शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

रावेर तालुक्यात केळी उत्पादकांना जास्त तापमानाचा प्रतिहेक्टरी ३३ हजार रू. संरक्षित विम्याची रक्कम मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 22:51 IST

 मे महिन्यात सतत ५ दिवस ४४ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्यास दोन्ही महिन्यांसह ४१ हजार रू. प्रतिहेक्टरी संरक्षित विम्याचा लाभ होणार आहे.

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तालुक्यातील सातही महसूल भाग मंडळात माहे एप्रिल महिन्यात ४२ सेल्सिअंशपेक्षा जास्त अर्थात ४४.५ सेल्सिअंशपर्यंत तापमानाची सतत ५ ते १० दिवस उष्ण लहर राहील्याची नोंद महावेधच्या हवामानमापक यंत्रावर नोंद झाली आहे. त्यामुळे केळीबागा या प्रतिकूल अशा अतिउष्ण तापमानात होरपळून केळी उत्पादनाची अपरिमित हानी होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत प्रतिहेक्टरी ३३ हजार रू. संरक्षित विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. सद्य:स्थितीतील मे महिन्यात ४४ सेल्सिअंशपेक्षा सतत पाच दिवस अतिउष्ण तापमानाची लहर राहील्यास दोन्ही महिन्यातील नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ४१ हजार रू.चा संरक्षित विमा विमा कंपनीला देय ठरणार आहे.हिवाळ्यातील ८ सेल्सिअंशपेक्षा कमी तापमानाची सतत ४ दिवसांची शीतलहर राहिल्याने ३३ हजार ५०० रू.चा संरक्षित विमा मंजूर झाला होता. आता एप्रिल महिन्यात सतत पाच दिवसांपासून तब्बल १० दिवस ४२ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाची उष्ण लहर राहिल्याने तूर्त ३३ हजार रुपये प्रतिहेक्टर संरक्षित विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. तथापि, सद्य:स्थितीत असलेले तापमान पाहता या मे महिन्यातही ४४ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाच्या उष्णलहर सतत पाच दिवस राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मे महिन्यानंतर प्रतिहेक्टरी ४१ हजार रू. संरक्षित विम्याच्या रकमेचा लाभ होण्याची केळी उत्पादकांना आशा आहे.ऐनपूर महसूल मंडळात २३ ते २८ एप्रिल दरम्यान किमान ४२.३८ सेल्सिअंश ते कमाल ४३.५ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. खानापूर महसूल मंडळात १६ ते १९ एप्रिल दरम्यान किमान ४२.३ सेल्सिअंश ते ४२.९८ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. खिर्डी महसूल मंडळात १२ ते १९ एप्रिल दरम्यान किमान ४२.६ ते कमाल ४४.५९ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. खिरोदा महसूल मंडळात ११ ते २० एप्रिल दरम्यान किमान ४२.४५ ते ४४.३९ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.निंभोरा बुद्रूक महसूल मंडळात दि १२ ते १९ एप्रिल दरम्यान किमान ४२.६ ते कमाल ४३..२५ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. रावेर महसूल मंडळात २४ ते २८ एप्रिल दरम्यान किमान ४२.१२ ते कमाल ४३. १७ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. तत्पूर्वी १६ ते १८ एप्रिल दरम्यान ४२.४ ते ४३.६८ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.दरम्यान, सावदा महसूल मंडळात १२ ते १८ एप्रिल दरम्यान ४२.३ ते ४३. ५६ सेल्सिअंश तर दि २१ ते २५ एप्रिल दरम्यान ४२.०६ ते ४४.०७ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या लाटा ४४ सेल्सिअंशवर झळाळत असल्याने या मे महिन्यातही ४४ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाची सतत पाच दिवसांची नोंद होण्याची शक्यता फारशी दूर नसल्याची प्रतिकूल परिस्थिती आहे. यामुळे दोन्ही महिन्यातील जास्त तापमानाचा प्रतिहेक्टरी ४१ हजार रू.चा संरक्षित विम्याचा लाभ होण्याच्या केळी उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर