शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

परतीच्या पावसामुळे उत्पन्न घटण्याची शक्यता

By admin | Updated: October 17, 2015 00:22 IST

रांझणी/मोदलपाडा : तळोदा परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.

रांझणी/मोदलपाडा : तळोदा तालुक्यातील रांझणी व मोदलपाडा परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे कपाशी, सोयाबीन, मका, ज्वारी आदी पिकांची पेरणी शेतक:यांनी केली होती. मध्यंतरी पावसाने मोठी ओढ दिल्याने बागायती पिके अडचणीत आली होती. मात्र परतीचा पाऊस व पिकांवरील किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

भाद्रपद महिन्याच्या उन्हात पांढरेशुभ्र दिसणारे कापसाचे क्षेत्र लाल्या रोगामुळे सध्या लालभडक दिसत आहे. या रोगामुळे कपाशीची पाने, फुले, बोंडे गळून नुकसानीची भीती शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत. यंदा पेरणीनंतर चार ते पाच दिवस पाऊस पडला. त्यानंतर एक ते दीड महिन्याची दांडी मारल्याने विहीर, बोअरवेलला पाणी होते त्यावर कपाशी व इतर पिके जगविता आली. कपाशी लागवडीपासून तर काढण्यार्पयत शेतकरी या पिकाची काळजी घेत असतो. पाच ते सहा वेळा कोळपणी, निंदणीसह कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. तसेच रासायनिक खतांची मात्रा वेगळीच द्यावी लागते. एवढा खर्च व मेहनत करून जो कापूस घरात येईल तेवढेच खरे उत्पन्न मिळते.

तालुक्यातील इतर भागांमध्ये एरंडी, सूर्यफूल आदी पिकांची लागवड करण्यात आली. परंतु संततधार पावसाने ही पिकेसुद्धा जमीनदोस्त झाली असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे. या वेळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु पावसामुळे लवकर पेरणी करण्यात आलेल्या मका, बाजरी, ज्वारी, तूर, कपाशीसारख्या पिकांचे नुकसानकारक चित्र आहे. तसेच संततधार पावसाने चार ते पाच दिवस सातत्य ठेवल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने परिसरातील पाणी पातळीत सहा ते सात फुटाने वाढ झाली. परंतु लाल्यामुळे अपेक्षित असणारे उत्पादन मिळण्याची शक्यता दिसत नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात लागवड करण्यात आलेल्या कापसाच्या वेचणीला पावसामुळे अडथळा आल्याने कापसाने कोंब काढल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पन्नात घट निर्माण होणार आहे. (वार्ताहर)