शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशाच्या प्रश्नांना वाचा फोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:48 IST

महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे संचालक पुरुषोत्तम टावरी यांची माहिती

ठळक मुद्दे किरकोळ व्यापारात थेट विदेशी गंतवणुकीला विरोधजकातीसाठी जळगावातून लढा

जळगाव : पुरेशा साधनसामग्री, विविध सुविधा यांचा अभाव असल्याने व मनपा तसेच औद्योगिक विकास महामंडळ यांच्यातील टोलवा टोलव यामुळे जळगावसह खान्देशातील औद्योगिक विकास रखडला आहे. आतापर्यंत एलबीटी असो की जकात यासाठी ज्या प्रमाणे लढा देऊन ते प्रश्न मार्गी लावले त्याप्रमाणेच आताही खान्देशातील व्यापार, उद्योग क्षेत्रातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर लढा देणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे संचालक पुरुषोत्तम टावरी यांनी ‘लोकमत’ भेटीत दिली.या संघटनेच्या संचालकपदी पुरुषोत्तम टावरी यांची चौथ्यांदा निवड झाली असून या निवडीनंतर पहिल्यांदाच टावरी यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी टावरी यांनी संघटनेच्या कार्याविषयी तसेच खान्देशातील व्यापार, उद्योगातील विविध प्रश्नांवर सविस्तर माहिती दिली.जकातीसाठी जळगावातून लढाव्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणाºया जकात विरोधी आंदोलनास जळगावातून सुरुवात करीत २००५मध्ये सर्वप्रथम आंदोलन छेडले. त्यामुळे अहमदनगरलाही मोठा बंद झाला. यासह एलबीटीलाही विरोध करीत जकात व एलबीटी हद्दपार करण्यास महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरला यश आले.खान्देशात सहा जणांना संधीजकात व एलबीटीच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरने खान्देशातही नेतृत्वाची संधी दिली. त्यानुसार आज खान्देशातील सहा संचालक महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरवर कार्यरत आहे. यामध्ये टावरी यांच्यासह छबीदास राणे (जळगाव), विजय अग्रवाल (चाळीसगाव), नितीन बंग, अरुण नावरकर (धुळे), एन.डी. पाटील (शिरपूर) यांचा समावेश आहे.एमआयडीसीला टाऊनशीपचा दर्जा द्याखान्देशातील विचार केला तर महामार्गाशिवाय रेल्वे, विमानसेवा, औद्योगिक वसाहतीमध्ये पुरेसा सोयी नसणे अशा अडचणी असल्याने उद्योजक इकडे येत नसल्याचे टावरी म्हणाले. जळगावात रेल्वेची सुविधा आहे तर धुळ््यात नाही, जळगावात विमानसेवा सुरू झाली मात्र त्यात सातत्य नाही, औद्योगिक वसाहतीमध्ये मनपा सुविधा देत नाही व औद्योगिक विकास महामंडळही काही प्रयत्न करीत नाही, त्यामुळे येथील उद्योग क्षेत्र अधोगतीस जात आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीस टाऊनशीपचा दर्जा दिल्यास येथे मोठे उद्योग येण्यास मदत होईल, असा विश्वास टावरी यांनी व्यक्त केला.किरकोळ व्यापारात गुंतवणुकीस विरोधआधीच विविध अडचणींमुळे व्यापारी वर्ग अडचणीत आहे. त्यात आता किरकोळ व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीस परवानगी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे किरकोळ व्यापार संपुष्टात येणार असल्याने या विदेशी गुंतवणुकीस महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अग्रीकल्चरचा विरोध आहे.जीएसटीमध्ये कराचे दोनच दर असावेवस्तू व सेवा करात वेगवेगळे दर अडचणीचे ठरत असून केवळ पाच टक्के व १८ टक्के असे दोनच दर असावे, अशी मागणी टावरी यांनी केली असून त्यासाठीही महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड अग्रीकल्चरचे प्रयत्न सुरू आहे.राजकीय साथ मिळाल्यास विकास शक्यखान्देशात व्यापारी, उद्योजक यांच्या प्रश्नांबाबत राजकीय मंडळींकडून साथ मिळत नसल्याची खंत टावरी यांनी व्यक्त केली. येथे विमानसेवा सुरळीत होण्यासह रखडलेले चौपदरीकरण व औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकीय मंडळींनी साथ दिल्यास येथे औद्योगिक विकास शक्य असल्याचा विश्वासही टावरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :businessव्यवसायJalgaonजळगाव