शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

टपावरून पाणी गळणाऱ्या १० बसची केली दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर बसच्या टपावरून पाणी गळती होत असलेल्या १० बस आढळून आल्यानंतर, जळगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर बसच्या टपावरून पाणी गळती होत असलेल्या १० बस आढळून आल्यानंतर, जळगाव आगारातर्फे या सर्व बस दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच ज्या बसमध्ये फाटलेली व वाकलेली आसने आढळून येत आहेत, त्या बसची देखील तत्काळ दुरुस्ती करण्यात येत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

महामंडळातर्फे दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी बसच्या टपांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येते. त्यानुसार जळगाव विभागातर्फेही पावसाळ्यापूर्वी प्रत्येक बसच्या टपाची पाहणी करण्यात येऊन ज्या - ज्या ठिकाणी कुजलेला पत्रा आढळून आला, त्या ठिकाणी नवीन लोखंडी पत्रा जोडून, दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतरही काही बसच्या टपावरून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जळगाव आगारातर्फे या सर्व बसची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच चालक-वाहकांना ज्या पावसाळ्यात ज्या बसच्या टपावरून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले असेल, त्या बसची माहिती तत्काळ आगार प्रशासनाला देण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्यामुळे संबंधित बसच्या छताची तत्काळ दुरुस्ती होऊन, प्रवाशांची गैरसोय टळत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

पावसाळ्यापूर्वी बसच्या टपांची दुरुस्ती करण्यात येत असते. नुकत्याच १० बसच्या टपांची दुरुस्ती करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामंडळातर्फे तत्काळ या बसची दुरुस्ती केली जाते. तसेच बसमध्ये कुठे आसने फाटलेली असतील, तर त्यांची तत्काळ दुरुस्ती केली जाते.

नीलेश पाटील, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार

इन्फो :

गाड्यांचा मेंटेनन्स वाढला, पण पैसा नाही :

- गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे महामंडळाच्या अनेक बसचे स्पेअर पार्ट व बॉडीचे नुकसान झाले. यावर दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च आला असल्याचे सांगण्यात आले.

- विशेषत: जळगाव ते औरंगाबाद या रस्त्यावर बसच्या टायरांचा मोठा घसारा झाला. दर आठवड्याला अनेक गाड्यांचे टायर पंक्चर व्हायचे. त्यामुळे टायरावर मोठ्या प्रमाणावर खर्च झाला असल्याचे सांगण्यात आले.

- कोरोनामुळे आधीच महामंडळाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यात उत्पन्नापेक्षा बसच्या मेंटेनन्सवर जास्त पैसा खर्च होत आहेत. त्यामुळे तोट्यात असलेले महामंडळ अधिकच तोट्यात जात आहे.

इन्फो :

तुटलेल्या आसनांमुळे बसचा प्रवास कसरतीचा

आता पावसाळ्यात बसमध्ये टपावरून पाणी गळताना कुठे दिसून आले नाही. मात्र, अनेक बसमध्ये शेवटच्या रांगेतील आसने तुटलेली आढळून येत असल्यामुळे व्यवस्थित बसता येत नाही. त्यात खड्ड्यांमुळे खाली-वर होत असल्यामुळे, शेवटच्या आसनांवर बसून प्रवास खूपच कसरतीचा होतो.

- पंकज पाटील, प्रवासी

पूर्वी गळक्या बस खूप दिसायच्या. मात्र, आता हे प्रमाण कमी दिसते. आसनेही चांगली असतात. मात्र, बसमधील पिंचकाऱ्यांनी रंगलेल्या खिडक्यांमुळे बसचा प्रवास करायला आवडत नाही. खिडक्यांजवळ बसू वाटत नाही. महामंडळाने स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- सुरेश शिंदे, प्रवासी