शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

तोडलेली शौचालये पुन्हा त्याच जागी बांधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:12 IST

जळगाव : स्वच्छ भारत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बांधलेली शिवाजीनगर भागातील शौचालये मनपाने तोडली आहेत, तसेच इतर ठिकाणी ...

जळगाव : स्वच्छ भारत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बांधलेली शिवाजीनगर भागातील शौचालये मनपाने तोडली आहेत, तसेच इतर ठिकाणी नवीन शौचालये बांधण्यात येतील, असे मनपाकडून सांगण्यात आले होते; मात्र दोन महिने होऊनदेखील तोडलेल्या शौचालयांची दुरुस्तीदेखील करण्यात आली नसून, नवीन शौचालयेदेखील बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मनपाने पुन्हा त्याच ठिकाणी शौचालये तयार करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता युसूफ शहा, तुषार इंगळे, अकील पटेल यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.

थंडीचा जोर कायम

जळगाव - उत्तरेकडूून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला असल्याने जिल्ह्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान १२ अंशावर कायम आहे, तसेच आगामी आठवडाभर कोरडे हवामान कायम राहणार असल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ होऊन तापमान १० अंशापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे. थंडीचा जोर वाढल्याने रब्बीच्या गहू, हरभरा या पिकांना फायदा होणार आहे.

स्वखर्चाने नगरसेवकाने गटारीची केली दुरुस्ती

जळगाव - प्रभाग क्रमांक २ मधील जाफर चौक परिसरातील एका वाड्यात गेल्या पंधरा दिवसांपासून गटारीचे सांडपाणी रस्त्यावर येत होते. याबाबत या भागातील नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सोमवारी दारकुंडे यांनी स्वखर्चाने गटारीची दुरुस्तीचे काम केले आहे. यामुळे गटारीतून रस्त्यावर येणारे सांडपाणी थांबले आहे.

कानळदा रस्त्याचे ढिसाळ काम सुरू

जळगाव - जळगाव शहराकडून जाणाऱ्या कानळदा रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राजाराम नगर ते केसी पार्कपर्यंत सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू असून, हे काम अत्यंत खराब पद्धतीने सुरू आहे. तब्बल २१ गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचे काम अनेक वर्षांनंतर होत आहे; मात्र खडी व सिमेंटचे प्रमाण कमी असल्याने महिनाभरातच हा रस्ता खराब होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.या कामाबाबत मक्तेदाराला कोणीही जाब विचारत नसल्याने अत्यंत सुमार दर्जाचे हे काम सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

तालुक्यात अघोषित भारनियमन

जळगाव - तालुक्यातील आव्हाणे, फुपनगरी, खेडी, वडनगरी या गावांमध्ये दररोज दोन ते तीन तास सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे, तसेच महावितरणकडे विचारणा केली असता, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही कारण दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. दुपारी व सायंकाळच्या वेळेस अचानक वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यासह शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पुरवठ्यातदेखील अनेक वेळा खंड पडत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.