शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना गुंडाळत शासनाने मागविला अहवाल; प्रभाव ‘लोकमत’चा

By विलास बारी | Updated: November 3, 2023 17:49 IST

सचिवांनी मागविला साहाय्यक कामगार आयुक्तांकडून अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व राज्य शासनाकडून नोंदीत बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या मध्यान्ह व रात्रकालीन भोजन योजनेतील अनागोंदी ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर शासनाने आता ही योजना गुंडाळली आहे. तसेच या योजनेशी संबंधित अहवाल उपसचिव दा.सो. खताळ यांनी मागविला आहे. दरम्यान, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी जळगावच्या साहाय्यक कामगार आयुक्तांकडून याबाबत अहवाल मागविला आहे.

राज्यातील बांधकाम कामगारांना मध्यान्ह व रात्रकालीन भोजनासाठी राज्य शासनाने ३० ऑगस्ट २०२१ पासून मुंबईसह राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये योजना सुरू केली. जळगाव, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, अहमदनगर या ठिकाणी भोजन पुरविण्यासाठी मे. इंडो अलाईड प्रोटीन फूडस् प्रा.लि. या कंपनीसोबत शासनाने करार केला आहे. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान झालेले दुर्लक्ष, करारनाम्यातील अटी व शर्तींच्या उल्लंघनाकडे केलेला कानाडोळा, बांधकाम मजुरांऐवजी दुसऱ्याच याद्यांना देण्यात आलेली मंजुरी या सर्व बाबी ‘लोकमत’ने दि. ८ ते १३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान प्रसिद्ध केल्या होत्या. या वृत्तमालिकेची दखल घेत शासनाने राज्यातील सर्वच कामगार आयुक्त कार्यालयांकडून माहिती मागविली.

वित्तीय कारण देत केली योजना बंदया योजनेच्या अंमलबजावणीवेळी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने या योजनेसाठी राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेतील तरतुदीस पाच वर्षे झाली तसेच वित्तीय आणि प्रशासकीय बाबी लक्षात घेता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सर्व कामगार आयुक्त कार्यालयांना कळविण्यात आले आहे.

योजना बंद केली; मात्र, अदा केलेल्या रकमेचे काय?शासनाने वित्तीय कारण देत ही योजना गुंडाळली आहे. मात्र, साहाय्यक कामगार अधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षामुळेच या योजनेतील भोजन बिलाची रक्कम ठेकेदाराच्या खिशात गेली. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सचिवांनी मागविला साहाय्यक कामगार आयुक्तांकडून अहवाल‘लोकमत’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून या योजनेतील अनागोंदी समोर आणल्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी साहाय्यक कामगार आयुक्तांकडून अहवाल मागविला आहे. मात्र, ज्यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप आहे, त्यांच्याकडून अहवाल मागविणे योग्य नसल्याने यावर आपण आक्षेप घेतला असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण सपकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पालकमंत्र्यांनी मागविली माहिती

या योजनेतील अनागोंदीची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत बिरार यांना कागदपत्रांसह हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत. या आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे.