शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

काही ठिकाणी निर्बंध, बाजारपेठेत मात्र गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:16 IST

जळगाव : कोरोना रुग्णसंख्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढत असल्याने राज्य सरकारने आगामी पंधरा दिवस काही निर्बंध लागू केले आहे. मात्र, ...

जळगाव : कोरोना रुग्णसंख्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढत असल्याने राज्य सरकारने आगामी पंधरा दिवस काही निर्बंध लागू केले आहे. मात्र, जळगावात अधिकचे रुग्ण समोर आल्याने आधिच कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत, काही ठिकाणी हे निर्बंध असल्याने चांगले परिणाम समोर येतीलही, मात्र, बाजारपेठेतील अनियंत्रित गर्दीचे करायचे काय हा प्रश्न मात्र, प्रशासनासमोर कायम आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सलग ९५० पेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. गेल्या आठवडाभरात ६ हजारांपेक्षा नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही अत्यंत चिंतेचेी बाब असून यात शहरातील बाधितांचे प्रमाण हे थेट ४० टक्क्यांपेक्षा अधिक समोर आले आहेत. त्यामुळे शहरात नुकताच तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. त्यानंतर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

चित्रपटगृहे, हॉटेल्स

जिल्ह्यात चित्रपट गृहे बंदचे आदेश आहेत. तर हॉटेल्सला पन्नास टक्क्यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वास्तवात हॉटेल्समध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोक उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे.

विवाह समारंभ

लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स, सार्वजिनक मोक्ळ्या ठिकाणी, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करणे पुढील आदेशापर्यंत बंद, लग्न मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कोविड नियमावलींचे पालन करून धरच्या घरी, शास्त्रोक्त, वैदिक पद्धतीने अथवा नोंदणीकृत विवाह पद्धतीने साजरा करण्यात यावेत, नोंदणीकृत विवाहसाठी जास्तीत जास्त २० व्यक्तिंना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अंत्यविधी

अंत्यविधीसाठी वीस लोकांच्या उपस्थितीची परवागनी आहे. कोविड बाधित आणि संशियत रुग्णांवर नेरी नाका स्मशानभूमित अंत्यसंस्कार होत असून यासाठी कडक निकष ठेवण्यात आलेले आहेत.

कार्यालये

जिल्हा परिषदेसह शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती राहणार आहे. मात्र, जि. प. त. बाधितांची संख्या वाढल्याने दोन दिवसांपूर्वी अत्यंत कमी उपस्थिती होती. मात्र, सोमवारी संख्या वाढलेली होती. बांधकाम विभागात अधिक गर्दी झालेली होती.

गृह विलगीकरण

गेल्या काही महिन्यांपासून कंटेमेंट झोन ही संकल्पना केवळ कागदावरच होती. घरांनाही कसलाही फलक लावला जात नव्हता, मात्र, आता रुग्णसंख्या वाढायला लागल्याने व जिल्हाधिकारी यांनी सक्त सूचना दिल्याने आता गृह विलगीकरणातील रुग्णांच्या घरावर फलक लावला जात आहे.