शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तोडलेली शौचालये पुन्हा त्याच जागी बांधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:12 IST

जळगाव : स्वच्छ भारत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बांधलेली शिवाजीनगर भागातील शौचालये मनपाने तोडली आहेत, तसेच इतर ठिकाणी ...

जळगाव : स्वच्छ भारत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बांधलेली शिवाजीनगर भागातील शौचालये मनपाने तोडली आहेत, तसेच इतर ठिकाणी नवीन शौचालये बांधण्यात येतील, असे मनपाकडून सांगण्यात आले होते; मात्र दोन महिने होऊनदेखील तोडलेल्या शौचालयांची दुरुस्तीदेखील करण्यात आली नसून, नवीन शौचालयेदेखील बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मनपाने पुन्हा त्याच ठिकाणी शौचालये तयार करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता युसूफ शहा, तुषार इंगळे, अकील पटेल यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.

थंडीचा जोर कायम

जळगाव - उत्तरेकडूून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला असल्याने जिल्ह्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान १२ अंशावर कायम आहे, तसेच आगामी आठवडाभर कोरडे हवामान कायम राहणार असल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ होऊन तापमान १० अंशापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे. थंडीचा जोर वाढल्याने रब्बीच्या गहू, हरभरा या पिकांना फायदा होणार आहे.

स्वखर्चाने नगरसेवकाने गटारीची केली दुरुस्ती

जळगाव - प्रभाग क्रमांक २ मधील जाफर चौक परिसरातील एका वाड्यात गेल्या पंधरा दिवसांपासून गटारीचे सांडपाणी रस्त्यावर येत होते. याबाबत या भागातील नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सोमवारी दारकुंडे यांनी स्वखर्चाने गटारीची दुरुस्तीचे काम केले आहे. यामुळे गटारीतून रस्त्यावर येणारे सांडपाणी थांबले आहे.

कानळदा रस्त्याचे ढिसाळ काम सुरू

जळगाव - जळगाव शहराकडून जाणाऱ्या कानळदा रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राजाराम नगर ते केसी पार्कपर्यंत सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू असून, हे काम अत्यंत खराब पद्धतीने सुरू आहे. तब्बल २१ गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचे काम अनेक वर्षांनंतर होत आहे; मात्र खडी व सिमेंटचे प्रमाण कमी असल्याने महिनाभरातच हा रस्ता खराब होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.या कामाबाबत मक्तेदाराला कोणीही जाब विचारत नसल्याने अत्यंत सुमार दर्जाचे हे काम सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

तालुक्यात अघोषित भारनियमन

जळगाव - तालुक्यातील आव्हाणे, फुपनगरी, खेडी, वडनगरी या गावांमध्ये दररोज दोन ते तीन तास सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे, तसेच महावितरणकडे विचारणा केली असता, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही कारण दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. दुपारी व सायंकाळच्या वेळेस अचानक वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यासह शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पुरवठ्यातदेखील अनेक वेळा खंड पडत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.