शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

परतीच्या पावसामुळे उत्पन्न घटण्याची शक्यता

By admin | Updated: October 17, 2015 00:22 IST

रांझणी/मोदलपाडा : तळोदा परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.

रांझणी/मोदलपाडा : तळोदा तालुक्यातील रांझणी व मोदलपाडा परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे कपाशी, सोयाबीन, मका, ज्वारी आदी पिकांची पेरणी शेतक:यांनी केली होती. मध्यंतरी पावसाने मोठी ओढ दिल्याने बागायती पिके अडचणीत आली होती. मात्र परतीचा पाऊस व पिकांवरील किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

भाद्रपद महिन्याच्या उन्हात पांढरेशुभ्र दिसणारे कापसाचे क्षेत्र लाल्या रोगामुळे सध्या लालभडक दिसत आहे. या रोगामुळे कपाशीची पाने, फुले, बोंडे गळून नुकसानीची भीती शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत. यंदा पेरणीनंतर चार ते पाच दिवस पाऊस पडला. त्यानंतर एक ते दीड महिन्याची दांडी मारल्याने विहीर, बोअरवेलला पाणी होते त्यावर कपाशी व इतर पिके जगविता आली. कपाशी लागवडीपासून तर काढण्यार्पयत शेतकरी या पिकाची काळजी घेत असतो. पाच ते सहा वेळा कोळपणी, निंदणीसह कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. तसेच रासायनिक खतांची मात्रा वेगळीच द्यावी लागते. एवढा खर्च व मेहनत करून जो कापूस घरात येईल तेवढेच खरे उत्पन्न मिळते.

तालुक्यातील इतर भागांमध्ये एरंडी, सूर्यफूल आदी पिकांची लागवड करण्यात आली. परंतु संततधार पावसाने ही पिकेसुद्धा जमीनदोस्त झाली असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे. या वेळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु पावसामुळे लवकर पेरणी करण्यात आलेल्या मका, बाजरी, ज्वारी, तूर, कपाशीसारख्या पिकांचे नुकसानकारक चित्र आहे. तसेच संततधार पावसाने चार ते पाच दिवस सातत्य ठेवल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने परिसरातील पाणी पातळीत सहा ते सात फुटाने वाढ झाली. परंतु लाल्यामुळे अपेक्षित असणारे उत्पादन मिळण्याची शक्यता दिसत नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात लागवड करण्यात आलेल्या कापसाच्या वेचणीला पावसामुळे अडथळा आल्याने कापसाने कोंब काढल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पन्नात घट निर्माण होणार आहे. (वार्ताहर)