शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

काही ठिकाणी निर्बंध, बाजारपेठेत मात्र गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:16 IST

जळगाव : कोरोना रुग्णसंख्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढत असल्याने राज्य सरकारने आगामी पंधरा दिवस काही निर्बंध लागू केले आहे. मात्र, ...

जळगाव : कोरोना रुग्णसंख्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढत असल्याने राज्य सरकारने आगामी पंधरा दिवस काही निर्बंध लागू केले आहे. मात्र, जळगावात अधिकचे रुग्ण समोर आल्याने आधिच कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत, काही ठिकाणी हे निर्बंध असल्याने चांगले परिणाम समोर येतीलही, मात्र, बाजारपेठेतील अनियंत्रित गर्दीचे करायचे काय हा प्रश्न मात्र, प्रशासनासमोर कायम आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सलग ९५० पेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. गेल्या आठवडाभरात ६ हजारांपेक्षा नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही अत्यंत चिंतेचेी बाब असून यात शहरातील बाधितांचे प्रमाण हे थेट ४० टक्क्यांपेक्षा अधिक समोर आले आहेत. त्यामुळे शहरात नुकताच तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. त्यानंतर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

चित्रपटगृहे, हॉटेल्स

जिल्ह्यात चित्रपट गृहे बंदचे आदेश आहेत. तर हॉटेल्सला पन्नास टक्क्यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वास्तवात हॉटेल्समध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोक उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे.

विवाह समारंभ

लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स, सार्वजिनक मोक्ळ्या ठिकाणी, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करणे पुढील आदेशापर्यंत बंद, लग्न मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कोविड नियमावलींचे पालन करून धरच्या घरी, शास्त्रोक्त, वैदिक पद्धतीने अथवा नोंदणीकृत विवाह पद्धतीने साजरा करण्यात यावेत, नोंदणीकृत विवाहसाठी जास्तीत जास्त २० व्यक्तिंना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अंत्यविधी

अंत्यविधीसाठी वीस लोकांच्या उपस्थितीची परवागनी आहे. कोविड बाधित आणि संशियत रुग्णांवर नेरी नाका स्मशानभूमित अंत्यसंस्कार होत असून यासाठी कडक निकष ठेवण्यात आलेले आहेत.

कार्यालये

जिल्हा परिषदेसह शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती राहणार आहे. मात्र, जि. प. त. बाधितांची संख्या वाढल्याने दोन दिवसांपूर्वी अत्यंत कमी उपस्थिती होती. मात्र, सोमवारी संख्या वाढलेली होती. बांधकाम विभागात अधिक गर्दी झालेली होती.

गृह विलगीकरण

गेल्या काही महिन्यांपासून कंटेमेंट झोन ही संकल्पना केवळ कागदावरच होती. घरांनाही कसलाही फलक लावला जात नव्हता, मात्र, आता रुग्णसंख्या वाढायला लागल्याने व जिल्हाधिकारी यांनी सक्त सूचना दिल्याने आता गृह विलगीकरणातील रुग्णांच्या घरावर फलक लावला जात आहे.