्या पावसामुळे तांदळाची बंपर आवक झाली आहे.आवक जास्त असली तरी भारतातून इराणमध्ये होणारी तांदळाची निर्यात थांबलेली आहे. भारतातून इराण, नेपाळ, मलेशिया, दुबई, अफ्रिका देश या भागात मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात होते. या निर्यात होणाºया तांदळापैकी ५० टक्के (दरवर्षी तब्बल ८ ते १० लाख टन) तांदळाची निर्यात एकट्या इराणमध्ये होते. भारतीय तांदळाचा प्रमुख खरेदीदार देश असलेल्या इराणकडून भारताने सध्या कच्च्या तेलाची (क्रूड आॅईल) खरेदी थांबविली आहे. कच्च्या तेलाच्या बदल्यात इराण भारताकडून तांदळाची आयात करतो. मात्र कच्च्या तेलाची खरेदीच होत नसल्याने इराणनेही भारतीय तांदूळ खरेदीला नकार दिला आहे.या दोन्ही कारणांमुळे तांदळाचा मोठा साठा देशात उपलब्ध झाला आहे. परिणामी आवक वाढल्याने तांदळाचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २५ ते ३० टक्क्याने खाली आले.नवीन वर्षापासून मोठी तेजीगडगडलेल्या तांदळात आता वाढीव हमी भावाच्या घोषणेने तेजीचे चित्र निर्माण झाले आहे. पूर्वी धानचा १८०० रुपये प्रती क्विंटल हमी भाव होता. त्यानंतर महायुती सरकारच्या काळात सरकारने ५०० रुपये प्रती क्विंटल वाढीव भाव दिला. आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी २०० रुपये प्रती क्विंटल वाढीव भाव देण्याची घोषणा केली. त्यामुळे धानचा हमी भाव आता २५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचला आहे. यामुळे तांदूळ निर्मिती करणाºया मिल मालकांनीही भाववाढीचा निर्णय घेतला. परिणामी तांदळाच्या बाजारात तेजी आली आहे.निर्यात सुरू होण्याची शक्यताइराणममध्ये थांबलेली निर्यात २५ डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ही निर्यात सुरू झाली की तांदळात आणखी तेजी येऊन नवीन वर्षापासून तांदळाचे भाव चांगलेच वधारणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या जळगावच्या बाजारपेठेसह राज्यातही विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, तूमसरसह छत्तीसगड, आंध्रप्रदेश, कर्नाटक, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, इत्यादी भागातून तांदळाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. मात्र वाढीव हमी भावामुळे मिल मालकांनी हात आखडता घेतल्याने ही आवक काहीसी कमी होऊन भाववाढीत आणखी भर पडू शकते, असेही सांगितले जात आहे.उत्पादकांना दिलासावाढीव हमी भाव देऊन धान उत्पादकांना मंदीतून सावरण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. या वाढीव हमी भावाने तांदळात तेजी येणार असली तरी दुसरीकडे धान उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.इराणमध्ये होणारी तांदळाची निर्यात थांबल्याने व आवकही चांगली असल्याने तांदळाचे भाव २५ ते ३० टक्क्याने गडगडले होते. मात्र धानला वाढीव हमी भाव देण्याची घोषणा झाल्याने तांदळाच्या भावात तेजी आली आहे. नवीन वर्षापासून आणखी भाव वाढू शकतात.- विनोद बलदवा, तांदूळ व्यापारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव