शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

समाजोपयोगी ठरणाऱ्या संशोधनाला मिळते पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पेटंट हे बौद्धिक संपदेचे महत्त्वाचे अंग आहे. बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीचा वापर करून निर्माण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पेटंट हे बौद्धिक संपदेचे महत्त्वाचे अंग आहे. बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीचा वापर करून निर्माण केलेली संपदा. आपण लावलेला शोध समाजोपयोगी ठरू शकतो त्यावरच पेटंट अवलंबून असते. युवकांनी केलेल्या संशोधनाचे जतन करण्यासाठी पेटंट करून घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. तेजोमयी भालेराव यांनी व्यक्त केले. फुलापासून इन्स्टंट सूप तयार करून भारतीय पेटंट संशोधनाकडून नुकतेच डॉ. भालेराव यांनी पेटंट प्राप्त केले आहे. पेटंट काय असते, व कोणत्या संशोधनासाठी प्राप्त होते याबाबतची माहिती डॉ. भालेराव यांनी ‘लोकमत’ला दिली.

प्रश्न - कोणत्या प्रकारच्या संशोधनाला पेटंट प्राप्त होते ?

डॉ. भालेराव - जगात बौद्धिक संपदेचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगोलिक उपदर्शन (जीआय) इत्यादींचा समावेश होतो. एखाद्या व्यावसायिकाला त्याच्या व्यापार चिन्हासाठी ‘ट्रेडमार्क’ ही बौद्धिक संपदा घेता येते, तर एखाद्या लेखकाला, चित्रकाराला त्याच्या कलेची नोंद ‘कॉपीराइट’ या बौद्धिक संपदेअंतर्गत करून घेता येते, त्यात विविध प्रकार असतात, प्रत्येक देशाचे स्वतंत्र पेटंट असते. जे संशोधन समाजोपयोगी पडते त्याच संशोधनाला पेटंट दिले जाते.

पेटंट नोंदविण्याची प्रक्रिया कशी आहे ?

एखादे संशोधन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वाटेल की ते संशोधन आपणच केले आहे किंवा याआधी ते संशोधन झालेले नसावे, भारतीय पेटंट संस्थेकडे ही नोंद करावी लागते. यासाठी काही एजंटदेखील असतात. त्यांना ही माहिती किंवा संशोधन द्यावे लागते. पेटंट संस्थेचे प्रतिनिधी नंतर त्या संशोधनाची पडताळणी करतात. आधी ते संशोधन झाले की नाही, याबाबतची तपासणी केल्यानंतरच संशोधनाला पेटंट दिले जाते. पेटंट हे त्या-त्या देशापुरते किंवा प्रदेशापुरते मर्यादित असते. म्हणजे, भारतात नोंदवलेले पेटंट कोणी युरोपमध्ये वापरले, तर तुम्ही केस करू शकत नाही.

आपल्या कोणत्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे?

केळीच्या फुलापासून इन्स्टंट सूप बनविण्याच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. सध्या लीलावती रिसर्च सेंटरच्या माध्यमातून संशोधनाला वाव मिळावा म्हणून काम करीत आहे. त्यातील काही संशोधनांवर आता काम सुरू असून, यावर तीन ते चार विद्यार्थिनी काम करीत आहेत.

कोट

आपल्याकडे अनेक संशोधने झाली आहेत. मात्र, ती केवळ पोथीपुराणातच अडकून पडली आहेत. अनेक संशोधनांना संशोधकांनी उजेडात आणले आहे. आजच्या युवकांनीदेखील संशोधन केवळ आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता ते समाजापर्यंत आणण्याचे काम केले पाहिजे.

- तेजोमयी भालेराव, संचालिका, लीलावती रिसर्च सेंटर