शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

रावेर लोकसभा : ‘कहो दिलसे रक्षा खडसे फिरसे’ ही साद मतदारांना भावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:52 IST

भुसावळ वगळता सर्वच मतदार संघात लाखावर मते

विलास बारीजळगाव : रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाचे बुथनिहाय नियोजन आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा शेवटपर्यंत उमेदवार निश्चित करण्यासाठी चाललेला घोळ ही परिस्थिती पाहता भाजपचा विजय निश्चित मानला जात होता.राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे व्यक्तीमत्व असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजकीय विजनवासात आहेत.मात्र त्यांची आजही जिल्ह्यातील राजकारणावर मजबूत पकड असल्याचे या निकालाने सिद्ध झाले आहे.लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या गैरहजेरीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराचे नियोजन व बुथरचनेची चांगल्याप्रकारे तयारी करीत एकहाती विजयश्री खेचून आणली.दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात जागा कुणाला सोडावी यावरून एकमत होत नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार निश्चित होत नव्हता.राष्ट्रवादीला अपेक्षित उमेदवार न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसला ही जागा सोडली. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांना मतदार संघात प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नाही. भुसावळात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून लांब राहिले. अन्य शहरांमध्ये फारशी वेगळी परिस्थिती राहिली नाही.रावेर व यावल तालुका वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्वच नसल्याने भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना एकहाती विजय मिळविता आला.लोकसभा निवडणुक घोषित झाली तेव्हाच विजय निश्चित होता. फक्त लिड कितीचा मिळतो याबाबत उत्सुकता होती, आणि हे सार्थ ठरले.विधानसभेचे गणित कसे राहील...?लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठी शिवसेना व भाजपची युती कायम राहिल्यास रावेर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात शिवसेना व भाजपसाठी पोषक वातावरण राहणार आहे. युती झाल्यास मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना शिवसेनेचा फारसा विरोध राहणार नाही. तर भुसावळातील जागेवर शिवसेनेने आपला हक्क सांगितल्यास मात्र विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यासाठी अडचणीची बाब ठरणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनादेखील विधानसभेसाठी आतापासून तयारी करावी लागणार आहे.विजयी उमेदवारांसमोरील आव्हाने काय?केळी या पिकांवर वारंवार पडणारा रोग व नुकसानीसाठी केंद्र शासनाकडून भरीव उपाययोजना करावी लागणारमेगा रिचार्ज प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून तो पूर्णत्वास आणावा लागणार आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रावेर लोकसभा मतदार संघात गंभीर आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव