शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

गिरणेचे आवर्तन सुटल्याने बायपासचा कच्चा पुल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गिरणा धरणातून चार दिवसांपूर्वी सोडलेल्या २५०० क्युसेक पाण्याचा आवर्तनामुळे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गिरणा धरणातून चार दिवसांपूर्वी सोडलेल्या २५०० क्युसेक पाण्याचा आवर्तनामुळे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बायपास या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला कच्चा पुल वाहून गेला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पाण्यामुळे कामाच्या ठिकाणचे दोन पोकलँड व जेसीबी पुराच्या पाण्यात अडकून पडले. सुदैवाने या ठिकाणी काम करत असलेले कामगार देखील बालंबाल बचावले आहेत.

गिरणा धरणातून शुक्रवारी शेवटचे आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र, याबाबत बायपासचा ठिकाणी काम करत असलेल्या कामगार व ठेकेदाराला याबाबतची माहिती देखील नसल्याने. अचानक आलेल्या या पुरात बायपासचा ठिकाणी तयार करण्यात आलेला पूल अचानकपणे वाहून गेला. यामुळे कामावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. बायपासचे काम पूर्णपणे थांबले आता पुढील चार महिने देखील हे काम सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

पिलरसाठीचे पाईप वाहिले , लोखंडी रॉड देखील वाहून गेले

संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गिरणा नदीच्या आवर्तन आव्हाणे पर्यंत पोहोचले. जोपर्यंत पुराचे पाणी कच्चा पुलापर्यंत आले नाही तोपर्यंत या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांना देखील याबाबतची कोणतीही माहिती नव्हती. पुराचे पाणी पुलापर्यंत पोहोचल्यानंतर कामगारांनी मिळेल ते साहित्य जमा करून त्या ठिकाणी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने पिलर साठीचे पाइप व लोखंडी रॉड पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर या ठिकाणी काम करत असलेले दोन पोक लँड पुराचा पाण्यातच अडकून पडले.

एप्रिल महिन्यात देखील झाली होती दुर्घटना

एप्रिल महिन्यात देखील गिरणा नदीचे आवर्तन सोडण्यात आले होते. यावेळी देखील हा कच्चा पूल वाहून गेला होता. त्यामुळे पंधरा दिवस बायपासच्या पुलाचे काम थांबले होते. या कामाला गेल्या काही दिवसांपासून वेग आला होता. तसेच पावसाळ्यापूर्वी पीलर चे काम करण्यावर ठेकेदाराचा भर होता. मात्र मंगळवारी सायंकाळी गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे कच्चा पूल वाहून गेला आहे. यासह शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला पुल देखील वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या शेतांमध्ये जायला शेतकऱ्यांना देखील रस्ता उरलेला नव्हता.

नदीच्या पाण्यामुळे अनधिकृत वाळू उपसा ही थांबला

मंगळवारी गिरणा धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे आव्हाणे, निमखेडी, खेडी या भागात सुरू असलेला अनधिकृत वाळूचा उपसा तात्पुरता देखील थांबला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नदीपात्रात १०० ते २०० डंपर द्वारे अनधिकृत वाळूचा उपसा सुरू होता. मात्र गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे हा उपसा काही अंशी थांबला आहे. दरम्यान आवर्तना मुळे गिरणा काठवरचा गावांमधील पाणीटंचाईची समस्या देखील काही अंशी मार्गी लागली आहे. यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील या आवर्तन मुळे फायदा होणार आहे.