शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

गिरणेचे आवर्तन सुटल्याने बायपासचा कच्चा पुल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गिरणा धरणातून चार दिवसांपूर्वी सोडलेल्या २५०० क्युसेक पाण्याचा आवर्तनामुळे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गिरणा धरणातून चार दिवसांपूर्वी सोडलेल्या २५०० क्युसेक पाण्याचा आवर्तनामुळे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बायपास या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला कच्चा पुल वाहून गेला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पाण्यामुळे कामाच्या ठिकाणचे दोन पोकलँड व जेसीबी पुराच्या पाण्यात अडकून पडले. सुदैवाने या ठिकाणी काम करत असलेले कामगार देखील बालंबाल बचावले आहेत.

गिरणा धरणातून शुक्रवारी शेवटचे आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र, याबाबत बायपासचा ठिकाणी काम करत असलेल्या कामगार व ठेकेदाराला याबाबतची माहिती देखील नसल्याने. अचानक आलेल्या या पुरात बायपासचा ठिकाणी तयार करण्यात आलेला पूल अचानकपणे वाहून गेला. यामुळे कामावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. बायपासचे काम पूर्णपणे थांबले आता पुढील चार महिने देखील हे काम सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

पिलरसाठीचे पाईप वाहिले , लोखंडी रॉड देखील वाहून गेले

संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गिरणा नदीच्या आवर्तन आव्हाणे पर्यंत पोहोचले. जोपर्यंत पुराचे पाणी कच्चा पुलापर्यंत आले नाही तोपर्यंत या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांना देखील याबाबतची कोणतीही माहिती नव्हती. पुराचे पाणी पुलापर्यंत पोहोचल्यानंतर कामगारांनी मिळेल ते साहित्य जमा करून त्या ठिकाणी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने पिलर साठीचे पाइप व लोखंडी रॉड पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर या ठिकाणी काम करत असलेले दोन पोक लँड पुराचा पाण्यातच अडकून पडले.

एप्रिल महिन्यात देखील झाली होती दुर्घटना

एप्रिल महिन्यात देखील गिरणा नदीचे आवर्तन सोडण्यात आले होते. यावेळी देखील हा कच्चा पूल वाहून गेला होता. त्यामुळे पंधरा दिवस बायपासच्या पुलाचे काम थांबले होते. या कामाला गेल्या काही दिवसांपासून वेग आला होता. तसेच पावसाळ्यापूर्वी पीलर चे काम करण्यावर ठेकेदाराचा भर होता. मात्र मंगळवारी सायंकाळी गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे कच्चा पूल वाहून गेला आहे. यासह शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला पुल देखील वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या शेतांमध्ये जायला शेतकऱ्यांना देखील रस्ता उरलेला नव्हता.

नदीच्या पाण्यामुळे अनधिकृत वाळू उपसा ही थांबला

मंगळवारी गिरणा धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे आव्हाणे, निमखेडी, खेडी या भागात सुरू असलेला अनधिकृत वाळूचा उपसा तात्पुरता देखील थांबला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नदीपात्रात १०० ते २०० डंपर द्वारे अनधिकृत वाळूचा उपसा सुरू होता. मात्र गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे हा उपसा काही अंशी थांबला आहे. दरम्यान आवर्तना मुळे गिरणा काठवरचा गावांमधील पाणीटंचाईची समस्या देखील काही अंशी मार्गी लागली आहे. यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील या आवर्तन मुळे फायदा होणार आहे.