शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील रावण जाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:00 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत प्रासंगिक या सदरात लिहिताहेत जळगाव येथील लेखिका प्रिया सफळे...

पौराणिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, आधुनिक काळ हा स्त्रियांच्या विविध पैलूंनी, गुणांनी, कर्तृत्वाने समृद्ध झाला आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा उंच झोका आभाळाकडे झेपावतोय.यत्र नार्यस्तु पूज्यनते रमनते तत्र देवता:।साफ खोटं, खोटं आहे हे मनुवचन, किती, किती निरागस, निष्पाप, मुली अशा अमानुष कृत्यांचा बळी होणार आहेत? कधी होणार असे कायदे की या नराधम फासावर लगेच लटकावले जातील? घटना घडते, आपण सुन्न होतो, संताप व्यक्त करतो, गुन्हेगार सापडतात, कधी नाही सापडत, पोलीस यंत्रणा शोध घेत रहाते, मग न्याययंत्रणा सुरू होते. तारीख पे तारीख पडत रहाते. काळ पुढे जात असतो. ज्या कुटुंबावर हा आघात झाला असतो, ते वाट पहात राहतं की या नराधमांना कधी कठोर शिक्षा होईल, म्हणजे त्या कोवळ्या जीवाच्या आत्म्यास शांती मिळेल. भाबड्या आशेवर जगत रहातात. बरेच पुराव्याअभावी राजरोसपणे फिरतात, काहींना शिक्षा होते पण खूप काळ जातो.मुलींना आईवडील सक्षम करताहेत, बुद्धिमत्तेच्या जोरावर यशोशिखरावर या लेकी विराजमान होताहेत आणि आणि समाजातले, मानवजातीला काळिमा फासणारे हे आसूर त्यांच्यावर अत्याचार करून या लेकींना कधी जाळतात. कधी तुकडे करतात, कधी दरीत फेकून देतात. का यांना आई, बहीण, पत्नी, मुलगी नाही? परिवारात स्त्रिया नाहीत की दुसऱ्यांच्या मुली कस्पटासमान आहेत?बंद करा दरवर्षी त्या रावणाला जाळणं. समाजातील हे रावण जाळा. जे रामाचे मुखवटे घालून राजरोसपणे फिरताहेत आणि स्त्रियांवर अत्याचार करताहेत. रोजच्या बातम्या आहेत. अगदी दोन-तीन वर्षाच्या चिमुरड्यांना हे राक्षस चिरडून टाकताहेत. कधी कधी थांबणार हे दुष्टचक्र?नोटाबंदी एका रात्रीत घडली, सर्जिकल स्ट्राईक एका रात्रीत झालं, काश्मीरमधील ३७० कलम हटवलं गेलं, तहेरी तलाक विधेयक मंजूर झालं. १३४ वर्षे बहुचर्चित अयोध्या मंदिर-मशीद वाद संपला. असे कितीतरी प्रश्न, समस्या आपण प्रगल्भ बुद्धिमतेच्या जोरावर सोडवित आहोत. स्त्रियांना निर्भयपणे जगण्यासाठीचा कायदा लवकरात लवकर यावा. नराधमांना अशी शिक्षा सुनावली जावी की वाईट कृत्य करताना व्यक्ती विचार करेल, की त्याचा मृत्यू अटळ आहे. याचा आता न्याय व्यवस्थेने गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.-प्रिया सफळे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव