शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गिरणेचे आवर्तन सुटल्याने बायपासचा कच्चा पुल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गिरणा धरणातून चार दिवसांपूर्वी सोडलेल्या २५०० क्युसेक पाण्याचा आवर्तनामुळे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गिरणा धरणातून चार दिवसांपूर्वी सोडलेल्या २५०० क्युसेक पाण्याचा आवर्तनामुळे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बायपास या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला कच्चा पुल वाहून गेला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पाण्यामुळे कामाच्या ठिकाणचे दोन पोकलँड व जेसीबी पुराच्या पाण्यात अडकून पडले. सुदैवाने या ठिकाणी काम करत असलेले कामगार देखील बालंबाल बचावले आहेत.

गिरणा धरणातून शुक्रवारी शेवटचे आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र, याबाबत बायपासचा ठिकाणी काम करत असलेल्या कामगार व ठेकेदाराला याबाबतची माहिती देखील नसल्याने. अचानक आलेल्या या पुरात बायपासचा ठिकाणी तयार करण्यात आलेला पूल अचानकपणे वाहून गेला. यामुळे कामावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. बायपासचे काम पूर्णपणे थांबले आता पुढील चार महिने देखील हे काम सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

पिलरसाठीचे पाईप वाहिले , लोखंडी रॉड देखील वाहून गेले

संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गिरणा नदीच्या आवर्तन आव्हाणे पर्यंत पोहोचले. जोपर्यंत पुराचे पाणी कच्चा पुलापर्यंत आले नाही तोपर्यंत या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांना देखील याबाबतची कोणतीही माहिती नव्हती. पुराचे पाणी पुलापर्यंत पोहोचल्यानंतर कामगारांनी मिळेल ते साहित्य जमा करून त्या ठिकाणी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने पिलर साठीचे पाइप व लोखंडी रॉड पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर या ठिकाणी काम करत असलेले दोन पोक लँड पुराचा पाण्यातच अडकून पडले.

एप्रिल महिन्यात देखील झाली होती दुर्घटना

एप्रिल महिन्यात देखील गिरणा नदीचे आवर्तन सोडण्यात आले होते. यावेळी देखील हा कच्चा पूल वाहून गेला होता. त्यामुळे पंधरा दिवस बायपासच्या पुलाचे काम थांबले होते. या कामाला गेल्या काही दिवसांपासून वेग आला होता. तसेच पावसाळ्यापूर्वी पीलर चे काम करण्यावर ठेकेदाराचा भर होता. मात्र मंगळवारी सायंकाळी गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे कच्चा पूल वाहून गेला आहे. यासह शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला पुल देखील वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या शेतांमध्ये जायला शेतकऱ्यांना देखील रस्ता उरलेला नव्हता.

नदीच्या पाण्यामुळे अनधिकृत वाळू उपसा ही थांबला

मंगळवारी गिरणा धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे आव्हाणे, निमखेडी, खेडी या भागात सुरू असलेला अनधिकृत वाळूचा उपसा तात्पुरता देखील थांबला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नदीपात्रात १०० ते २०० डंपर द्वारे अनधिकृत वाळूचा उपसा सुरू होता. मात्र गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे हा उपसा काही अंशी थांबला आहे. दरम्यान आवर्तना मुळे गिरणा काठवरचा गावांमधील पाणीटंचाईची समस्या देखील काही अंशी मार्गी लागली आहे. यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील या आवर्तन मुळे फायदा होणार आहे.