शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

खुलासा सादर करण्यास मन्साई कंपनीकडून टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:12 IST

मनपाकडून दुसऱ्यांदा पाठविण्यात आली नोटीस : जैविक कचरा संकलन फसवणूक प्रकरण; महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडूनही मागितला खुलासा लोकमत न्यूज नेटवर्क ...

मनपाकडून दुसऱ्यांदा पाठविण्यात आली नोटीस : जैविक कचरा संकलन फसवणूक प्रकरण; महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडूनही मागितला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांमधून जमा होणाऱ्या जैविक कचऱ्याच्या संकलनात गैरव्यवहार केल्याच्या तक्रारीवरून मनपाने संबंधित मन्साई कंपनीला मनपाने सात दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पंधरा दिवस होऊनदेखील संबंधित कंपनीने मनपाकडे खुलासा दिला नसून, कंपनीकडून खुलासा सादर करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. खुलासा मिळत नसल्याने त्याचा परिणाम चौकशीवर होत असल्याची माहिती सहायक आयुक्त पवन पाटील यांनी दिली आहे.

शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांमधून जैविक कचरा संकलनाचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून शहरातील मन्साई बायोमेडिकल वेस्ट ही कंपनी करीत आहे. मात्र, या कंपनीकडून जैविक कचरा संकलनामध्ये मनपाने घालून दिलेल्या अटी शर्तींचा भंग करून, महापालिकेची फसवणूक केल्याची तक्रार मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार मनपा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक चौकशीत ही तक्रार योग्य असल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाने मन्साई बायोमेडिकल वेस्ट कंपनीला २१ मे रोजी नोटीस बजावून मनपाकडे अनेक महिन्यांपासून रॉयल्टी जमा केली नाही याबाबतचा खुलासा सादर करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले होते. मात्र, संबंधित कंपनीने याबाबत कोणताही खुलासा मनपाकडे सादर केलेला नाही. २८ मे रोजी संबंधित कंपनीने मनपाला पत्र पाठवून खुलासा सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, मनपाने ही मुदत नाकारत, आता ४ जूनपर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश मनपाने दिले आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडूनही उत्तर नाही

मन्साई बायोमेडिकल वेस्ट कंपनीला २० वर्षांसाठी जैविक कचरा संकलन करण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. जैविक कचरा व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने संबंधित कंपनीला जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार ठेकेदाराने रुग्णालयांमधून जमा होणाऱ्या कचऱ्याच्या तुलनेत २० टक्के रॉयल्टीची रक्कम मनपाला द्यावी लागते. मात्र, संबंधित ठेकेदाराने चोपडा व भुसावळ तालुक्यातील रुग्णालयांमधून जमा होणाऱ्या जैविक कचराबाबत व या रुग्णालयाची माहितीदेखील महापालिकेला दिली नाही. त्यामुळेच मनपाने या कंपनीला खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे या कंपनीने किती रुग्णालयांची नोंद केली आहे. याबाबतदेखील मनपा प्रशासनाने महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाकडे माहिती मागविली होती. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळानेदेखील मनपाला याबाबतची अद्यापही माहिती दिली नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कचऱ्यातून कमाई सुरूच?

शहरातील दैनंदिन साफसफाईच्या मुद्द्यावरून वॉटर ग्रेस कंपनीबाबत तक्रारी कायम असताना, आता जैविक कचरा संकलनाबाबतदेखील तक्रारी वाढल्यामुळे कचऱ्यातून पैसे कमाविण्याचा नवीन फंडा सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मनपा प्रशासनाकडून याबाबत चौकशी सुरू केली असली, तरी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाही संबंधित कंपनीवर झालेली नाही. तसेच खुलासा सादर करण्यात टाळाटाळ होत असल्याने हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.