शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना गुंडाळत शासनाने मागविला अहवाल; प्रभाव ‘लोकमत’चा

By विलास बारी | Updated: November 3, 2023 17:49 IST

सचिवांनी मागविला साहाय्यक कामगार आयुक्तांकडून अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व राज्य शासनाकडून नोंदीत बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या मध्यान्ह व रात्रकालीन भोजन योजनेतील अनागोंदी ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर शासनाने आता ही योजना गुंडाळली आहे. तसेच या योजनेशी संबंधित अहवाल उपसचिव दा.सो. खताळ यांनी मागविला आहे. दरम्यान, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी जळगावच्या साहाय्यक कामगार आयुक्तांकडून याबाबत अहवाल मागविला आहे.

राज्यातील बांधकाम कामगारांना मध्यान्ह व रात्रकालीन भोजनासाठी राज्य शासनाने ३० ऑगस्ट २०२१ पासून मुंबईसह राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये योजना सुरू केली. जळगाव, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, अहमदनगर या ठिकाणी भोजन पुरविण्यासाठी मे. इंडो अलाईड प्रोटीन फूडस् प्रा.लि. या कंपनीसोबत शासनाने करार केला आहे. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान झालेले दुर्लक्ष, करारनाम्यातील अटी व शर्तींच्या उल्लंघनाकडे केलेला कानाडोळा, बांधकाम मजुरांऐवजी दुसऱ्याच याद्यांना देण्यात आलेली मंजुरी या सर्व बाबी ‘लोकमत’ने दि. ८ ते १३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान प्रसिद्ध केल्या होत्या. या वृत्तमालिकेची दखल घेत शासनाने राज्यातील सर्वच कामगार आयुक्त कार्यालयांकडून माहिती मागविली.

वित्तीय कारण देत केली योजना बंदया योजनेच्या अंमलबजावणीवेळी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने या योजनेसाठी राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेतील तरतुदीस पाच वर्षे झाली तसेच वित्तीय आणि प्रशासकीय बाबी लक्षात घेता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सर्व कामगार आयुक्त कार्यालयांना कळविण्यात आले आहे.

योजना बंद केली; मात्र, अदा केलेल्या रकमेचे काय?शासनाने वित्तीय कारण देत ही योजना गुंडाळली आहे. मात्र, साहाय्यक कामगार अधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षामुळेच या योजनेतील भोजन बिलाची रक्कम ठेकेदाराच्या खिशात गेली. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सचिवांनी मागविला साहाय्यक कामगार आयुक्तांकडून अहवाल‘लोकमत’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून या योजनेतील अनागोंदी समोर आणल्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी साहाय्यक कामगार आयुक्तांकडून अहवाल मागविला आहे. मात्र, ज्यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप आहे, त्यांच्याकडून अहवाल मागविणे योग्य नसल्याने यावर आपण आक्षेप घेतला असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण सपकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पालकमंत्र्यांनी मागविली माहिती

या योजनेतील अनागोंदीची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत बिरार यांना कागदपत्रांसह हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत. या आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे.