शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
2
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
4
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
5
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
6
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
7
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
8
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
9
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
10
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
12
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
13
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
14
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
16
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
17
विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ
18
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
19
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
20
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
Daily Top 2Weekly Top 5

गिरणेचे आवर्तन सुटल्याने बायपासचा कच्चा पुल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गिरणा धरणातून चार दिवसांपूर्वी सोडलेल्या २५०० क्युसेक पाण्याचा आवर्तनामुळे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गिरणा धरणातून चार दिवसांपूर्वी सोडलेल्या २५०० क्युसेक पाण्याचा आवर्तनामुळे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बायपास या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला कच्चा पुल वाहून गेला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पाण्यामुळे कामाच्या ठिकाणचे दोन पोकलँड व जेसीबी पुराच्या पाण्यात अडकून पडले. सुदैवाने या ठिकाणी काम करत असलेले कामगार देखील बालंबाल बचावले आहेत.

गिरणा धरणातून शुक्रवारी शेवटचे आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र, याबाबत बायपासचा ठिकाणी काम करत असलेल्या कामगार व ठेकेदाराला याबाबतची माहिती देखील नसल्याने. अचानक आलेल्या या पुरात बायपासचा ठिकाणी तयार करण्यात आलेला पूल अचानकपणे वाहून गेला. यामुळे कामावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. बायपासचे काम पूर्णपणे थांबले आता पुढील चार महिने देखील हे काम सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

पिलरसाठीचे पाईप वाहिले , लोखंडी रॉड देखील वाहून गेले

संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गिरणा नदीच्या आवर्तन आव्हाणे पर्यंत पोहोचले. जोपर्यंत पुराचे पाणी कच्चा पुलापर्यंत आले नाही तोपर्यंत या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांना देखील याबाबतची कोणतीही माहिती नव्हती. पुराचे पाणी पुलापर्यंत पोहोचल्यानंतर कामगारांनी मिळेल ते साहित्य जमा करून त्या ठिकाणी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने पिलर साठीचे पाइप व लोखंडी रॉड पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर या ठिकाणी काम करत असलेले दोन पोक लँड पुराचा पाण्यातच अडकून पडले.

एप्रिल महिन्यात देखील झाली होती दुर्घटना

एप्रिल महिन्यात देखील गिरणा नदीचे आवर्तन सोडण्यात आले होते. यावेळी देखील हा कच्चा पूल वाहून गेला होता. त्यामुळे पंधरा दिवस बायपासच्या पुलाचे काम थांबले होते. या कामाला गेल्या काही दिवसांपासून वेग आला होता. तसेच पावसाळ्यापूर्वी पीलर चे काम करण्यावर ठेकेदाराचा भर होता. मात्र मंगळवारी सायंकाळी गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे कच्चा पूल वाहून गेला आहे. यासह शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला पुल देखील वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या शेतांमध्ये जायला शेतकऱ्यांना देखील रस्ता उरलेला नव्हता.

नदीच्या पाण्यामुळे अनधिकृत वाळू उपसा ही थांबला

मंगळवारी गिरणा धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे आव्हाणे, निमखेडी, खेडी या भागात सुरू असलेला अनधिकृत वाळूचा उपसा तात्पुरता देखील थांबला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नदीपात्रात १०० ते २०० डंपर द्वारे अनधिकृत वाळूचा उपसा सुरू होता. मात्र गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे हा उपसा काही अंशी थांबला आहे. दरम्यान आवर्तना मुळे गिरणा काठवरचा गावांमधील पाणीटंचाईची समस्या देखील काही अंशी मार्गी लागली आहे. यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील या आवर्तन मुळे फायदा होणार आहे.