शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तोडलेली शौचालये पुन्हा त्याच जागी बांधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:12 IST

जळगाव : स्वच्छ भारत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बांधलेली शिवाजीनगर भागातील शौचालये मनपाने तोडली आहेत, तसेच इतर ठिकाणी ...

जळगाव : स्वच्छ भारत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बांधलेली शिवाजीनगर भागातील शौचालये मनपाने तोडली आहेत, तसेच इतर ठिकाणी नवीन शौचालये बांधण्यात येतील, असे मनपाकडून सांगण्यात आले होते; मात्र दोन महिने होऊनदेखील तोडलेल्या शौचालयांची दुरुस्तीदेखील करण्यात आली नसून, नवीन शौचालयेदेखील बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मनपाने पुन्हा त्याच ठिकाणी शौचालये तयार करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता युसूफ शहा, तुषार इंगळे, अकील पटेल यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.

थंडीचा जोर कायम

जळगाव - उत्तरेकडूून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला असल्याने जिल्ह्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान १२ अंशावर कायम आहे, तसेच आगामी आठवडाभर कोरडे हवामान कायम राहणार असल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ होऊन तापमान १० अंशापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे. थंडीचा जोर वाढल्याने रब्बीच्या गहू, हरभरा या पिकांना फायदा होणार आहे.

स्वखर्चाने नगरसेवकाने गटारीची केली दुरुस्ती

जळगाव - प्रभाग क्रमांक २ मधील जाफर चौक परिसरातील एका वाड्यात गेल्या पंधरा दिवसांपासून गटारीचे सांडपाणी रस्त्यावर येत होते. याबाबत या भागातील नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सोमवारी दारकुंडे यांनी स्वखर्चाने गटारीची दुरुस्तीचे काम केले आहे. यामुळे गटारीतून रस्त्यावर येणारे सांडपाणी थांबले आहे.

कानळदा रस्त्याचे ढिसाळ काम सुरू

जळगाव - जळगाव शहराकडून जाणाऱ्या कानळदा रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राजाराम नगर ते केसी पार्कपर्यंत सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू असून, हे काम अत्यंत खराब पद्धतीने सुरू आहे. तब्बल २१ गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचे काम अनेक वर्षांनंतर होत आहे; मात्र खडी व सिमेंटचे प्रमाण कमी असल्याने महिनाभरातच हा रस्ता खराब होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.या कामाबाबत मक्तेदाराला कोणीही जाब विचारत नसल्याने अत्यंत सुमार दर्जाचे हे काम सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

तालुक्यात अघोषित भारनियमन

जळगाव - तालुक्यातील आव्हाणे, फुपनगरी, खेडी, वडनगरी या गावांमध्ये दररोज दोन ते तीन तास सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे, तसेच महावितरणकडे विचारणा केली असता, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही कारण दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. दुपारी व सायंकाळच्या वेळेस अचानक वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यासह शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पुरवठ्यातदेखील अनेक वेळा खंड पडत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.