शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मरणाचे स्मरण व्हावे.. हरिभक्तीशी सादर व्हावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:34 IST

भगवान गोपाळकृष्णाच्या अवतार समाप्तीनंगर पांडवांनी, आपल्या नातवास म्हणजे परिक्षित यास राज्याभिषेक केला अन पांडव द्रौपदीसह स्वर्गारोहणास निघून गेले. अहंकाराच्या ...

भगवान गोपाळकृष्णाच्या अवतार समाप्तीनंगर पांडवांनी, आपल्या नातवास म्हणजे परिक्षित यास राज्याभिषेक केला अन पांडव द्रौपदीसह स्वर्गारोहणास निघून गेले. अहंकाराच्या भरात राजा परिक्षीतीने शमिक ऋषींच्या गळ्यात मृत सर्प टाकून अपमान केला. शमिकपुत्र शृंगीने, राजा परिक्षितीस शाप दिला. ‘ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यात मृत सपर्क टाकला असेल, त्यास आज पासून सातव्या दिवशी तक्षक नावाचा भुजंग (सर्प) दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल.राजा परिक्षितास शापवाणी कळाली. सात दिवसावर मृत्यू येऊन ठेपलेला. राजा परिक्षित घाबरला होता. राजा परिक्षितीस वैराग्य प्राप्त झाले. मुलाच्या स्वाधीन राज्य कारभार सोपवला.त्याच सुमारास, शुकदेव स्वामींनी आपल्या वडिलांच्या मुखाने नुकतीच भागवत कथा ऐकली होती. कथा श्रवणाने त्यांची चित्तवृत्ती प्रफुल्लीत झाली होती. श्रवणातून आपण जो आनंद घेतला आहे, तो कोणाला तरी भागवत कथा सांगून द्यावा, असे त्यांना वाटत होते. शुकदेव हे भेटेल त्याला विचारता आहे की, ‘मी जो भागवत श्रवणाचा आनंद घेतला आहे, तो कोणी घेणारा आहे का ? मी भगवंताच्या लिला सांगण्यास तयार आहे, ऐकणारा कोणी आहे का ?’शुकदेव स्वामी भागवत कथा सांगणेस उत्सुक होते, अन् राजा परिक्षिती शाप मिळाल्यामुळे उद्धारासाठी तळमळत होता. दोघांची गंगा घाटावर एक वडाच्या झाडाखाली भेट झाली, तो दिवस होता भाद्रपद शु.नवमी.शुकदेव स्वामींनी राजा परिक्षिता यास धैर्य दिले अन सांगितले की, ‘राजा घाबरू नको मृत्युला. तू भाग्यवान आहेस की, तुला सात दिवस आधी तुझा मृत्यु कळला. अनेक जीव असे आहेत की, ज्यांना पुढचा क्षण सुद्धा आपला आहे किंवा नाही हे माहित नाही.सात दिवसाच तुझं आयुष्य म्हणजे खूप मोठा कालावधी आपल्या हातात आहे. या सात दिवसात तुला भागवत कथा सांगतो. मृत्यूचे भय चित्तातून जाईल. तुला शांती मिळेल. शुकदेव स्वामींनी राजा परिक्षिता यास भाद्रपद शु.नवमी ते पौर्णिमा ( ८ सप्टेंबर २०१९ ते १४ सप्टेंबर २०१९) या कालावधीत भागवत कथा सांगितली. या कथा श्रवणाने भगवंताचे नाम चित्तात प्रतिष्ठित (स्थापित) होते म्हणून या भागवत कथा सप्ताहास प्रौष्ठपदी भागवत सप्ताह असे म्हणतात.- राया उपासनी, निजामपूरकर

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव