शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

समाजोपयोगी ठरणाऱ्या संशोधनाला मिळते पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पेटंट हे बौद्धिक संपदेचे महत्त्वाचे अंग आहे. बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीचा वापर करून निर्माण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पेटंट हे बौद्धिक संपदेचे महत्त्वाचे अंग आहे. बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीचा वापर करून निर्माण केलेली संपदा. आपण लावलेला शोध समाजोपयोगी ठरू शकतो त्यावरच पेटंट अवलंबून असते. युवकांनी केलेल्या संशोधनाचे जतन करण्यासाठी पेटंट करून घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. तेजोमयी भालेराव यांनी व्यक्त केले. फुलापासून इन्स्टंट सूप तयार करून भारतीय पेटंट संशोधनाकडून नुकतेच डॉ. भालेराव यांनी पेटंट प्राप्त केले आहे. पेटंट काय असते, व कोणत्या संशोधनासाठी प्राप्त होते याबाबतची माहिती डॉ. भालेराव यांनी ‘लोकमत’ला दिली.

प्रश्न - कोणत्या प्रकारच्या संशोधनाला पेटंट प्राप्त होते ?

डॉ. भालेराव - जगात बौद्धिक संपदेचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगोलिक उपदर्शन (जीआय) इत्यादींचा समावेश होतो. एखाद्या व्यावसायिकाला त्याच्या व्यापार चिन्हासाठी ‘ट्रेडमार्क’ ही बौद्धिक संपदा घेता येते, तर एखाद्या लेखकाला, चित्रकाराला त्याच्या कलेची नोंद ‘कॉपीराइट’ या बौद्धिक संपदेअंतर्गत करून घेता येते, त्यात विविध प्रकार असतात, प्रत्येक देशाचे स्वतंत्र पेटंट असते. जे संशोधन समाजोपयोगी पडते त्याच संशोधनाला पेटंट दिले जाते.

पेटंट नोंदविण्याची प्रक्रिया कशी आहे ?

एखादे संशोधन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वाटेल की ते संशोधन आपणच केले आहे किंवा याआधी ते संशोधन झालेले नसावे, भारतीय पेटंट संस्थेकडे ही नोंद करावी लागते. यासाठी काही एजंटदेखील असतात. त्यांना ही माहिती किंवा संशोधन द्यावे लागते. पेटंट संस्थेचे प्रतिनिधी नंतर त्या संशोधनाची पडताळणी करतात. आधी ते संशोधन झाले की नाही, याबाबतची तपासणी केल्यानंतरच संशोधनाला पेटंट दिले जाते. पेटंट हे त्या-त्या देशापुरते किंवा प्रदेशापुरते मर्यादित असते. म्हणजे, भारतात नोंदवलेले पेटंट कोणी युरोपमध्ये वापरले, तर तुम्ही केस करू शकत नाही.

आपल्या कोणत्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे?

केळीच्या फुलापासून इन्स्टंट सूप बनविण्याच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. सध्या लीलावती रिसर्च सेंटरच्या माध्यमातून संशोधनाला वाव मिळावा म्हणून काम करीत आहे. त्यातील काही संशोधनांवर आता काम सुरू असून, यावर तीन ते चार विद्यार्थिनी काम करीत आहेत.

कोट

आपल्याकडे अनेक संशोधने झाली आहेत. मात्र, ती केवळ पोथीपुराणातच अडकून पडली आहेत. अनेक संशोधनांना संशोधकांनी उजेडात आणले आहे. आजच्या युवकांनीदेखील संशोधन केवळ आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता ते समाजापर्यंत आणण्याचे काम केले पाहिजे.

- तेजोमयी भालेराव, संचालिका, लीलावती रिसर्च सेंटर