शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

समाजोपयोगी ठरणाऱ्या संशोधनाला मिळते पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पेटंट हे बौद्धिक संपदेचे महत्त्वाचे अंग आहे. बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीचा वापर करून निर्माण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पेटंट हे बौद्धिक संपदेचे महत्त्वाचे अंग आहे. बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीचा वापर करून निर्माण केलेली संपदा. आपण लावलेला शोध समाजोपयोगी ठरू शकतो त्यावरच पेटंट अवलंबून असते. युवकांनी केलेल्या संशोधनाचे जतन करण्यासाठी पेटंट करून घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. तेजोमयी भालेराव यांनी व्यक्त केले. फुलापासून इन्स्टंट सूप तयार करून भारतीय पेटंट संशोधनाकडून नुकतेच डॉ. भालेराव यांनी पेटंट प्राप्त केले आहे. पेटंट काय असते, व कोणत्या संशोधनासाठी प्राप्त होते याबाबतची माहिती डॉ. भालेराव यांनी ‘लोकमत’ला दिली.

प्रश्न - कोणत्या प्रकारच्या संशोधनाला पेटंट प्राप्त होते ?

डॉ. भालेराव - जगात बौद्धिक संपदेचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगोलिक उपदर्शन (जीआय) इत्यादींचा समावेश होतो. एखाद्या व्यावसायिकाला त्याच्या व्यापार चिन्हासाठी ‘ट्रेडमार्क’ ही बौद्धिक संपदा घेता येते, तर एखाद्या लेखकाला, चित्रकाराला त्याच्या कलेची नोंद ‘कॉपीराइट’ या बौद्धिक संपदेअंतर्गत करून घेता येते, त्यात विविध प्रकार असतात, प्रत्येक देशाचे स्वतंत्र पेटंट असते. जे संशोधन समाजोपयोगी पडते त्याच संशोधनाला पेटंट दिले जाते.

पेटंट नोंदविण्याची प्रक्रिया कशी आहे ?

एखादे संशोधन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वाटेल की ते संशोधन आपणच केले आहे किंवा याआधी ते संशोधन झालेले नसावे, भारतीय पेटंट संस्थेकडे ही नोंद करावी लागते. यासाठी काही एजंटदेखील असतात. त्यांना ही माहिती किंवा संशोधन द्यावे लागते. पेटंट संस्थेचे प्रतिनिधी नंतर त्या संशोधनाची पडताळणी करतात. आधी ते संशोधन झाले की नाही, याबाबतची तपासणी केल्यानंतरच संशोधनाला पेटंट दिले जाते. पेटंट हे त्या-त्या देशापुरते किंवा प्रदेशापुरते मर्यादित असते. म्हणजे, भारतात नोंदवलेले पेटंट कोणी युरोपमध्ये वापरले, तर तुम्ही केस करू शकत नाही.

आपल्या कोणत्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे?

केळीच्या फुलापासून इन्स्टंट सूप बनविण्याच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. सध्या लीलावती रिसर्च सेंटरच्या माध्यमातून संशोधनाला वाव मिळावा म्हणून काम करीत आहे. त्यातील काही संशोधनांवर आता काम सुरू असून, यावर तीन ते चार विद्यार्थिनी काम करीत आहेत.

कोट

आपल्याकडे अनेक संशोधने झाली आहेत. मात्र, ती केवळ पोथीपुराणातच अडकून पडली आहेत. अनेक संशोधनांना संशोधकांनी उजेडात आणले आहे. आजच्या युवकांनीदेखील संशोधन केवळ आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता ते समाजापर्यंत आणण्याचे काम केले पाहिजे.

- तेजोमयी भालेराव, संचालिका, लीलावती रिसर्च सेंटर