शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

रावेर तालुक्यात केळी उत्पादकांना जास्त तापमानाचा प्रतिहेक्टरी ३३ हजार रू. संरक्षित विम्याची रक्कम मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 22:51 IST

 मे महिन्यात सतत ५ दिवस ४४ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्यास दोन्ही महिन्यांसह ४१ हजार रू. प्रतिहेक्टरी संरक्षित विम्याचा लाभ होणार आहे.

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तालुक्यातील सातही महसूल भाग मंडळात माहे एप्रिल महिन्यात ४२ सेल्सिअंशपेक्षा जास्त अर्थात ४४.५ सेल्सिअंशपर्यंत तापमानाची सतत ५ ते १० दिवस उष्ण लहर राहील्याची नोंद महावेधच्या हवामानमापक यंत्रावर नोंद झाली आहे. त्यामुळे केळीबागा या प्रतिकूल अशा अतिउष्ण तापमानात होरपळून केळी उत्पादनाची अपरिमित हानी होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत प्रतिहेक्टरी ३३ हजार रू. संरक्षित विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. सद्य:स्थितीतील मे महिन्यात ४४ सेल्सिअंशपेक्षा सतत पाच दिवस अतिउष्ण तापमानाची लहर राहील्यास दोन्ही महिन्यातील नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ४१ हजार रू.चा संरक्षित विमा विमा कंपनीला देय ठरणार आहे.हिवाळ्यातील ८ सेल्सिअंशपेक्षा कमी तापमानाची सतत ४ दिवसांची शीतलहर राहिल्याने ३३ हजार ५०० रू.चा संरक्षित विमा मंजूर झाला होता. आता एप्रिल महिन्यात सतत पाच दिवसांपासून तब्बल १० दिवस ४२ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाची उष्ण लहर राहिल्याने तूर्त ३३ हजार रुपये प्रतिहेक्टर संरक्षित विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. तथापि, सद्य:स्थितीत असलेले तापमान पाहता या मे महिन्यातही ४४ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाच्या उष्णलहर सतत पाच दिवस राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मे महिन्यानंतर प्रतिहेक्टरी ४१ हजार रू. संरक्षित विम्याच्या रकमेचा लाभ होण्याची केळी उत्पादकांना आशा आहे.ऐनपूर महसूल मंडळात २३ ते २८ एप्रिल दरम्यान किमान ४२.३८ सेल्सिअंश ते कमाल ४३.५ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. खानापूर महसूल मंडळात १६ ते १९ एप्रिल दरम्यान किमान ४२.३ सेल्सिअंश ते ४२.९८ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. खिर्डी महसूल मंडळात १२ ते १९ एप्रिल दरम्यान किमान ४२.६ ते कमाल ४४.५९ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. खिरोदा महसूल मंडळात ११ ते २० एप्रिल दरम्यान किमान ४२.४५ ते ४४.३९ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.निंभोरा बुद्रूक महसूल मंडळात दि १२ ते १९ एप्रिल दरम्यान किमान ४२.६ ते कमाल ४३..२५ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. रावेर महसूल मंडळात २४ ते २८ एप्रिल दरम्यान किमान ४२.१२ ते कमाल ४३. १७ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. तत्पूर्वी १६ ते १८ एप्रिल दरम्यान ४२.४ ते ४३.६८ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.दरम्यान, सावदा महसूल मंडळात १२ ते १८ एप्रिल दरम्यान ४२.३ ते ४३. ५६ सेल्सिअंश तर दि २१ ते २५ एप्रिल दरम्यान ४२.०६ ते ४४.०७ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या लाटा ४४ सेल्सिअंशवर झळाळत असल्याने या मे महिन्यातही ४४ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाची सतत पाच दिवसांची नोंद होण्याची शक्यता फारशी दूर नसल्याची प्रतिकूल परिस्थिती आहे. यामुळे दोन्ही महिन्यातील जास्त तापमानाचा प्रतिहेक्टरी ४१ हजार रू.चा संरक्षित विम्याचा लाभ होण्याच्या केळी उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर