शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नूतनीकरणासाठी गाळेधारकांनाच सिद्ध करावी लागेल पात्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:16 IST

मनपा प्रशासनाकडून घेतली जाईल सुनावणी : दोन महिन्यांच्या काळात प्रक्रिया होणार पूर्ण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या मुदत ...

मनपा प्रशासनाकडून घेतली जाईल सुनावणी : दोन महिन्यांच्या काळात प्रक्रिया होणार पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत बुधवारी झालेल्या महासभेत मनपा प्रशासनाने सादर केलेल्या धोरणाला महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळ्यांचा नूतनीकरण व लिलावाचा मार्ग मोकळा झाला असून, नूतनीकरणासाठी गाळेधारक पात्र आहेत की नाही, याबाबतची पात्रता आता गाळेधारकांना मनपाकडे सिद्ध करावी लागणार आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून शहरातील २३ मार्केटमधील सुमारे २७०० गाळेधारकांच्या गाळ्यांची मुदत संपली होती. मात्र, याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केल्याने हे प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. तसेच न्यायालयाने निर्णय देऊनही केवळ राजकीय फायद्यासाठी याप्रकरणी कोणतीही कार्यवाही होऊ शकली नव्हती. मात्र, मनपा प्रशासनाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन तोडगा काढण्यासाठी महासभेपुढे प्रस्ताव ठेवला होता. तसेच या प्रस्तावाला महासभेची मान्यता मिळाल्यामुळे आता मनपा प्रशासनाला थकीत भाडे वसूल करून नूतनीकरण की लिलाव याबाबतचा निर्णय घेता येणार आहे.

पंधरा दिवसांत राबवण्यात येणार सुनावणी प्रक्रिया

गाळेधारकांना नूतनीकरण करण्यासंदर्भात मनपा प्रशासनाकडून नवीन नियमावली जाहीर केली जाणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये राज्य शासनाने ७९ क या कलमामध्ये केलेल्या बदलानुसार गाळेधारक नूतनीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. या संदर्भातली नियमावली गाळेधारकांना दिल्यानंतर गाळेधारक या नियमावलीच्या पात्रतेत बसत आहेत की नाही, याबाबतचे पुरावे महापालिका प्रशासनाकडे सादर करावे लागणार आहेत. जे गाळेधारक या नियमावलीत बसतील. त्यांनाच नूतनीकरणाचा लाभ मिळू शकणार आहे. याबाबतची प्रक्रिया पंधरा दिवसांत राबवली जाणार आहे.

पात्र न झाल्यास गाळ्यांचा होणार लिलाव

मनपाच्या नियमावलीत जे गाळेधारक पात्र ठरणार नाहीत, अशा गाळेधारकांच्या गाळ्यांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच गाळेधारकांना पात्र ठरण्यासाठी ९ वर्षांची थकीत भाड्याची रक्कम मनपाकडे भरावीच लागणार आहे. थकीत भाड्याची रक्कम न भरल्यास गाळे लिलाव अटळ आहे. २७०० गाळेधारकांपैकी केवळ २६० गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम आतापर्यंत भरली आहे.