शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

वसुलीची कारवाई शेतशिवारात धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 22:49 IST

कोळगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १२ गावांच्या शेतशिवारातील जवळजवळ १८ ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा बंद केला आहे.

ठळक मुद्देकोळगाव वीजउपकेंद्रातंर्गत शेती रोहित्र वीजपुरवठा तोडण्याचा सपाटा

लोकमत न्यूज नेटवर्क

खेडगाव, ता. भडगाव : शेतकऱ्यांकडे कृषिपंपांची असलेली थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने कोळगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १२ गावांच्या शेतशिवारातील जवळजवळ १८ ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा बंद केला आहे. यामुळे ऐन रब्बी हंगामात सिंचनाअभावी पीक व शेतकरी संकटात सापडला आहे.या आठवड्यात जुवार्डी, गुढे, आडळसे, पथराड, सावदे, कोळगाव, पिंप्रीहाट, शिंदी-पेंडगाव, खेडगाव, शिवणी व बात्सर या गावातील शेती ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने तोडला जात आहे. रविवारपर्यंत १८ ट्रान्सफाॅर्मर बंद करण्यात आले. यातील सावदे शिवारातील  दोन ट्रान्सफाॅर्मरवरील शेतकऱ्यांनी तीन टप्प्यात पैसे भरणे चालू केल्याने त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत जोडण्यात आल्याची माहिती महावितरण सूत्रांनी दिली.

महावितरणच्या या मोहिमेमुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. हा परिसर गिरणाकाठ व जामदा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात येतो. यंदा पावसाळादेखील चांगला झाल्याने रब्बीत सर्वत्र गहू, हरभरा, ज्वारी व मका हे पीक घेतले जात आहे. रब्बी-उन्हाळी असा हंगाम माध्यान्ह ते शेवटच्या टप्प्यात आहे. ऐन हातीतोंडी घास येण्याच्या स्थितीत वीजपुरवठा तोडण्यात आल्याने, शेतकरी सैरभैर झाला आहे. काही शेतकऱ्यांचा कापूस घरात आहे तर हंगाम शेतात उभा आहे. आजच वीजबिल थकबाकी भरण्याची आर्थिक स्थिती नाही. हंगाम निघेपर्यंत तरी यात मुभा मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी नवीन ऐजी पंप योजनेनुसार मागील काही वर्षांची थकीत बाकीवरील व्याज, दंड, आकार अशी सवलत देत कमी आकारणीचे वीजबिले आली आहेत. ही वीजबिले एकरकमी किंवा तीन टप्प्यांपर्यंत भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मार्चपर्यंत या वीजबिले भरावयाची आहेत. यानुसार एकेका रोहित्रावर काही वीजबिले भरली जावीत, असा आग्रह सुरू आहे. यामुळे रोहित्रावरचा वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांना पाच-सहा लाख ते एक-दीड लाखांपर्यतची वीजबिले एक-दीड लाख ते सत्तर-ऐंशी हजारांपर्यंत या योजनेत कमी होऊन आली आहेत. ती भरण्यासाठी ही मोहीम सुरू आहे.शेतकऱ्यांनी तीन अश्वशक्तीचा पंप असताना, महावितरणने अवाच्या सवा अशी व पाच हाॅर्सपाॅवरचे वीजबिल आकारुन मागील पाच-सहा वर्षाची बिले पाठविले आहेत. हा भुर्दंड शेतकऱ्यांना का? आम्ही जास्तीचे बिले का? भरायची? असा त्यांचा सवाल आहे. ही बिले कमी करून तीन अश्वशक्तीचीच बिले आम्हाला मिळावीत, तरच आम्ही वीज बिले भरू, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वीजबिल भरा, मगच कमी करून मिळेल 

 महावितरणचे अधिकारी आधी, वीजबिल भरा मग मागून वीज बिले कमी करून मिळतील, असे स्पष्टीकरण यावर देत आहे. वीज बिल थकबाकी भरण्याचे आवाहन करीत, वीजपुरवठादेखील तोडला जात आहे. आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे अन्यथा असंतोष निर्माण होत आहे.

शेतकऱ्यांकडील वीज तोडण्याची कारवाई 

जामनेर : जामनेर तालुक्यात ११ हजार  शेतकऱ्यांकडे सुमारे १६३ कोटीची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी शेतकऱ्यांकडील  वीजपुरवठा तोडण्यास ग्रामीण भागात सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी दिले जात असतांना कोणतीही पुर्वसुचना न देता विज पुरवठा खंडीत केला जात आहे.  मात्र कारवाई करताना विज वितरण कंपनीकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप होत आहे.जामनेर तालुक्यात ११ हजार ४०० शेतकऱ्यांकडे सुमारे १६३ कोटीची थकबाकी असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र बागडे यांनी दिली.कोरोना संकटामुळे विज बील माफी मिळेल अथवा त्यात सुट मिळेल या आशेवर असलेल्यांनी बिलाची रक्कमच भरली नाही. काही शेतकऱ्यांकडे १० वर्षापुर्वीची थकबाकी असल्याचे विज वितरण कंपनीतील अभियत्यांचे म्हणणे आहे. यामुळे थकबाकीदारांची संख्या व रक्कम वाढली आहे.पहुर, फत्तेपुर, नेरी, मालदाभाडी व जामनेर परिसरात विज पुरवठा तोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांकडे राजकीय नेत्यांकडे धाव घेत कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांकडे सुमारे १६३ कोटीची थकबाकी आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांकडे संख्या ११ हजार ४०० आहे. थकबाकी भरणे बाबत सहाय्यक अभियंत्यांनी ठिकठिकाणी बैठका घेवून माहीती दिली आहे. -शैलेंद्र बागडे, उपकार्यकारी अभियंता, जामनेर 

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगावJamnerजामनेरmahavitaranमहावितरण