शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

खान्देशाच्या प्रश्नांना वाचा फोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:48 IST

महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे संचालक पुरुषोत्तम टावरी यांची माहिती

ठळक मुद्दे किरकोळ व्यापारात थेट विदेशी गंतवणुकीला विरोधजकातीसाठी जळगावातून लढा

जळगाव : पुरेशा साधनसामग्री, विविध सुविधा यांचा अभाव असल्याने व मनपा तसेच औद्योगिक विकास महामंडळ यांच्यातील टोलवा टोलव यामुळे जळगावसह खान्देशातील औद्योगिक विकास रखडला आहे. आतापर्यंत एलबीटी असो की जकात यासाठी ज्या प्रमाणे लढा देऊन ते प्रश्न मार्गी लावले त्याप्रमाणेच आताही खान्देशातील व्यापार, उद्योग क्षेत्रातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर लढा देणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे संचालक पुरुषोत्तम टावरी यांनी ‘लोकमत’ भेटीत दिली.या संघटनेच्या संचालकपदी पुरुषोत्तम टावरी यांची चौथ्यांदा निवड झाली असून या निवडीनंतर पहिल्यांदाच टावरी यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी टावरी यांनी संघटनेच्या कार्याविषयी तसेच खान्देशातील व्यापार, उद्योगातील विविध प्रश्नांवर सविस्तर माहिती दिली.जकातीसाठी जळगावातून लढाव्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणाºया जकात विरोधी आंदोलनास जळगावातून सुरुवात करीत २००५मध्ये सर्वप्रथम आंदोलन छेडले. त्यामुळे अहमदनगरलाही मोठा बंद झाला. यासह एलबीटीलाही विरोध करीत जकात व एलबीटी हद्दपार करण्यास महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरला यश आले.खान्देशात सहा जणांना संधीजकात व एलबीटीच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरने खान्देशातही नेतृत्वाची संधी दिली. त्यानुसार आज खान्देशातील सहा संचालक महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरवर कार्यरत आहे. यामध्ये टावरी यांच्यासह छबीदास राणे (जळगाव), विजय अग्रवाल (चाळीसगाव), नितीन बंग, अरुण नावरकर (धुळे), एन.डी. पाटील (शिरपूर) यांचा समावेश आहे.एमआयडीसीला टाऊनशीपचा दर्जा द्याखान्देशातील विचार केला तर महामार्गाशिवाय रेल्वे, विमानसेवा, औद्योगिक वसाहतीमध्ये पुरेसा सोयी नसणे अशा अडचणी असल्याने उद्योजक इकडे येत नसल्याचे टावरी म्हणाले. जळगावात रेल्वेची सुविधा आहे तर धुळ््यात नाही, जळगावात विमानसेवा सुरू झाली मात्र त्यात सातत्य नाही, औद्योगिक वसाहतीमध्ये मनपा सुविधा देत नाही व औद्योगिक विकास महामंडळही काही प्रयत्न करीत नाही, त्यामुळे येथील उद्योग क्षेत्र अधोगतीस जात आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीस टाऊनशीपचा दर्जा दिल्यास येथे मोठे उद्योग येण्यास मदत होईल, असा विश्वास टावरी यांनी व्यक्त केला.किरकोळ व्यापारात गुंतवणुकीस विरोधआधीच विविध अडचणींमुळे व्यापारी वर्ग अडचणीत आहे. त्यात आता किरकोळ व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीस परवानगी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे किरकोळ व्यापार संपुष्टात येणार असल्याने या विदेशी गुंतवणुकीस महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अग्रीकल्चरचा विरोध आहे.जीएसटीमध्ये कराचे दोनच दर असावेवस्तू व सेवा करात वेगवेगळे दर अडचणीचे ठरत असून केवळ पाच टक्के व १८ टक्के असे दोनच दर असावे, अशी मागणी टावरी यांनी केली असून त्यासाठीही महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अग्रीकल्चरचे प्रयत्न सुरू आहे.राजकीय साथ मिळाल्यास विकास शक्यखान्देशात व्यापारी, उद्योजक यांच्या प्रश्नांबाबत राजकीय मंडळींकडून साथ मिळत नसल्याची खंत टावरी यांनी व्यक्त केली. येथे विमानसेवा सुरळीत होण्यासह रखडलेले चौपदरीकरण व औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकीय मंडळींनी साथ दिल्यास येथे औद्योगिक विकास शक्य असल्याचा विश्वासही टावरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :businessव्यवसायJalgaonजळगाव