शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील रावण जाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:00 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत प्रासंगिक या सदरात लिहिताहेत जळगाव येथील लेखिका प्रिया सफळे...

पौराणिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, आधुनिक काळ हा स्त्रियांच्या विविध पैलूंनी, गुणांनी, कर्तृत्वाने समृद्ध झाला आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा उंच झोका आभाळाकडे झेपावतोय.यत्र नार्यस्तु पूज्यनते रमनते तत्र देवता:।साफ खोटं, खोटं आहे हे मनुवचन, किती, किती निरागस, निष्पाप, मुली अशा अमानुष कृत्यांचा बळी होणार आहेत? कधी होणार असे कायदे की या नराधम फासावर लगेच लटकावले जातील? घटना घडते, आपण सुन्न होतो, संताप व्यक्त करतो, गुन्हेगार सापडतात, कधी नाही सापडत, पोलीस यंत्रणा शोध घेत रहाते, मग न्याययंत्रणा सुरू होते. तारीख पे तारीख पडत रहाते. काळ पुढे जात असतो. ज्या कुटुंबावर हा आघात झाला असतो, ते वाट पहात राहतं की या नराधमांना कधी कठोर शिक्षा होईल, म्हणजे त्या कोवळ्या जीवाच्या आत्म्यास शांती मिळेल. भाबड्या आशेवर जगत रहातात. बरेच पुराव्याअभावी राजरोसपणे फिरतात, काहींना शिक्षा होते पण खूप काळ जातो.मुलींना आईवडील सक्षम करताहेत, बुद्धिमत्तेच्या जोरावर यशोशिखरावर या लेकी विराजमान होताहेत आणि आणि समाजातले, मानवजातीला काळिमा फासणारे हे आसूर त्यांच्यावर अत्याचार करून या लेकींना कधी जाळतात. कधी तुकडे करतात, कधी दरीत फेकून देतात. का यांना आई, बहीण, पत्नी, मुलगी नाही? परिवारात स्त्रिया नाहीत की दुसऱ्यांच्या मुली कस्पटासमान आहेत?बंद करा दरवर्षी त्या रावणाला जाळणं. समाजातील हे रावण जाळा. जे रामाचे मुखवटे घालून राजरोसपणे फिरताहेत आणि स्त्रियांवर अत्याचार करताहेत. रोजच्या बातम्या आहेत. अगदी दोन-तीन वर्षाच्या चिमुरड्यांना हे राक्षस चिरडून टाकताहेत. कधी कधी थांबणार हे दुष्टचक्र?नोटाबंदी एका रात्रीत घडली, सर्जिकल स्ट्राईक एका रात्रीत झालं, काश्मीरमधील ३७० कलम हटवलं गेलं, तहेरी तलाक विधेयक मंजूर झालं. १३४ वर्षे बहुचर्चित अयोध्या मंदिर-मशीद वाद संपला. असे कितीतरी प्रश्न, समस्या आपण प्रगल्भ बुद्धिमतेच्या जोरावर सोडवित आहोत. स्त्रियांना निर्भयपणे जगण्यासाठीचा कायदा लवकरात लवकर यावा. नराधमांना अशी शिक्षा सुनावली जावी की वाईट कृत्य करताना व्यक्ती विचार करेल, की त्याचा मृत्यू अटळ आहे. याचा आता न्याय व्यवस्थेने गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.-प्रिया सफळे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव