शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

काँग्रेस मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर शरसंधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 12:43 IST

डॉ.उल्हास पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सत्तेची मस्ती आली असून, सत्तेचा वापर करून ते जिल्ह्यात दहशत माजवत आहे. लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून बाहेर काढून व जामनेरमध्ये गिरीश महाजनांचा पराभव करून त्यांच्या दहशतीतून जिल्ह्याला मुक्त करण्याचा संकल्प मंगळवारी शहरातील लेवा भवन येथे झालेल्या मेळाव्यात कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.रावेर लोकसभा मतदार संघातील कॉँग्रेसचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यापूर्र्वी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे कॉँग्रेस व राष्टÑवादीचा मेळावा झाला. मेळाव्यात माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कॉँग्रेसच्या जिल्हा प्रभारी हेमलता पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, अरुण पाटील, कॉँग्रेसचे महानगरप्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, गफ्फार मलीक, राष्टÑवादीचे निरीक्षक करण खलासे, पीपीपीचे जगन सोनवणे, यांच्यासह कॉँग्रेस व राष्टÑवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.आता जर आपला पराभव झाला तर भविष्यात उमेदवार मिळणार नाही - डॉ.सतीश पाटीलरावेरची जागा कॉँग्रेस तर जळगावची जागा राष्टÑवादीकडे आली असून, दोन्ही पक्षाने एकमेकांसाठी काम करणे गरजेचे आहे. कारण या निवडणुकीत जर आपला पराभव झाला तर भविष्यात भाजपा विरोधात लढण्यासाठी आपल्याला उमेदवार मिळणार नाही, असे मत राष्टÑवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी व्यक्त केले. तसेच दोन्ही जागा जिंकून गिरीश महाजनांची झोप उडवून द्या, असेही आवाहन त्यांनी केले.खडसे - महाजनांनी काय काम केले? - रवींद्र पाटीलगिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्यात एकही विकासाचे काम केले नाही, केवळ थापा मारल्या. बोदवडला १५-१५ दिवस पाणी पुरवठा होत नाही. डॉ.उल्हास पाटील यांनी निवडून आल्यानंतर बोदवडचा पाणी प्रश्न सोडविण्याची हमी दिली तरच आम्ही त्यांचे काम करु, असा इशारा राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील यांनी दिला.विद्यमान खासदारांनी केवळ रेल्वेला थांबा देण्याचे काम केले - अरुणभाई गुजराथीविद्यमान खासदारांनी गेल्या निवडणुकीत जी काही आश्वासने दिली होती. त्यापैकी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसून, केवळ रेल्वेला थांबा देण्याचे काम केले. आता त्यांना थांबा देण्याची वेळ आली असल्याचे अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले. या मेळाव्यात करण खलसे, डॉ.राधेश्याम चौधरी, गफ्फार मलीक, सलीम पटेल, संजय गरुड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सिंहस्थाचे टॉनीक घेवून फुगलेला फुगा फोडून काढा - हेमलता पाटीलजिल्ह्यातील एक मंत्री नाशिक येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे टॉनीक घेवून, फुगला असून त्यांचा अहंकार आपल्याला या निवडणुकीत फोडायचा असल्याचे आवाहन कॉँग्रेसच्या प्रभारी हेमलता पाटील यांनी या मेळाव्यात केले.त्यांची सत्तेची मस्ती आता जिरवण्याची वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या.शक्तीप्रदर्शन करीत दाखल केला अर्जरावेर लोकसभा मतदार संघातून कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी मंगळवारी शक्तीप्रदर्शन करत दोन प्रतीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आधी मेळावा घेण्यात आला. त्यानंतर लेवा भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही रॅली पोहोचल्यावर तेथे प्रचंड गर्दी झाली होती. जिल्हाभरातून वाहने या ठिकाणी आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयसमोरून जाणारी वाहतूक भास्कर मार्केटकडे वळविण्यात आली होती. यावेळी डॉ. पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalgaon-pcजळगावMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019