शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

जळगाव जिल्ह्यासाठी ६४३ कोटींचा सुधारीत प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:58 IST

एरंडोल तालुक्यात बाधीत क्षेत्रात वाढ

जळगाव : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे जिल्ह्यात झालेल्या बाधीत क्षेत्रामध्ये एरंडोल तालुक्यातील वाढीव क्षेत्राची भर पडल्याने हे क्षेत्र ७ लाख ४ हजार ८४३ हेक्टरवर पोहचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार ३२३ रुपयांचा मदतीचा सुधारीत प्रस्ताव राज्य शासनाच्या सचिवांकडे (मदत व पुनर्वसन) सादर करण्यात आला.जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊन त्यात कापूस, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीनंतर पंचनाम्याचे आदेश दिल्यावरही दिवाळीच्या सुट्यांमध्ये पंचनाम्याचे काम रखडले होते. अखेर पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवाल सचिवांकडे सादर करण्यात आला होता. त्यात जिल्ह्यात ७ लाख ३ हजार ७८७ हेक्टरवर नुकसान झाल्याचे नमूद करीत तसा प्रस्ताव मदत व पुनर्वसनविभागाकडे सादर केला होता. मात्र एरंडोल तालुक्याचे वाधीत क्षेत्रात वाढ झाल्याने प्रशासनाच्यावतीने सुधारीत अहवाल सादर करण्यात आला.एक हजार ३६ हेक्टर क्षेत्र वाढलेजिल्ह्यात जिल्ह्यात सहा लाख ३४ हजार ३६८ शेतकऱ्यांचे ७ लाख ३ हजार ७८७ हेक्टरवर नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. मात्र एरंडोल तालुक्यात एक हजार ३६ हेक्टर एवढे वाधीत क्षेत्र वाढले. त्यामुळे हे क्षेत्र वाढून सहा लाख ४१ हजार ३४५ शेतकºयांचे ७ लाख ४ हजार ८४३ हेक्टरवर पोहचले आहे.जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनाच्या सचिवांकडे (मदत व पुनर्वसन महसूल व वनविभाग) यांना हा सुधारीत अहवाल सादर केला आहे. अतिवृष्टीत पिकांच्या व फळपिकांच्या नुकसानीचे प्रपत्र अ, ब, क, ड अन्वये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवालात म्हटले आहे.जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापूस, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. कापसाला बोंड फुटल्यानंतर पाऊस आल्याने कपाशीचे बोंड अक्षरश: सडून गेली तर ज्वारी काळी पडली. तसेच मका व अन्य पिके काढून ठेवल्यानंतर अतिपावसामुळे त्यावर बुरशी आली. यामुळे कपाशीचा दर्जा खालावला आहे. सोबतच इतर पिके, चारा अतिवृष्टीने खराब झाली आहेत. त्यामुळे आता अहवाल सादर झाल्याने शेतकºयांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव