शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

रावेर लोकसभा : ‘कहो दिलसे रक्षा खडसे फिरसे’ ही साद मतदारांना भावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:52 IST

भुसावळ वगळता सर्वच मतदार संघात लाखावर मते

विलास बारीजळगाव : रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाचे बुथनिहाय नियोजन आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा शेवटपर्यंत उमेदवार निश्चित करण्यासाठी चाललेला घोळ ही परिस्थिती पाहता भाजपचा विजय निश्चित मानला जात होता.राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे व्यक्तीमत्व असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजकीय विजनवासात आहेत.मात्र त्यांची आजही जिल्ह्यातील राजकारणावर मजबूत पकड असल्याचे या निकालाने सिद्ध झाले आहे.लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या गैरहजेरीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराचे नियोजन व बुथरचनेची चांगल्याप्रकारे तयारी करीत एकहाती विजयश्री खेचून आणली.दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात जागा कुणाला सोडावी यावरून एकमत होत नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार निश्चित होत नव्हता.राष्ट्रवादीला अपेक्षित उमेदवार न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसला ही जागा सोडली. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांना मतदार संघात प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नाही. भुसावळात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून लांब राहिले. अन्य शहरांमध्ये फारशी वेगळी परिस्थिती राहिली नाही.रावेर व यावल तालुका वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्वच नसल्याने भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना एकहाती विजय मिळविता आला.लोकसभा निवडणुक घोषित झाली तेव्हाच विजय निश्चित होता. फक्त लिड कितीचा मिळतो याबाबत उत्सुकता होती, आणि हे सार्थ ठरले.विधानसभेचे गणित कसे राहील...?लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठी शिवसेना व भाजपची युती कायम राहिल्यास रावेर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात शिवसेना व भाजपसाठी पोषक वातावरण राहणार आहे. युती झाल्यास मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना शिवसेनेचा फारसा विरोध राहणार नाही. तर भुसावळातील जागेवर शिवसेनेने आपला हक्क सांगितल्यास मात्र विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यासाठी अडचणीची बाब ठरणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनादेखील विधानसभेसाठी आतापासून तयारी करावी लागणार आहे.विजयी उमेदवारांसमोरील आव्हाने काय?केळी या पिकांवर वारंवार पडणारा रोग व नुकसानीसाठी केंद्र शासनाकडून भरीव उपाययोजना करावी लागणारमेगा रिचार्ज प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून तो पूर्णत्वास आणावा लागणार आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रावेर लोकसभा मतदार संघात गंभीर आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव