शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
4
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
5
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
6
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
7
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
8
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
9
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
10
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
11
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
12
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
13
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
14
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
16
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
17
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
18
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
19
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
20
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?

भरड धान्य विक्रीसाठी जिल्ह्यातील १७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST

धान्य - नोंदणी झालेले शेतकरी ज्वारी - १० हजार ६७९ मका - ६ हजार ५७४ गहू - ७६ जिल्ह्यातील ...

धान्य - नोंदणी झालेले शेतकरी

ज्वारी - १० हजार ६७९

मका - ६ हजार ५७४

गहू - ७६

जिल्ह्यातील एकूण खरेदी केंद्र - १७

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा मार्केटिंगकडून खरेदी होणाऱ्या भरड धान्यांसाठी जिल्हाभरातून एकूण १७ हजार ३२९ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. शहरातील १७ केंद्रांवर ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करायची होती. ऑनलाइन नोंदणीची मुदत संपली असून, अजूनही शासनाने भरड धान्य खरेदीबाबत कोणतेही आदेश काढलेले नाहीत. आधीच शासनाने ही खरेदी महिनाभर अगोदरच करणे गरजेचे होते. मात्र अद्यापही शासनाने खरेदीला सुरुवात केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शासनाकडून अद्यापही धान्य खरेदीबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल किंवा फायदा होईल असा कोणताही निर्णय घेतला जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. रब्बी हंगाम काढून दोन महिने उलटले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या घरात धान्य पडून आहे.

नोंदणी केल्यावर ही शासन माल खरेदी करेल याची शाश्वती नाही.

भरड धान्य अंतर्गत येणाऱ्या गहू, ज्वारी व मका या धान्याची खरेदी जिल्हा मार्केटिंगतर्फे होणार आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण १७ केंद्रे मंजूर आहे. शासनाच्या आदेशानंतरच शासकीय खरेदीला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांचा माल शासन खरेदी करेल याबाबतची ही शाश्वती शासनाकडून देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक नोंदणी केंद्रांवर राज्य शासनाकडून पत्रक लावण्यात आले असून या पत्रकात ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करणे हे शासनाला बंधनकारक नसल्याचे सांगितले गेले आहे. यामुळे जरी १७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असली तरी शेतकऱ्यांचा मालाची खरेदी होईलच याबाबत अजूनही शासनाने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

निम्मे शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडे विकला माल

जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न पाहता, आपला माल खासगी व्यापाऱ्यांकडे विकलेला आहे. शासकीय खरेदी केंद्रांवर जिल्हाभरात गव्हाच्या विक्रीसाठी केवळ ७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. म्हणजेच जिल्ह्यातील ९९ टक्के गहू उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीची वाट न पाहता मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना आपला माल विक्री केला आहे.

कोट..

शासकीय खरेदी केंद्र हे महिनाभर आधीच सुरू होणे गरजेचे होते. आता शेतकऱ्यांकडे मालच शिल्लक नाही. शासकीय खरेदी केंद्र सुरू करूनही शेतकऱ्यांचा कोणताही फायदा त्यामध्ये होणार नाही. तसेच शासनाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करणेदेखील बंधनकारक नसल्याचे सांगितले नाही. शासनाने शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूकच केलेली आहे.

- किशोर चौधरी, प्रगतिशील शेतकरी, असोदा