शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

भारताचे संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 01:43 IST

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह यांनी बांगला देशात भेट दिली. या भेटीवर आधारित प्रवास वर्णनात्मक लेखमाला ते ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत. आज त्यांच्या लेखमालेचा अकरावा भाग.

इंटरनेटवर ढाक्का सुरक्षित नाही, अशी बरीच भीतीदायक माहिती दिसते. परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती तितकी वाईट नाही. जागोजागी वायरलेससह पोलीस आहेत. कदाचित मी नशीबवान असेल, पण मला वाईट अनुभव आला नाही. आता पूर्वी इतके धोके नाहीत. असे स्थानिक लोकही सांगतात.बांगला देश भेटी दरम्यान ढाक्क्यात रोटरीचे एक सभासद तारेक अफजल यांना मी भेटलो. ते रोटरी क्लब नारायणगंज या ६५ वर्षे जुन्या क्लबचे सभासद आहेत. त्यांचे वडील पै.अफझल हुसेन खासदार होते. अत्यंत प्रभावी पण साधा माणूस. आता ते हयात नाहीत. आग्रहाने त्यांनी निदान ‘चॉ, कोफी’ तरी घ्या म्हणून नारायणगंजला घरी नेले. आजही त्यांचे घर एकदम साधेच आहे. (आपल्याकडे एकदा खासदार झाला की, पहिला फरक त्यांच्या घरादारात आणि जमीन जुमल्यात पडतो. लाचखोर देशांच्या यादीतील बांगलादेशचे स्थान पाहता या बाबतीत हे कुटुंब मला मागासलेले वाटले!)त्यांच्या घरात मुजीबुर रहेमान यांचा ७ मार्च १९७१ चे ऐतिहासिक संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीच्या भाषणाचा फोटो आणि ले. जन. कै. जगजीतसिंग अरोरा यांचा बांगला देशातील लोकांनी ठिकठिकाणी सत्कार केला त्याचे फोटो, बरोबरीने लावलेले होते. ते पाहून माझे मन आनंदाने आणि अभिमानाने भरून गेले.ढाक्क्यात जेथे ले. जन. ए. के. नियाझी यांनी लेफ्टनंट जनरल जग्गीह्वसिंग यांच्यासमोर ९० हजार सैनिकांसह बिनशर्त शरणागती पत्करली तेथे एक मोठे स्वातंत्र्यस्मारक ‘स्वाधीनता स्तंभ’ (बं. उ. ‘शोधीनता स्तोम्भ’) उभारले आहे. यावरून आणि सामन्यत: सर्वच लोकांशी बोलताना भारताविषयी तेथे आत्मीयतेचीच भावना आहे हे जाणवले.तेथील कितीतरी लोक शिक्षण आणि औषधोपचारासाठी भारतात येतात. मला भेटलेल्या लोकांपैकी एकाचे पूर्ण शिक्षणच भारतात झाले होते आणि याचा त्यांना अभिमान होता.गेल्या काही वर्षांपासून बांगला देश काही सामाजिक निर्देशांकाच्या बाबतीत भारतापुढे निघून गेला आहे. उदा. नवजात मृत्यूदर, स्री-पुरुष समानता आणि सरासरी आयुर्मान इ. २०१३ ते २०१६ दरम्यान भारताची जीडीपी वाढ ५.६ टक्के होती तर बांगला देशाची १२.९ टक्के होती. २०१८ मध्ये ७.२८ टक्क्यांची वाढ होती. त्यांचा तयार कपड्यांचा वार्षिक व्यापार आहे २८ बिलियन डॉलर म्हणजे २२९६ अब्ज रुपये आणि तो गतीने वाढत आहे. याचे कारण असे सांगतात की, चीनने आपले लक्ष कपड्यांवरून अधिक नफा देणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांवर केंद्रित करायला सुरुवात केली, त्याचा फायदा बांगला देशाला झाला. चीनमध्ये तयार कपड्यांची किंमत एक टक्का वाढली तर बांगला देशच्या उत्पादनांची मागणी दीड टक्का वाढते. अर्थतज्ज्ञांच्या मते एकूणच कोणत्याही कारणाने असली तरी, ही गती अशीच राहिली तर बांगला देशाच्या आर्थिक वाढीचा दर सन २०२० मध्ये भारताला मागे टाकून पुढे निघून जाण्याची शक्यता दाट आहे. (क्रमश:)-सी.ए.अनिलकुमार शाह, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव