शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भारताचे संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 01:43 IST

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह यांनी बांगला देशात भेट दिली. या भेटीवर आधारित प्रवास वर्णनात्मक लेखमाला ते ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत. आज त्यांच्या लेखमालेचा अकरावा भाग.

इंटरनेटवर ढाक्का सुरक्षित नाही, अशी बरीच भीतीदायक माहिती दिसते. परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती तितकी वाईट नाही. जागोजागी वायरलेससह पोलीस आहेत. कदाचित मी नशीबवान असेल, पण मला वाईट अनुभव आला नाही. आता पूर्वी इतके धोके नाहीत. असे स्थानिक लोकही सांगतात.बांगला देश भेटी दरम्यान ढाक्क्यात रोटरीचे एक सभासद तारेक अफजल यांना मी भेटलो. ते रोटरी क्लब नारायणगंज या ६५ वर्षे जुन्या क्लबचे सभासद आहेत. त्यांचे वडील पै.अफझल हुसेन खासदार होते. अत्यंत प्रभावी पण साधा माणूस. आता ते हयात नाहीत. आग्रहाने त्यांनी निदान ‘चॉ, कोफी’ तरी घ्या म्हणून नारायणगंजला घरी नेले. आजही त्यांचे घर एकदम साधेच आहे. (आपल्याकडे एकदा खासदार झाला की, पहिला फरक त्यांच्या घरादारात आणि जमीन जुमल्यात पडतो. लाचखोर देशांच्या यादीतील बांगलादेशचे स्थान पाहता या बाबतीत हे कुटुंब मला मागासलेले वाटले!)त्यांच्या घरात मुजीबुर रहेमान यांचा ७ मार्च १९७१ चे ऐतिहासिक संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीच्या भाषणाचा फोटो आणि ले. जन. कै. जगजीतसिंग अरोरा यांचा बांगला देशातील लोकांनी ठिकठिकाणी सत्कार केला त्याचे फोटो, बरोबरीने लावलेले होते. ते पाहून माझे मन आनंदाने आणि अभिमानाने भरून गेले.ढाक्क्यात जेथे ले. जन. ए. के. नियाझी यांनी लेफ्टनंट जनरल जग्गीह्वसिंग यांच्यासमोर ९० हजार सैनिकांसह बिनशर्त शरणागती पत्करली तेथे एक मोठे स्वातंत्र्यस्मारक ‘स्वाधीनता स्तंभ’ (बं. उ. ‘शोधीनता स्तोम्भ’) उभारले आहे. यावरून आणि सामन्यत: सर्वच लोकांशी बोलताना भारताविषयी तेथे आत्मीयतेचीच भावना आहे हे जाणवले.तेथील कितीतरी लोक शिक्षण आणि औषधोपचारासाठी भारतात येतात. मला भेटलेल्या लोकांपैकी एकाचे पूर्ण शिक्षणच भारतात झाले होते आणि याचा त्यांना अभिमान होता.गेल्या काही वर्षांपासून बांगला देश काही सामाजिक निर्देशांकाच्या बाबतीत भारतापुढे निघून गेला आहे. उदा. नवजात मृत्यूदर, स्री-पुरुष समानता आणि सरासरी आयुर्मान इ. २०१३ ते २०१६ दरम्यान भारताची जीडीपी वाढ ५.६ टक्के होती तर बांगला देशाची १२.९ टक्के होती. २०१८ मध्ये ७.२८ टक्क्यांची वाढ होती. त्यांचा तयार कपड्यांचा वार्षिक व्यापार आहे २८ बिलियन डॉलर म्हणजे २२९६ अब्ज रुपये आणि तो गतीने वाढत आहे. याचे कारण असे सांगतात की, चीनने आपले लक्ष कपड्यांवरून अधिक नफा देणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांवर केंद्रित करायला सुरुवात केली, त्याचा फायदा बांगला देशाला झाला. चीनमध्ये तयार कपड्यांची किंमत एक टक्का वाढली तर बांगला देशच्या उत्पादनांची मागणी दीड टक्का वाढते. अर्थतज्ज्ञांच्या मते एकूणच कोणत्याही कारणाने असली तरी, ही गती अशीच राहिली तर बांगला देशाच्या आर्थिक वाढीचा दर सन २०२० मध्ये भारताला मागे टाकून पुढे निघून जाण्याची शक्यता दाट आहे. (क्रमश:)-सी.ए.अनिलकुमार शाह, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव