शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मना घडवी संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 17:06 IST

संस्कार माणसासाठी किती महत्त्वाचे असतात हे वेळोवेळी विविध उदाहरणांनी स्पष्ट होत असते. याविषयी ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘मनमोकळं’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील साहित्य आणि संगीतप्रेमी विशाखा देशमुख...

मध्यंतरी सविताच्या घरी निमंत्रण द्यायला गेले होते़ ती कॉलेजला प्राध्यापिका असल्याने मुद्दाम तिची सुटी पाहूून गेले़ खूप दिवसांनी भेट झाल्याने दोघींना खूप आनंद झाला़थोड्या गप्पा झाल्यावर ती म्हणाली, चल मस्त कांदा भजी करते़ बोलतच आम्ही स्वयंपाक घरात गेलो़ रोज घड्याळाच्या काट्याप्रमाणे कामे उरकावी लागतात़ सकाळी लवकर उठून यांचा, मुलीचा, माझा टिफीन भरुन साडेदहाला कॉलेजला पोहोचावं लागतं़ बरं झालं. आज तू आलीस़ तुझ्याशी बोलल्याने बघ कसं फ्रेश वाटतं़ एकीकडे तिने कढईत तेल तापवायला ठेवून पीठ भिजवलं. कांदा, मिरची कापून भजी तळायला घेतली़ तोवर तिची मुलगी मनीषा आली़ मला बघून मावशी किती दिवसांनी आलीस गं़ वरदा काय म्हणते, विचारत भजी तोंडात टाकून मॉम मस्त झाली गं भजी सांगितलं़मनीषाने माझी आल्या आल्या दखल घेतल्याने मला आनंद झाला होता़ पण तिने हातपाय न धुता स्वयंपाकाच्या ओट्याजवळ जाणं मला अजिबात आवडलं नाही़ सविताने दोन ते तीन वेळा म्हटल्यावर मनीषाने हातपाय धुतले व भजीची प्लेट घेऊन सोफ्यावर जावून बसली़ सोबतीला मोबाइल होताच़ मग पाणी पिण्यासाठी तिने फ्रिज उघडला तर नेलपेंटच्या खूप बाटल्या पाहून मी न राहवून विचारलं, एवढ्या बाटल्या? त्यावर सविता म्हणाली, ‘अग आजकाल लग्नात कार्यक्रमासाठी नवीन ड्रेस, त्यावर मॅचिंग नेलपेंट, चपला असं लागतं मुलींना. आणि विशाखा आपल्याला नाही मिळालं गं हे असं़ पण मुलांच्या नशिबानं त्यांना मिळतंय आणि आम्ही दोघंही नोकरी करतोय़ शेवटी सगळं तिचंच तर आहे़ सगळं सगळं खरं होतं़ मलाही एकच मुलगी असल्याने मीही फारसं काही वेगळं करत नव्हते़ पण खर्चावर मर्यादा ठेवून दरवर्षी नवीन दप्तर, वह्या, पुस्तक, शाळेचा ड्रेस, शाळेची भरपूर फी भरत असले तरी प्रत्येक वेळी मुलीला जाणीव करून देत होते़ हे सगळं मिळायला पैसा लागतो आणि तो मिळविणयासाठी कष्ट लागतात़सविताकडून घरी आले. पण विचारचक्र सुरुच होतं. काळ खूप बदलला आहे़ आताच्या मुलांना बोलून फारसा फरक पडणार नव्हता़ त्यांची चूक नव्हतीच़ आमच्या वेळी आम्ही मोठ्या भावंडांची पुस्तके, वह्या, ड्रेस वापरत होतो़ शाळेत पायीच जायचो किंवा टिफीनमध्ये लोणचं, चटणी, पोळी असायची, असं सांगून काही उपयोग नव्हता़ आताच्या मुलांच्या हातात तळव्यात मावणाऱ्या भारी मोबाइलची श्रीमंती होती़ पालकांनी मुलांचे ‘लाड’ जरुर करावेत. पण प्रत्येक वेळी मागितलेली वस्तू त्यांना दिली पाहिजे, असं बंधन नसावं. मात्र बाहेरून आल्यावर हातपाय धुणे, घरी आलेल्या मोठ्या व्यक्तींना नमस्कार करणे़ संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून शुभंकरोती म्हणणे असे संस्कार तर आपण नक्कीच करू शकतो़-विशाखा विलास देशमुख, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव