शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भरड धान्य विक्रीसाठी जिल्ह्यातील १७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST

धान्य - नोंदणी झालेले शेतकरी ज्वारी - १० हजार ६७९ मका - ६ हजार ५७४ गहू - ७६ जिल्ह्यातील ...

धान्य - नोंदणी झालेले शेतकरी

ज्वारी - १० हजार ६७९

मका - ६ हजार ५७४

गहू - ७६

जिल्ह्यातील एकूण खरेदी केंद्र - १७

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा मार्केटिंगकडून खरेदी होणाऱ्या भरड धान्यांसाठी जिल्हाभरातून एकूण १७ हजार ३२९ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. शहरातील १७ केंद्रांवर ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करायची होती. ऑनलाइन नोंदणीची मुदत संपली असून, अजूनही शासनाने भरड धान्य खरेदीबाबत कोणतेही आदेश काढलेले नाहीत. आधीच शासनाने ही खरेदी महिनाभर अगोदरच करणे गरजेचे होते. मात्र अद्यापही शासनाने खरेदीला सुरुवात केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शासनाकडून अद्यापही धान्य खरेदीबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल किंवा फायदा होईल असा कोणताही निर्णय घेतला जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. रब्बी हंगाम काढून दोन महिने उलटले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या घरात धान्य पडून आहे.

नोंदणी केल्यावर ही शासन माल खरेदी करेल याची शाश्वती नाही.

भरड धान्य अंतर्गत येणाऱ्या गहू, ज्वारी व मका या धान्याची खरेदी जिल्हा मार्केटिंगतर्फे होणार आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण १७ केंद्रे मंजूर आहे. शासनाच्या आदेशानंतरच शासकीय खरेदीला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांचा माल शासन खरेदी करेल याबाबतची ही शाश्वती शासनाकडून देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक नोंदणी केंद्रांवर राज्य शासनाकडून पत्रक लावण्यात आले असून या पत्रकात ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करणे हे शासनाला बंधनकारक नसल्याचे सांगितले गेले आहे. यामुळे जरी १७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असली तरी शेतकऱ्यांचा मालाची खरेदी होईलच याबाबत अजूनही शासनाने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

निम्मे शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडे विकला माल

जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न पाहता, आपला माल खासगी व्यापाऱ्यांकडे विकलेला आहे. शासकीय खरेदी केंद्रांवर जिल्हाभरात गव्हाच्या विक्रीसाठी केवळ ७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. म्हणजेच जिल्ह्यातील ९९ टक्के गहू उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीची वाट न पाहता मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना आपला माल विक्री केला आहे.

कोट..

शासकीय खरेदी केंद्र हे महिनाभर आधीच सुरू होणे गरजेचे होते. आता शेतकऱ्यांकडे मालच शिल्लक नाही. शासकीय खरेदी केंद्र सुरू करूनही शेतकऱ्यांचा कोणताही फायदा त्यामध्ये होणार नाही. तसेच शासनाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करणेदेखील बंधनकारक नसल्याचे सांगितले नाही. शासनाने शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूकच केलेली आहे.

- किशोर चौधरी, प्रगतिशील शेतकरी, असोदा