शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

रावेर लोकसभा : ‘कहो दिलसे रक्षा खडसे फिरसे’ ही साद मतदारांना भावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:52 IST

भुसावळ वगळता सर्वच मतदार संघात लाखावर मते

विलास बारीजळगाव : रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाचे बुथनिहाय नियोजन आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा शेवटपर्यंत उमेदवार निश्चित करण्यासाठी चाललेला घोळ ही परिस्थिती पाहता भाजपचा विजय निश्चित मानला जात होता.राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे व्यक्तीमत्व असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजकीय विजनवासात आहेत.मात्र त्यांची आजही जिल्ह्यातील राजकारणावर मजबूत पकड असल्याचे या निकालाने सिद्ध झाले आहे.लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या गैरहजेरीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराचे नियोजन व बुथरचनेची चांगल्याप्रकारे तयारी करीत एकहाती विजयश्री खेचून आणली.दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात जागा कुणाला सोडावी यावरून एकमत होत नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार निश्चित होत नव्हता.राष्ट्रवादीला अपेक्षित उमेदवार न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसला ही जागा सोडली. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांना मतदार संघात प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नाही. भुसावळात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून लांब राहिले. अन्य शहरांमध्ये फारशी वेगळी परिस्थिती राहिली नाही.रावेर व यावल तालुका वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्वच नसल्याने भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना एकहाती विजय मिळविता आला.लोकसभा निवडणुक घोषित झाली तेव्हाच विजय निश्चित होता. फक्त लिड कितीचा मिळतो याबाबत उत्सुकता होती, आणि हे सार्थ ठरले.विधानसभेचे गणित कसे राहील...?लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठी शिवसेना व भाजपची युती कायम राहिल्यास रावेर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात शिवसेना व भाजपसाठी पोषक वातावरण राहणार आहे. युती झाल्यास मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना शिवसेनेचा फारसा विरोध राहणार नाही. तर भुसावळातील जागेवर शिवसेनेने आपला हक्क सांगितल्यास मात्र विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यासाठी अडचणीची बाब ठरणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनादेखील विधानसभेसाठी आतापासून तयारी करावी लागणार आहे.विजयी उमेदवारांसमोरील आव्हाने काय?केळी या पिकांवर वारंवार पडणारा रोग व नुकसानीसाठी केंद्र शासनाकडून भरीव उपाययोजना करावी लागणारमेगा रिचार्ज प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून तो पूर्णत्वास आणावा लागणार आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रावेर लोकसभा मतदार संघात गंभीर आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव