शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अव्वाच्या सव्वा बिल आकारण्यार्‍या रुग्णालयांची मान्यता होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:14 IST

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गच्या पार्श्वभूमीवर बेड उपलब्ध होत नसल्याने तसेच औषधोपचारात ज्यादा पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी ...

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गच्या पार्श्वभूमीवर बेड उपलब्ध होत नसल्याने तसेच औषधोपचारात ज्यादा पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा बिल घेतल्यास त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान, या विषयी तक्रारी येत असून ऑडिट करण्यासाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे अधिकारात नसताना बाह्य रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिल्याने चार डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होत नाही तसेच अनेक ठिकाणी ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांची फिरफिर सुरू आहे. यात अनेक रुग्णालयांकडून याचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा बिल घेतले जाते. या प्रकाराला आळा बसावा म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे.

यामध्ये शासकीय दरानुसार रुग्णालयांनी बिले आकारावी, याविषयीचे फलक रूग्णालयात लावणे बंधनकारक असून ज्यादा बिल घेतल्यास रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिला आहे.

वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिक धास्तावले आहेत असे असले तरी काही त्रास होत असताना अनेक जण रुग्णालयात जात नाही. मात्र प्रकृती अधिकच खालावली गेल्यानंतर ते उपचारासाठी धाव घेतात. यात ग्रामीण भागातील रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने ते शहरातील खासगी रुग्णालयांकडे धाव घेतात. मात्र या ठिकाणी ज्यादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ज्यादा बिल आकारू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- जिल्ह्यातील एकूण रुग्णालय - १२३

- बिलांबाबत तक्रार असल्याने रक्कम परत केलेले रुग्णालय - २

दोन रुग्णालयांनी परत केली रक्कम

यावर्षी जादा बिलाबाबत तक्रारी येत आहे. याविषयी ऑडिट केले जाणार आहे. मात्र गेल्या वर्षी देखील अशाच तक्रारी आल्याने ऑडिट झाल्यानंतर जादा रक्कम घेतल्याचे आढळून आल्याने दोन रुग्णालयांना वाढीव रक्कम परत करावी लागली होती.

ऑडिटरची नियुक्ती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांकडून ज्यादा बिलाची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने या रूग्णालयांच्या ऑडिट साठी ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तक्रार आलेल्या रुग्णालयांचे ऑडिट होणार आहे.

लेखी तक्रार नाही

बेड न मिळणे, ऑक्सिजन न मिळणे या व इतर अडचणी येत असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची फिरफिर होते. या नंतर रुग्णालयात जागा मिळाली तर त्याठिकाणी लाखो रुपये बिल आकारले जाते, असे काही रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. मात्र याविषयी ते लेखी तक्रार करीत नाही.

कोट

शासकीय दरानुसार रुग्णालयांनी बिले आकारावे, यासंबंधी रूग्णालयात दर असलेले फलक लावावे, अतिरिक्त बिल आकारणार्‍या रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात येईल.

- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक