शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

वसुलीची कारवाई शेतशिवारात धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 22:49 IST

कोळगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १२ गावांच्या शेतशिवारातील जवळजवळ १८ ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा बंद केला आहे.

ठळक मुद्देकोळगाव वीजउपकेंद्रातंर्गत शेती रोहित्र वीजपुरवठा तोडण्याचा सपाटा

लोकमत न्यूज नेटवर्क

खेडगाव, ता. भडगाव : शेतकऱ्यांकडे कृषिपंपांची असलेली थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने कोळगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १२ गावांच्या शेतशिवारातील जवळजवळ १८ ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा बंद केला आहे. यामुळे ऐन रब्बी हंगामात सिंचनाअभावी पीक व शेतकरी संकटात सापडला आहे.या आठवड्यात जुवार्डी, गुढे, आडळसे, पथराड, सावदे, कोळगाव, पिंप्रीहाट, शिंदी-पेंडगाव, खेडगाव, शिवणी व बात्सर या गावातील शेती ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने तोडला जात आहे. रविवारपर्यंत १८ ट्रान्सफाॅर्मर बंद करण्यात आले. यातील सावदे शिवारातील  दोन ट्रान्सफाॅर्मरवरील शेतकऱ्यांनी तीन टप्प्यात पैसे भरणे चालू केल्याने त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत जोडण्यात आल्याची माहिती महावितरण सूत्रांनी दिली.

महावितरणच्या या मोहिमेमुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. हा परिसर गिरणाकाठ व जामदा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात येतो. यंदा पावसाळादेखील चांगला झाल्याने रब्बीत सर्वत्र गहू, हरभरा, ज्वारी व मका हे पीक घेतले जात आहे. रब्बी-उन्हाळी असा हंगाम माध्यान्ह ते शेवटच्या टप्प्यात आहे. ऐन हातीतोंडी घास येण्याच्या स्थितीत वीजपुरवठा तोडण्यात आल्याने, शेतकरी सैरभैर झाला आहे. काही शेतकऱ्यांचा कापूस घरात आहे तर हंगाम शेतात उभा आहे. आजच वीजबिल थकबाकी भरण्याची आर्थिक स्थिती नाही. हंगाम निघेपर्यंत तरी यात मुभा मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी नवीन ऐजी पंप योजनेनुसार मागील काही वर्षांची थकीत बाकीवरील व्याज, दंड, आकार अशी सवलत देत कमी आकारणीचे वीजबिले आली आहेत. ही वीजबिले एकरकमी किंवा तीन टप्प्यांपर्यंत भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मार्चपर्यंत या वीजबिले भरावयाची आहेत. यानुसार एकेका रोहित्रावर काही वीजबिले भरली जावीत, असा आग्रह सुरू आहे. यामुळे रोहित्रावरचा वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांना पाच-सहा लाख ते एक-दीड लाखांपर्यतची वीजबिले एक-दीड लाख ते सत्तर-ऐंशी हजारांपर्यंत या योजनेत कमी होऊन आली आहेत. ती भरण्यासाठी ही मोहीम सुरू आहे.शेतकऱ्यांनी तीन अश्वशक्तीचा पंप असताना, महावितरणने अवाच्या सवा अशी व पाच हाॅर्सपाॅवरचे वीजबिल आकारुन मागील पाच-सहा वर्षाची बिले पाठविले आहेत. हा भुर्दंड शेतकऱ्यांना का? आम्ही जास्तीचे बिले का? भरायची? असा त्यांचा सवाल आहे. ही बिले कमी करून तीन अश्वशक्तीचीच बिले आम्हाला मिळावीत, तरच आम्ही वीज बिले भरू, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वीजबिल भरा, मगच कमी करून मिळेल 

 महावितरणचे अधिकारी आधी, वीजबिल भरा मग मागून वीज बिले कमी करून मिळतील, असे स्पष्टीकरण यावर देत आहे. वीज बिल थकबाकी भरण्याचे आवाहन करीत, वीजपुरवठादेखील तोडला जात आहे. आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे अन्यथा असंतोष निर्माण होत आहे.

शेतकऱ्यांकडील वीज तोडण्याची कारवाई 

जामनेर : जामनेर तालुक्यात ११ हजार  शेतकऱ्यांकडे सुमारे १६३ कोटीची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी शेतकऱ्यांकडील  वीजपुरवठा तोडण्यास ग्रामीण भागात सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी दिले जात असतांना कोणतीही पुर्वसुचना न देता विज पुरवठा खंडीत केला जात आहे.  मात्र कारवाई करताना विज वितरण कंपनीकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप होत आहे.जामनेर तालुक्यात ११ हजार ४०० शेतकऱ्यांकडे सुमारे १६३ कोटीची थकबाकी असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र बागडे यांनी दिली.कोरोना संकटामुळे विज बील माफी मिळेल अथवा त्यात सुट मिळेल या आशेवर असलेल्यांनी बिलाची रक्कमच भरली नाही. काही शेतकऱ्यांकडे १० वर्षापुर्वीची थकबाकी असल्याचे विज वितरण कंपनीतील अभियत्यांचे म्हणणे आहे. यामुळे थकबाकीदारांची संख्या व रक्कम वाढली आहे.पहुर, फत्तेपुर, नेरी, मालदाभाडी व जामनेर परिसरात विज पुरवठा तोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांकडे राजकीय नेत्यांकडे धाव घेत कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांकडे सुमारे १६३ कोटीची थकबाकी आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांकडे संख्या ११ हजार ४०० आहे. थकबाकी भरणे बाबत सहाय्यक अभियंत्यांनी ठिकठिकाणी बैठका घेवून माहीती दिली आहे. -शैलेंद्र बागडे, उपकार्यकारी अभियंता, जामनेर 

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगावJamnerजामनेरmahavitaranमहावितरण