शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यात केळी उत्पादकांना जास्त तापमानाचा प्रतिहेक्टरी ३३ हजार रू. संरक्षित विम्याची रक्कम मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 22:51 IST

 मे महिन्यात सतत ५ दिवस ४४ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्यास दोन्ही महिन्यांसह ४१ हजार रू. प्रतिहेक्टरी संरक्षित विम्याचा लाभ होणार आहे.

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तालुक्यातील सातही महसूल भाग मंडळात माहे एप्रिल महिन्यात ४२ सेल्सिअंशपेक्षा जास्त अर्थात ४४.५ सेल्सिअंशपर्यंत तापमानाची सतत ५ ते १० दिवस उष्ण लहर राहील्याची नोंद महावेधच्या हवामानमापक यंत्रावर नोंद झाली आहे. त्यामुळे केळीबागा या प्रतिकूल अशा अतिउष्ण तापमानात होरपळून केळी उत्पादनाची अपरिमित हानी होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत प्रतिहेक्टरी ३३ हजार रू. संरक्षित विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. सद्य:स्थितीतील मे महिन्यात ४४ सेल्सिअंशपेक्षा सतत पाच दिवस अतिउष्ण तापमानाची लहर राहील्यास दोन्ही महिन्यातील नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ४१ हजार रू.चा संरक्षित विमा विमा कंपनीला देय ठरणार आहे.हिवाळ्यातील ८ सेल्सिअंशपेक्षा कमी तापमानाची सतत ४ दिवसांची शीतलहर राहिल्याने ३३ हजार ५०० रू.चा संरक्षित विमा मंजूर झाला होता. आता एप्रिल महिन्यात सतत पाच दिवसांपासून तब्बल १० दिवस ४२ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाची उष्ण लहर राहिल्याने तूर्त ३३ हजार रुपये प्रतिहेक्टर संरक्षित विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. तथापि, सद्य:स्थितीत असलेले तापमान पाहता या मे महिन्यातही ४४ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाच्या उष्णलहर सतत पाच दिवस राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मे महिन्यानंतर प्रतिहेक्टरी ४१ हजार रू. संरक्षित विम्याच्या रकमेचा लाभ होण्याची केळी उत्पादकांना आशा आहे.ऐनपूर महसूल मंडळात २३ ते २८ एप्रिल दरम्यान किमान ४२.३८ सेल्सिअंश ते कमाल ४३.५ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. खानापूर महसूल मंडळात १६ ते १९ एप्रिल दरम्यान किमान ४२.३ सेल्सिअंश ते ४२.९८ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. खिर्डी महसूल मंडळात १२ ते १९ एप्रिल दरम्यान किमान ४२.६ ते कमाल ४४.५९ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. खिरोदा महसूल मंडळात ११ ते २० एप्रिल दरम्यान किमान ४२.४५ ते ४४.३९ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.निंभोरा बुद्रूक महसूल मंडळात दि १२ ते १९ एप्रिल दरम्यान किमान ४२.६ ते कमाल ४३..२५ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. रावेर महसूल मंडळात २४ ते २८ एप्रिल दरम्यान किमान ४२.१२ ते कमाल ४३. १७ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. तत्पूर्वी १६ ते १८ एप्रिल दरम्यान ४२.४ ते ४३.६८ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.दरम्यान, सावदा महसूल मंडळात १२ ते १८ एप्रिल दरम्यान ४२.३ ते ४३. ५६ सेल्सिअंश तर दि २१ ते २५ एप्रिल दरम्यान ४२.०६ ते ४४.०७ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या लाटा ४४ सेल्सिअंशवर झळाळत असल्याने या मे महिन्यातही ४४ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाची सतत पाच दिवसांची नोंद होण्याची शक्यता फारशी दूर नसल्याची प्रतिकूल परिस्थिती आहे. यामुळे दोन्ही महिन्यातील जास्त तापमानाचा प्रतिहेक्टरी ४१ हजार रू.चा संरक्षित विम्याचा लाभ होण्याच्या केळी उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर