शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तिस-या पर्वात लागणार खरी कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:11 IST

रेड झोनमधून बाहेर पडण्याचे जळगाव, धुळ्यापुढे आव्हान, मजूर परतू लागल्याने नंदुरबारपुढे आॅरेंज झोन टिकविण्याची कसोटी, निर्बंध आणि शिथिलीकरणाच्या पेचात अडकले प्रशासन

मिलिंद कुलकर्णी

लॉकडाऊनचे तिसरे पर्व सुरु झाले. ४० दिवस घरात अडकून पडलेल्या नागरिकांना दिलासादायक बातमी सध्या तरी नाही. उलट प्रकोप वाढत चालला आहे. खान्देशचा विचार केला तर जळगाव आणि धुळे हे जिल्हे ‘रेड झोन’मध्ये समाविष्ट झाले आहेत. नंदुरबार सध्या आॅरेंज झोनमध्ये असला  तरी आता मध्य प्रदेश आणि गुजरातमधून स्थानिक रहिवासी परत येऊ लागल्याने या झोनचे अस्तित्व कसे राहते, हे बघायला हवे.खान्देशातील बाधित रुग्णांची संख्या शंभरीपर्यंत भिडली आहे. त्यापैकी १९ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मृत्यू दर अधिक असल्याची आरोग्य क्षेत्रातील मंडळींची तक्रार आहे. मुंबई, पुणे आणि मालेगाव येथून आलेल्या रहिवाशांमुळे खान्देशात कोरोनाची बाधा अधिक झाली.  २५ मार्चपासून लॉक डाऊन पाळले जात असताना जिल्हाबंदी कठोरपणे अंमलात आणली नाही. त्याचा फटका बसला. सामान्य आजाराच्या रुग्णांना तपासणारे दोन-तीन डॉक्टर बाधित झाले. मालेगावला बंदोबस्तासाठी गेलेले पोलीस कर्मचारी बाधित झाले. याचा अर्थ सरळ आहे, पुरेशी खबरदारी बाळगली गेली नाही. सुरक्षा उपकरणे दिली गेली नसावी किंवा असतील तर ती वापरली गेली नाहीत. बेपर्वाई जीवावर बेतू शकते, हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवे.लॉकडाऊनचे तिसरे पर्व नागरिकांच्या संयम आणि सहनशिलतेची कसोटी पाहणारे राहील. या काळात जो काळजी घेईल, तो कोरोनावर मात करेल. महागाईने कळस गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवू लागली आहे. दुकानात गेले आणि वस्तू मिळाली असे आता होत नाही. अमूक नाहीये, ते शिल्लक नाही, असा सार्वत्रिक अनुभव आहे. यातून त्रस्तता वाढेल. स्वस्त धान्य दुकानातून केशरी पत्रिकाधारकांना धान्य मिळत आहे. पण त्यासाठी आधार लिंक वगैरे विषय आहेत. दुकानात गेल्यावर नियम सांगितले जातात. तहसील कार्यालयात अपुºया मनुष्यबळामुळे दादपुकार घेतली जात नाही. हे आणखी वाढत जाईल.जिल्हा प्रशासनावरील कामाचा ताण आणखी वाढणार आहे. परराज्यातील मजुरांना परत पाठविण्याचा निर्णय झाल्यानंतर लगेच परवान्यासाठी गर्दी झाली. आरोग्य तपासणी करुन कुणालाही परत पाठवता येणार नाही किंवा जिल्ह्यात घेता येणार नाही. नियमित रुग्णांच्या तपासणीसोबत आता या मजुरांच्या, प्रवासी व्यक्तींच्या तपासणीचा ताण वाढणार आहे.अन्नधान्य, भोजन पाकिटे, मास्क, सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू पुरविण्यासाठी ४० दिवस स्वयंसेवी, सामाजिक संस्था अखंडपणे झटत आहेत. त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी आता समाज आणि प्रशासन अशा दोघांची आहे. अपेक्षा वाढणार आहे, त्यासोबत देणाºयाचे हात देखील वाढायला हवे. तरच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी तिसºयांदा वाढला. कोरोनाच्या दहशतीसोबत जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, महागाईचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मजुरांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आता विद्यार्थ्यांचा प्रश्न उरला.शैक्षणिक क्षेत्रासाठी काय तोडगा निघतोयाकडे समस्त विद्यार्थी आणि पालकवर्गाचे लक्ष लागले आहे. प्राथमिक विभागाचा प्रश्न नाही, पण माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन परीक्षांसंबंधी काय निर्णय होतो आणि त्याची अंमलबजावणी कशी होते, हे बघायला हवे. आॅनलाईन की आॅफलाईन हा प्रश्न जसा आहे, तसेच शारीरिक दूरत्व, यातायात सेवा हे सगळे सांभाळावे लागणार आहेच. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव