शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मना घडवी संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 17:06 IST

संस्कार माणसासाठी किती महत्त्वाचे असतात हे वेळोवेळी विविध उदाहरणांनी स्पष्ट होत असते. याविषयी ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘मनमोकळं’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील साहित्य आणि संगीतप्रेमी विशाखा देशमुख...

मध्यंतरी सविताच्या घरी निमंत्रण द्यायला गेले होते़ ती कॉलेजला प्राध्यापिका असल्याने मुद्दाम तिची सुटी पाहूून गेले़ खूप दिवसांनी भेट झाल्याने दोघींना खूप आनंद झाला़थोड्या गप्पा झाल्यावर ती म्हणाली, चल मस्त कांदा भजी करते़ बोलतच आम्ही स्वयंपाक घरात गेलो़ रोज घड्याळाच्या काट्याप्रमाणे कामे उरकावी लागतात़ सकाळी लवकर उठून यांचा, मुलीचा, माझा टिफीन भरुन साडेदहाला कॉलेजला पोहोचावं लागतं़ बरं झालं. आज तू आलीस़ तुझ्याशी बोलल्याने बघ कसं फ्रेश वाटतं़ एकीकडे तिने कढईत तेल तापवायला ठेवून पीठ भिजवलं. कांदा, मिरची कापून भजी तळायला घेतली़ तोवर तिची मुलगी मनीषा आली़ मला बघून मावशी किती दिवसांनी आलीस गं़ वरदा काय म्हणते, विचारत भजी तोंडात टाकून मॉम मस्त झाली गं भजी सांगितलं़मनीषाने माझी आल्या आल्या दखल घेतल्याने मला आनंद झाला होता़ पण तिने हातपाय न धुता स्वयंपाकाच्या ओट्याजवळ जाणं मला अजिबात आवडलं नाही़ सविताने दोन ते तीन वेळा म्हटल्यावर मनीषाने हातपाय धुतले व भजीची प्लेट घेऊन सोफ्यावर जावून बसली़ सोबतीला मोबाइल होताच़ मग पाणी पिण्यासाठी तिने फ्रिज उघडला तर नेलपेंटच्या खूप बाटल्या पाहून मी न राहवून विचारलं, एवढ्या बाटल्या? त्यावर सविता म्हणाली, ‘अग आजकाल लग्नात कार्यक्रमासाठी नवीन ड्रेस, त्यावर मॅचिंग नेलपेंट, चपला असं लागतं मुलींना. आणि विशाखा आपल्याला नाही मिळालं गं हे असं़ पण मुलांच्या नशिबानं त्यांना मिळतंय आणि आम्ही दोघंही नोकरी करतोय़ शेवटी सगळं तिचंच तर आहे़ सगळं सगळं खरं होतं़ मलाही एकच मुलगी असल्याने मीही फारसं काही वेगळं करत नव्हते़ पण खर्चावर मर्यादा ठेवून दरवर्षी नवीन दप्तर, वह्या, पुस्तक, शाळेचा ड्रेस, शाळेची भरपूर फी भरत असले तरी प्रत्येक वेळी मुलीला जाणीव करून देत होते़ हे सगळं मिळायला पैसा लागतो आणि तो मिळविणयासाठी कष्ट लागतात़सविताकडून घरी आले. पण विचारचक्र सुरुच होतं. काळ खूप बदलला आहे़ आताच्या मुलांना बोलून फारसा फरक पडणार नव्हता़ त्यांची चूक नव्हतीच़ आमच्या वेळी आम्ही मोठ्या भावंडांची पुस्तके, वह्या, ड्रेस वापरत होतो़ शाळेत पायीच जायचो किंवा टिफीनमध्ये लोणचं, चटणी, पोळी असायची, असं सांगून काही उपयोग नव्हता़ आताच्या मुलांच्या हातात तळव्यात मावणाऱ्या भारी मोबाइलची श्रीमंती होती़ पालकांनी मुलांचे ‘लाड’ जरुर करावेत. पण प्रत्येक वेळी मागितलेली वस्तू त्यांना दिली पाहिजे, असं बंधन नसावं. मात्र बाहेरून आल्यावर हातपाय धुणे, घरी आलेल्या मोठ्या व्यक्तींना नमस्कार करणे़ संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून शुभंकरोती म्हणणे असे संस्कार तर आपण नक्कीच करू शकतो़-विशाखा विलास देशमुख, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव