शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाचोऱ्यात लालपरी रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 15:22 IST

एसटीचे उत्पन्नात दिवसागणिक सुधारणा होत आहे.

ठळक मुद्देएसटीची वाहतूक पूर्ववतपुणे, बोरिवली, सुरत, कल्याण या गाड्यांना चांगला प्रतिसाद

श्यामकांत सराफपाचोरा : गेल्या सात महिन्यात कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाउन झाल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद होऊन एसटीचे जीवन विस्कळीत झाले होते. मात्र गेल्या दोन महिन्यापासून एसटीची वाहतूक हळूहळू सुरू होऊन आजच्या स्थितीत पाचोरा आगारातून प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. लालपरी रुळावर आली असून, लांब पल्ल्याच्या गाड्या प्रवाशांच्या चांगल्या प्रतिसादाने सुरू झाल्या आहेत. यामुळे एसटीचे उत्पन्नात दिवसागणिक सुधारणा होत आहे.पाचोरा आगारात ४४ प्रवासी गाड्या सुस्थितीत असून, ५ मालवाहतूक गाड्या तैनात आहेत. आगारातून दररोज १५२ फेऱ्या साधारण १६ हजार ३९२ किलोमीटरचा प्रवास करून दैनंदिन उत्पन्न सरासरी ३ लाख ३० हजारापर्यंत मिळविण्यात आगाराला यश आले आहे. आगाराचे दैनंदिन सरासरी उत्पन्नात सद्य:स्थितीत ३० टक्के घट असली तरी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करून उत्पन्नात वाढ करण्यात येत आहे.आगाराचे मासिक उत्पन्न सरासरी दीड कोटीचे आहे, मात्र कोरोणानंतर अनलॉक कालावधीत सप्टेंबर ३३ लाख, ऑक्टोबरमध्ये ६० लाखापर्यंत मासिक उत्पन्न आले, तर नोव्हेंबरमध्येही स्थिती चांगल्याप्रकारे सुधारत असल्याचे आगार व्यवस्थापक देवेंद्र वाणी यांनी सांगितले.आगारास मालवाहतुकीतून दरमहा सुमारे पाच लाखाचे उत्पन्न मिळते. आगाराला ४८ शेड्युल मंजूर असून सध्या ४४ शेडूल सुरू आहेत. पाचोरा आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्यांना चांगला प्रतिसाद आहे. पाचोरा -पुणे ४ फेऱ्या यात सकाळी ७ वाजता भडगाव नगर मार्गे पुणे, ७.३० घाटनांद्रा औरंगाबाद मार्गे पुणे, ८.३० वाजता भडगाव मालेगाव मार्गे पुणे, तर ९ वाजता भडगाव संगमनेर मागे पुणे, अशा फेऱ्या सुरू करण्यात आले आहेत, तर पाचोरा- कल्याणच्या २ फेऱ्या सकाळी ८ व ९ वाजता नियमित सुरू झाल्या आहेत. पाचोरा-सुरत ह्यादेखील २ फेऱ्या सकाळी ८ व ११ वाजता सुरू केल्या आहेत. असून पाचोरा -बोरीवली सकाळी ६.३० पाचोरा-नंदुरबार सकाळी ७, पाचोरा-औरंगाबाद ८.३० अशा असून पाचोरा-मालेगाव ९ फेऱ्या आहेत. पाचोरा-नाशिक दुपारी १२.३० असल्याने प्रवाशांना रेल्वेची वाट पाहण्याची गरज नाही. यामुळे व्यवस्थापकांनी जादा गाड्यांचीसुद्धा व्यवस्था केली आहे.बसस्थानकाचे नूतनीकरणही केले आहे. मात्र या ठिकाणी अद्याप काही काम अपूर्ण अवस्थेत असून आगार यार्डात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. बसस्थानकाच्या आवारात घाणीचे साम्राज्य असल्याने स्वच्छतेकडे लक्ष देऊन आगाराच्या मोकळ्या मैदानात वृक्षारोपण, बगीच्या फुलवावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात अद्यापही एसटीची वाहतूक सुरळीत झाली नसून प्रवाशांचा ओघ कमी आहे यामुळे ्रामीण भागात फेर्‍या वाढविण्यास अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांनी एसटीतून प्रवास करावा व एसटीची मागणी केल्यास फेऱ्या वाढविण्यात येतील, अशी माहिती स्थानकप्रमुख तिवारी यांनी दिली.

टॅग्स :GovernmentसरकारPachoraपाचोरा