शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

समाजोपयोगी ठरणाऱ्या संशोधनाला मिळते पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पेटंट हे बौद्धिक संपदेचे महत्त्वाचे अंग आहे. बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीचा वापर करून निर्माण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पेटंट हे बौद्धिक संपदेचे महत्त्वाचे अंग आहे. बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीचा वापर करून निर्माण केलेली संपदा. आपण लावलेला शोध समाजोपयोगी ठरू शकतो त्यावरच पेटंट अवलंबून असते. युवकांनी केलेल्या संशोधनाचे जतन करण्यासाठी पेटंट करून घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. तेजोमयी भालेराव यांनी व्यक्त केले. फुलापासून इन्स्टंट सूप तयार करून भारतीय पेटंट संशोधनाकडून नुकतेच डॉ. भालेराव यांनी पेटंट प्राप्त केले आहे. पेटंट काय असते, व कोणत्या संशोधनासाठी प्राप्त होते याबाबतची माहिती डॉ. भालेराव यांनी ‘लोकमत’ला दिली.

प्रश्न - कोणत्या प्रकारच्या संशोधनाला पेटंट प्राप्त होते ?

डॉ. भालेराव - जगात बौद्धिक संपदेचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगोलिक उपदर्शन (जीआय) इत्यादींचा समावेश होतो. एखाद्या व्यावसायिकाला त्याच्या व्यापार चिन्हासाठी ‘ट्रेडमार्क’ ही बौद्धिक संपदा घेता येते, तर एखाद्या लेखकाला, चित्रकाराला त्याच्या कलेची नोंद ‘कॉपीराइट’ या बौद्धिक संपदेअंतर्गत करून घेता येते, त्यात विविध प्रकार असतात, प्रत्येक देशाचे स्वतंत्र पेटंट असते. जे संशोधन समाजोपयोगी पडते त्याच संशोधनाला पेटंट दिले जाते.

पेटंट नोंदविण्याची प्रक्रिया कशी आहे ?

एखादे संशोधन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वाटेल की ते संशोधन आपणच केले आहे किंवा याआधी ते संशोधन झालेले नसावे, भारतीय पेटंट संस्थेकडे ही नोंद करावी लागते. यासाठी काही एजंटदेखील असतात. त्यांना ही माहिती किंवा संशोधन द्यावे लागते. पेटंट संस्थेचे प्रतिनिधी नंतर त्या संशोधनाची पडताळणी करतात. आधी ते संशोधन झाले की नाही, याबाबतची तपासणी केल्यानंतरच संशोधनाला पेटंट दिले जाते. पेटंट हे त्या-त्या देशापुरते किंवा प्रदेशापुरते मर्यादित असते. म्हणजे, भारतात नोंदवलेले पेटंट कोणी युरोपमध्ये वापरले, तर तुम्ही केस करू शकत नाही.

आपल्या कोणत्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे?

केळीच्या फुलापासून इन्स्टंट सूप बनविण्याच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. सध्या लीलावती रिसर्च सेंटरच्या माध्यमातून संशोधनाला वाव मिळावा म्हणून काम करीत आहे. त्यातील काही संशोधनांवर आता काम सुरू असून, यावर तीन ते चार विद्यार्थिनी काम करीत आहेत.

कोट

आपल्याकडे अनेक संशोधने झाली आहेत. मात्र, ती केवळ पोथीपुराणातच अडकून पडली आहेत. अनेक संशोधनांना संशोधकांनी उजेडात आणले आहे. आजच्या युवकांनीदेखील संशोधन केवळ आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता ते समाजापर्यंत आणण्याचे काम केले पाहिजे.

- तेजोमयी भालेराव, संचालिका, लीलावती रिसर्च सेंटर