जळगाव : जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या २३६ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. ५ मे पासून उमेदवारांकडून ऑन लाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.राज्याच्या गृहविभागातर्फे राज्यभरात पोलीस भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील रिक्त असलेल्या २३६ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात सर्वसाधारण, महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, माजी सैनिक, अशंता पदवीधर व गृहरक्षकदलातील जवानांसाठी जातीनिहाय जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून ५ मे रोजी सकाळी दहा वाजेपासून ऑन लाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. २५ मे पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. २६ रोजी बँकेत पैसे भरता येणार आहे. भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना शारीरिक व शैक्षणिक पात्रता ठरवून देण्यात आली आहे. उमेदवारांकडे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी जळगाव पोलीस दलाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे.पोलीस दलातील ११ कर्मचारी झाले फौजदारजळगाव-जिल्हा पोलीस दलात विविध ठिकाणी नियुक्तीला असलेले ११ पोलीस कर्मचार्यांना फौजदारपदी बढती देण्यात आली आहे. या आशयाचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने शनिवारी काढले आहेत. बढती मिळालेल्या कर्मचार्यांमध्ये जिल्हा पोलीस दलातील संजय चिंधू पाटील, ईश्वर जगन्नाथ सोनवणे, कैलाससिंग अभिमन्यू पाटील, झावरू अवचित पाटील, दिलीप विठोबा पाटील, महादू सेना बैसाणे, सिद्धार्थ संपत खरे, युवराज शंकर अहिरे, नाना दौलत अहिरे, बारकू झिंगा जाने, काशीनाथ त्र्यंबक सुरळकर यांचा समावेश आहे. लवकरच या कर्मचार्यांना पोलीस स्टेशनच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे.
प्रादेश्किसाठी जिल्हा पोलीस दलात २३६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु : ऑन लाईन अर्ज मागविले
By admin | Updated: May 6, 2014 14:21 IST